शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या दारी कर्मचाऱ्यांची कमतरता भारी...

By admin | Updated: April 28, 2015 00:18 IST

वाहक-चालकांवर ताण : जिल्ह्यात चालक, वाहक, कर्मचाऱ्यांची ११७४ पदे भरण्याची गरज

नरेंद्र रानडे- सांगली -‘प्रवाशांच्या सोयीसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन गावोगावी धावणाऱ्या सांगलीच्या एसटी विभागात सध्या तब्बल ११७४ कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. मागील काही महिन्यांपासून ही परिस्थिती कायम असतानाही, अतिरिक्त ताण सहन करुन वाहक - चालक, प्रवाशांना त्रास नको, या एकाच हेतूने संपाचे हत्यार न उपसता कार्यरत आहेत. सध्या सुट्टीचा कालावधी असल्याने आणि अपुऱ्या संख्येमुळे कित्येक कर्मचारी दिवसातील १५ तासांहून अधिक काळ सेवा बजावत आहेत. अतिरिक्त ताणामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी तातडीने वाहक - चालक यांची भरती प्रक्रिया राबविण्याची गरज आहे. एसटीसाठी वर्षातील सुट्टीचा कालावधी हा आर्थिक उत्पन्न मिळविण्यासाठीचा उत्तम काळ असतो. सध्या १५ एप्रिल ते १५ जून २०१५ हा कार्यकाल प्रवासी वाढीचा असल्याचे विभागाने जाहीर केले आहे. यामध्ये एसटीचे उत्पन्न वाढत असल्याने साहजिकच कोणत्याही कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडू नये याची काळजी महामंडळाने घेतली पाहिजे. नेमक्या त्याच मुद्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सांगली विभागात दहा डेपो असून त्यामध्ये ९०७ एसटी आहेत. त्यातील बहुतांशी एसटीचा प्रवास सुमारे नऊ लाख कि.मी. झाला आहे. जुन्या नियमानुसार दहा लाख कि.मी. प्रवास झालेल्या एसटी गाड्या बदलणे गरजेचे आहे. तसेच नवीन नियमानुसार ही मर्यादा बारा लाख कि.मी. आहे. आताच काही एसटी गाड्या खराब होण्याच्या मार्गावर आहेत. साहजिकच नजीकच्या काळात बहुतांशी एसटीश बदलणे क्रमप्राप्त आहे. महामंडळाने केवळ तीस नवीन एसटी सांगली आगारात दाखल केल्या आहेत, तर कामगार संघटनांची, अजून दोनशे एसटी गाड्या मिळाव्यात अशी मागणी आहे. दिवसेंदिवस प्रवाशांमध्ये वाढ होत असल्याने पुणे, मुंबई, नाशिक, शिर्डी, शेगाव, नांदेड, कोल्हापूर आदी ठिकाणी जाण्याकरिता एसटीच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. परंतु वाहक - चालकांची संख्या मर्यादित असल्याने महामंडळाकडून त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे जादा काम करण्याची सक्ती करण्यात येत आहे. वास्तविक दिवसातून आठ तासच काम करण्याचा नियम असताना, सध्या अपुरे असलेले वाहक - चालक हे दिवसातून १५ तासाहून अधिक काळ काम करीत आहेत. या दोन महिन्याच्या काळात कोणाला सुट्टी हवी असल्यास, ती देण्यासही टाळाटाळ करण्यात येत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. खासगी प्रवासी बसेसशी स्पर्धा करण्याकरिता प्रवाशांना लवकरात लवकर इच्छितस्थळी पोहोचवणे गरजेचे आहे. परंतु स्पिड लॉक केल्यामुळे याला मर्यादा येत आहेत. याकरिता स्पिड लॉक काढण्याची देखील कर्मचाऱ्यांची मागील दहा वर्षापासूनची मागणी आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांकरिता आवश्यक असणाऱ्या रेस्ट रुममध्ये देखील आवश्यक असणाऱ्या सुविधा नाहीत. महिलांसाठी नवीन रेस्ट हाऊस बांधण्यासाठी एसटी महामंडळाने दहा लाख रुपये मंजूर केले असले तरी, मनपाने बांधकाम परवाना न दिल्याने ते काम रखडले आहे. यामुळे महिलांची गैरसोय होत आहे. सध्या तातडीने एसटीमध्ये वाहक - चालक आणि कार्यशाळा कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविल्यास कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या एसटी चालकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याची गरज आहे.- बिराज साळुंखे, विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना सांगली. सांगली विभागात महिला कार्यरत असूनही त्यांच्यासाठी रेस्ट रुममध्ये आवश्यक सुविधा नाहीत. बसस्थानकापासून ते काही अंतरावर असल्याने रात्रीच्या वेळी त्याचा उपयोग होत नाही. प्रस्तावित रेस्ट हाऊस तातडीने झाल्यास महिला कर्मचाऱ्यांची सुविधा होणार आहे.- रोहिणी सबनीस, वाहतूक नियंत्रक, सांगली बसस्थानक