शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

शूऽऽऽ शोध सुरू आहे... संजयकाकांच्या पर्यायाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांशी उभा दावा, जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांशी टोकाचे मतभेद, पक्षापेक्षा स्वत:च्या गटाच्या मजबुतीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांशी उभा दावा, जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांशी टोकाचे मतभेद, पक्षापेक्षा स्वत:च्या गटाच्या मजबुतीवर भर, बेभरवशाचे राजकारण आणि विरोधकांशी अतिसलगी यामुळे खासदार संजयकाका पाटील यांना पर्याय देण्याच्या विचारात भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. पक्षातील अस्वस्थतेमुळे लोकसभेसाठी नवा चेहरा देण्याच्या हालचाली आतापासूनच सुरू झाल्या आहेत.

लोकसभेच्या २०१४ मधील निवडणुकीआधी संजयकाका पाटील यांनी वाऱ्याची दिशा ओळखून हातातील ‘घड्याळ’ काढले. भाजपचे कमळ जवळ केले. मोदी लाट आणि काँग्रेसच्या निष्क्रियतेमुळे ते खासदार झाले. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना वरदहस्त मिळाला. मात्र माजी मंत्री तथा विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे कधीच जमले नाही. फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील ‘लॉबिंग’ची स्पर्धाही त्याला कारणीभूत आहे. त्यातच वालचंद महाविद्यालयाच्या मालकी हक्कावरून सुरू झालेल्या वादातून जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याशीही काकांचे वाजले. ‘वालचंद’मध्ये देशमुखांनी बसवलेल्या संचालकांना काकांनी पळवून लावले! तेव्हापासून दोघे एकमेकांना पाण्यात पाहतात. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीआधी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी जाहीरपणे काकांवर तोफ डागली. जिल्ह्यातील आमदारांच्या मंत्रिपदामध्ये काका अडसर ठरत असून, इतर नेत्यांना दाबण्याचे राजकारण ते करत असल्याची टीका पडळकरांनी केली. आमदार सुरेश खाडे यांच्याविरोधात मिरज पूर्वभागातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते उठवून बसवण्यात काकांचा हात असल्याचा सूर उमटू लागला. सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ यांच्या गटाला बाजूला करण्याची खेळी ते करत असल्याची कुजबूज सुरू झाली. जतमध्ये विलासराव जगताप आणि कवठेमहांकाळमध्ये अजितराव घोरपडे यांना पुढे येऊ द्यायचे नाही, यासाठी काकांनी ‘फिल्डिंग’ लावल्याचेही बोलले जाऊ लागले.

या पार्श्वभूमीवर २०१९च्या लोकसभा निवणुकीवेळी भाजपकडेही काकांसारखा जिल्हाभर चालणारा, वजनदार उमेदवार नव्हता. परिणामी काकांनाच उमेदवारी मिळाली. ती भाजपची अपरिहार्यता होती. काँग्रेस आघाडीकडून विशाल पाटील आणि भाजप सोडून ‘वंचित’मध्ये गेलेल्या गोपीचंद पडळकर यांनी दंड थोपटले. तिहेरी लढतीत काकांनी गड राखला. त्यावेळी काकांवर नाराज झालेल्या भाजपमधील नेत्यांना कसेबसे विनवण्यात आले. मात्र त्या आधीपासूनच काकांना पद्धतशीर बाजूला काढण्यात येऊ लागले होते. जिल्ह्यातील महत्त्वाचे निर्णय त्यांना डावलून घेतले जाऊ लागले. महापालिका निवडणुकीत ते प्रकर्षाने दिसले. दुसरीकडे पक्षाच्या कार्यक्रमांना काका दांडी मारू लागले. काही बैठकांना नावापुरती हजेरी लावू लागले. विधानसभा निवडणुकीत त्यांनी सोयीस्कर भूमिका घेतली. अजितराव घोरपडेंना भाजप सोडून शिवसेनेची उमेदवारी घेऊन लढावे लागले, पण काकांमुळे त्यांची ‘गेम’ झाली, तर जतमध्ये विलासराव जगतापांच्या विरोधातील बंडाळीला काकांनीच फूस लावल्याने तीही जागा गेली. प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्षांसह पक्षातील इतर नेत्यांशी असलेली मतभेदांची दरी रूंदावली.

याच दरम्यान राज्यात भाजपची सत्ता जाऊन काॅंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या महाआघाडीची सत्ता आली. आधीच काकांचे काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी मधूर संबंध आहेत. ते आणखी घट्ट होऊ लागले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी त्यांनी हातमिळवणी केली आहे, तर तासगाव-कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील गटाशी त्यांची छुपी युती आहे. काकांनी पक्षाच्या संघटनवाढीत कधीच रस दाखवला नाही. उलट प्रत्येक तालुक्यात स्वत:चा गट वाढवण्यावर भर दिला. यामुळे पक्षात अस्वस्थता वाढल्याचे बोलले जाते. यामुळे त्यांना पर्याय देण्याच्या विचारात भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. लोकसभेसाठी नवा चेहरा देण्याच्या हालचाली आतापासूनच सुरू झाल्या आहेत.

‘पदवीधर’वेळी पृथ्वीराज देशमुख होते कोठे?

पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी संग्रामसिंह देशमुख यांना देण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी परस्पर घेतला. त्यावेळी काकांसह इतर नेत्यांनाही विचारले गेले नाही. त्यातून खदखद वाढत गेली. काही नेते अलिप्त राहिले, तर काहींनी विरोधात काम केल्याची चर्चा भाजपमध्ये आहे. या चर्चेचा रोख काकांकडेही आहे. यावर काकांचे समर्थक म्हणतात, ‘निवडणुकीतील प्रचारादरम्यान संग्रामसिंह यांचे चुलत बंधू तथा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख जाहीर प्रचारात कोठेच दिसले नाहीत. त्यांच्या साखर कारखान्याचा गंभीर प्रश्न समोर येणार असल्यानेच त्यांना मागे ठेवले होते का? मग पराभवाचे खापर केवळ आमच्यावरच का? फोडता?’ हा रोकडा सवाल. यातून दोन्ही गटातील उभा दावा पुन्हा अधोरेखित होत नाही का?