शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

भोंगळ कारभाराचा ग्राहकांना शॉक

By admin | Updated: July 13, 2015 00:31 IST

नियमांचा बोजवारा : सुविधांची वानवा, धोकादायक यंत्रणा--महावितरणचा बट्ट्याबोळ -४

तासगाव : अनियमित, तसेच कधी अचानक उच्च दाबाने, तर कधी कमी दाबाने होणारा वीज पुरवठा यामुळे सामान्य वीज ग्राहकाला याचा फटका बसत आहे. घरगुती उपकरणे निकामी होण्यापासून शेतीपंप जळण्यापर्यंत अनेक घटना सातत्याने तालुक्यात घडत आहेत. नुकसान झाल्यानंतरही महावितरणच्या कारभारात सुधारणा झालेली नाही. नियमांचा बोजवारा, दरिद्री कारभार याामुळे असणारी सुविधांची वानवा, अशा भोंगळ कारभारामुळे ग्राहकांना नुकसानीचा शॉक बसत आहे.महावितरणच्या कमी दाबाच्या ट्रान्स्फॉर्मरवर अतिरिक्त दाब पडल्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी सातत्याने ट्रान्स्फॉर्मर जळण्याचा घटना घडत आहेत. एकदा ट्रान्स्फॉर्मर जळाल्यानंतर तो नव्याने बसविण्यासाठी अनेक आठवडे, महिने वाट पाहावी लागते. त्यामुळे अनेकदा शेतीचे नुकसानही होते. विद्युत दाब नियंत्रित नसल्यामुळे घरगुती उपकरणांचे अनेकदा नुकसान झालेले आहे. महावितरणकडून ग्राहकांचे नुकसान झाल्यास किंवा वेळेत काम झाले नाही, तर नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे. मात्र अशा सर्वच नियमांचे राजरोसपणे उल्लंघन होत आहे. अनेक गावांतील महावितरणचे ट्रान्स्फॉर्मर धोकादायक अवस्थेत आहेत. ट्रान्स्फॉर्मरच्या खालील बाजूस डिस्ट्रीब्युशन बॉक्स असतो. हा बॉक्स सुस्थितीत असेल, तर कमी-जास्त वीज दाब असला तरी, ट्रान्स्फॉर्मर निकामी होत नाही. मात्र बहुतांश ठिकाणचे डिस्ट्रिब्युशन बॉक्स खराब झाल्याचे दिसून येते. अनेक ट्रान्स्फॉर्मरमध्ये फ्यूज नाहीत, फ्यूज गेल्यास फ्यूज वायर मिळत नाही. त्यामुळे वायरमनना पदरमोड करून फ्यूजची वायर घालावी लागते. वीज पुरवठ्यासाठी प्राथमिक सुविधाही महावितरणकडून उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी ही यंत्रणा धोकादायक बनली आहे. काही ठिकाणी वेळेत वीज सुरळीत व्हावी, यासाठी स्वत: शेतकरीच जीवघेण्या पध्दतीने फ्यूजची वायर घालण्याचे काम करतो. एकूणच महावितरणच्या दशकपूर्तीनंतरही सर्व कारभार भोंगळच आहे. या कारभाराचा शॉक सामान्य ग्राहकाला बसत असल्याचे चित्र आहे. (समाप्त)नोंदवहीच नाही ग्रामीण भागातील सेवेचा दर्जा आणखी उंचावण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात नोंदवही ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने नुुकताच घेतला आहे. खंडित वीजपुरवठ्याबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी असतात. वेळेत काम होत नाही, त्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण होतो. त्यासाठी महावितरणकडून प्रत्येक ग्रामपंचायतीत नोंदवही ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र बहुतांश ग्रामपंचायतीत नोंदवही दिसून येत नाही. तसेच नोंदवही अडगळीच्या ठिकाणी पडलेली आहे.