शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

भोंगळ कारभाराचा ग्राहकांना शॉक

By admin | Updated: July 13, 2015 00:31 IST

नियमांचा बोजवारा : सुविधांची वानवा, धोकादायक यंत्रणा--महावितरणचा बट्ट्याबोळ -४

तासगाव : अनियमित, तसेच कधी अचानक उच्च दाबाने, तर कधी कमी दाबाने होणारा वीज पुरवठा यामुळे सामान्य वीज ग्राहकाला याचा फटका बसत आहे. घरगुती उपकरणे निकामी होण्यापासून शेतीपंप जळण्यापर्यंत अनेक घटना सातत्याने तालुक्यात घडत आहेत. नुकसान झाल्यानंतरही महावितरणच्या कारभारात सुधारणा झालेली नाही. नियमांचा बोजवारा, दरिद्री कारभार याामुळे असणारी सुविधांची वानवा, अशा भोंगळ कारभारामुळे ग्राहकांना नुकसानीचा शॉक बसत आहे.महावितरणच्या कमी दाबाच्या ट्रान्स्फॉर्मरवर अतिरिक्त दाब पडल्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी सातत्याने ट्रान्स्फॉर्मर जळण्याचा घटना घडत आहेत. एकदा ट्रान्स्फॉर्मर जळाल्यानंतर तो नव्याने बसविण्यासाठी अनेक आठवडे, महिने वाट पाहावी लागते. त्यामुळे अनेकदा शेतीचे नुकसानही होते. विद्युत दाब नियंत्रित नसल्यामुळे घरगुती उपकरणांचे अनेकदा नुकसान झालेले आहे. महावितरणकडून ग्राहकांचे नुकसान झाल्यास किंवा वेळेत काम झाले नाही, तर नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे. मात्र अशा सर्वच नियमांचे राजरोसपणे उल्लंघन होत आहे. अनेक गावांतील महावितरणचे ट्रान्स्फॉर्मर धोकादायक अवस्थेत आहेत. ट्रान्स्फॉर्मरच्या खालील बाजूस डिस्ट्रीब्युशन बॉक्स असतो. हा बॉक्स सुस्थितीत असेल, तर कमी-जास्त वीज दाब असला तरी, ट्रान्स्फॉर्मर निकामी होत नाही. मात्र बहुतांश ठिकाणचे डिस्ट्रिब्युशन बॉक्स खराब झाल्याचे दिसून येते. अनेक ट्रान्स्फॉर्मरमध्ये फ्यूज नाहीत, फ्यूज गेल्यास फ्यूज वायर मिळत नाही. त्यामुळे वायरमनना पदरमोड करून फ्यूजची वायर घालावी लागते. वीज पुरवठ्यासाठी प्राथमिक सुविधाही महावितरणकडून उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी ही यंत्रणा धोकादायक बनली आहे. काही ठिकाणी वेळेत वीज सुरळीत व्हावी, यासाठी स्वत: शेतकरीच जीवघेण्या पध्दतीने फ्यूजची वायर घालण्याचे काम करतो. एकूणच महावितरणच्या दशकपूर्तीनंतरही सर्व कारभार भोंगळच आहे. या कारभाराचा शॉक सामान्य ग्राहकाला बसत असल्याचे चित्र आहे. (समाप्त)नोंदवहीच नाही ग्रामीण भागातील सेवेचा दर्जा आणखी उंचावण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात नोंदवही ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने नुुकताच घेतला आहे. खंडित वीजपुरवठ्याबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी असतात. वेळेत काम होत नाही, त्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण होतो. त्यासाठी महावितरणकडून प्रत्येक ग्रामपंचायतीत नोंदवही ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र बहुतांश ग्रामपंचायतीत नोंदवही दिसून येत नाही. तसेच नोंदवही अडगळीच्या ठिकाणी पडलेली आहे.