शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीरावांना कॅबिनेट मंत्री करतो!

By admin | Updated: October 6, 2014 22:38 IST

नितीन गडकरी : कामेरीत सभा; नागपंचमी पूर्ववतसाठी मदतीची ग्वाही

कामेरी : संकटातून चालणाऱ्या महाराष्ट्राचे भवितव्य ठरविणारी ही विधानसभा निवडणूक आहे. सध्या महाराष्ट्रावर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. यातील मुद्दल व व्याज भागविल्यास राज्याच्या विकासासाठी पैसे कोठून आणायचे? हा मोठा प्रश्न सत्तेवर आल्यानंतर प्राधान्याने सोडवावा लागणार आहे. आघाडी शासनाने देशात पहिल्या क्रमांकावर असणारे राज्य सहाव्या क्रमांकावर आणून सोडले आहे. हीच जाणता राजाची कर्तबगारी समजायची का? असा सवाल भाजपचे केंद्रीय रस्ते व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित केला. याचवेळी त्यांनी शिवाजीराव नाईक यांना निवडून द्या, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्याची जबाबदारी माझी, अशी ग्वाहीही दिली.कामेरी (ता. वाळवा) येथे शिराळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. गडकरी म्हणाले की, जाणता राजा कृषिमंत्री असतानाच्या काळात महाराष्ट्राच्या शेतीचा विकास दर तीन टक्क्यापेक्षा खाली आला. त्यामुळे राज्याचा अव्वल नंबर सहाव्या नंबरपर्यंत घसरला. शेतकरी पेट्रोल, डिझेल, गॅस तयार करतील तरच, ग्रामीण भागात लाखो रोजगार उपलब्ध होतील. त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य केंद्र शासनामार्फत केले जाईल. शिवाजी महाराज कोणाची दौलत नाही, ते एक जाणता व धर्मनिरपेक्ष राजे म्हणून संपूर्ण देशापुढील आदर्श आहेत. राज्य कसे चालवावे, याचा आदर्श त्यांच्याकडूनच घेऊन महाराष्ट्रात शिवशाहीचे राज्य आणू. भाजपला मुस्लिमविरोधी असल्याचे भासवणाऱ्यांनी ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना आम्हीच राष्ट्रपती पदावर बसवले, हे लक्षात घ्यावे.शिवाजीराव नाईक म्हणाले की, ७८ हजार एकराला पाणी देणारी वाकुर्डे बुद्रुक योजना, चांदोली धरणाखालील मोकळ्या क्षेत्रामध्ये पैठणच्या धरतीवर मोठा बगीचा उभारून पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणे, मत्स्यबीज उत्पादन केंद्र उभारणे, देश-विदेशात जिवंत नागाच्या पूजेसाठी प्रसिध्द असणारी शिराळ्याची नागपंचमी पूर्ववत सुरू व्हावी यासाठी गडकरी यांनी सहकार्य करावे.खा. राजू शेट्टी, खा. संजय पाटील, नानासाहेब महाडिक, सदाभाऊ खोत, पृथ्वीराज देशमुख, दि. बा. पाटील, रणधीर नाईक, सुखदेव पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे यांची भाषणे झाली. यावेळी विक्रम पाटील, प्रताप पाटील, सचिन जाधव, सी. एच. पाटील, शहाजी पाटील, बंडाकाका पाटील, संताजी पाटील, पोपट पाटील, भगतसिंग शिंदे उपस्थित होते. शिक्षक नेते सदाशिव पाटील यांनी प्रास्ताविक केले. महेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)