शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

शिरटे : गेल्या २५ ते ३० वर्षांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:27 IST

शिरटे : गेल्या २५ ते ३० वर्षांत सुटले नाहीत ते धरणग्रस्तांचे प्रश्न येत्या काही दिवसांतच मार्गी लागण्याची व्यवस्था करण्यात ...

शिरटे : गेल्या २५ ते ३० वर्षांत सुटले नाहीत ते धरणग्रस्तांचे प्रश्न येत्या काही दिवसांतच मार्गी लागण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारकडून ८० टक्के व लोकवर्गणीतून २० टक्के रक्कम उभारुन क्षारपडीमुळे हातातून गेलेली शेतजमीन पुन्हा पिकाऊ व्हावी यासाठीचा धोरणात्मक निर्णय येत्या काही दिवसातच घेतला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे गोरक्षनाथ मंदिर पोखर्णी तलाव येथे भक्तनिवास इमारत व विकास कामांच्या उद‌्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, तालुकाध्यक्ष विजय पाटील, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, युवकअध्यक्ष संग्रामसिंह पाटील, महिला अध्यक्षा सुश्मिता जाधव, नीताताई पाटील, अलकाताई माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यातील प्रत्येक शाळेतून विद्यार्थ्यांना जातीचे दाखले देण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच जातपडताळीसुध्दा शाळेतूनच होण्यासाठी पाठपुरावा केला आहे. सरकारची तिजोरी मोकळी असली तरी येणाऱ्या अर्थसंकल्पात रितसर कर्ज भरणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी तरतूद केली जाणार आहे. पोखर्णीच्या तलावाचे संवर्धन, बांधकाम व रस्ते यासाठीच्या निधीची तरतूद लवकरच केली जाईल.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, माजी सभापती सचिन हुलवान यांनी मनोगत व्यक्त केले. उपसरपंच संदीप दबडे यांनी स्वागत केले. राजारामबापू बँकेचे संचालक ॲड. संग्राम पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. विकास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संजय पाटील यांनी आभार मानले.

यावेळी प्रकाश पाटील, अजित पाटील, दिलीपराव शेरेकर, हणमंतराव पाटील, सुरेश पाटील, शंभोराजे पवार आदी उपस्थित होते.

चौकट

कुठे गेले सरपंच...

येडेमच्छिंद्र येथे जयंत पाटील यांच्याहस्ते विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सरपंच गणेश हराळे यांची उपस्थिती होती. व्यासपीठावरील कार्यक्रमाकडे मात्र त्यांनी पाठ फिरविली. ही गोष्ट लक्षात येताच ‘उद्घाटनाला होते, मग कुठे गेले सरपंच.’ अशी टिप्पणी जयंत पाटील यांनी केली. यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

फोटो : १९ शिरटे १

अेाळ : येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते गोरक्षनाथ मंदिर भक्तनिवासचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित पाटील, दिलीप शेरेकर, सचिन हुलवान, संजय पाटील उपस्थित होते.