शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांच्या विरोधात दोघांनी ठोकला शड्डू...

By admin | Updated: August 26, 2014 23:56 IST

विधानसभा निवडणूक : वर्चस्वाचे प्रदर्शन

अशोक पाटील - इस्लामपूर  मतदारसंघात ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात महायुतीतील कोणत्याही घटकपक्षाला जागा मिळो, आपण निवडणूक लढविणारच, अशी भूमिका नानासाहेब महाडिक यांनी घेतली आहे, तर नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले भीमराव माने यांनीही जयंतरावांविरोधात शड्डू ठोकला आहे. दरम्यान, डिग्रज मंडलातील आठ गावात जयंत पाटील यांनी आघाडी घेतल्यास राजकीय संन्यास घेऊ, असा निर्धार माने यांनी केला आहे. भीमराव माने म्हणाले की, जयंतराव हे विश्वासघातकी राजकारण करतात. त्यांच्याजवळ जे जे गेले, त्यांचा त्यांनी फक्त वापर करुन घेतला आहे. त्यामुळे सर्व नाराज मंडळी जयंत पाटील यांच्याविरोधात एकत्र येणार आहेत. राष्ट्रवादीविरोधात जिल्ह्यात हवा आहे. याचाच फायदा महायुतीला होणार आहे. जयंत पाटील यांनीच मला शिवसेनेत पाठविले आहे, अशी चर्चा त्यांचेच समर्थक करीत आहेत. मी जयंत पाटील यांचा चेला नाही. राजकारणात मला गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीच काही कानमंत्र दिले आहेत. जयंत पाटील यांनी फक्त आश्वासनांपलीकडे काहीही दिलेले नाही. मी शिवसेनेत गेल्यानंतरच स्मारकासाठी त्यांनी निधी जाहीर करून त्याचे श्रेयही लाटले आहे. माझ्या पक्षबदलाच्या निर्णयाने जयंत पाटील आता आजूबाजूच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी डिग्रज मंडलातील आठ गावांतून त्यांना आघाडी मिळू देणार नाही. जर त्यांना मतांची आघाडी मिळाली, तर राजकीय संन्यास स्वीकारु, असेही माने यांनी स्पष्ट केले.याउलट महायुतीत मात्र अजूनही शांतताच आहे. महायुतीच्या जागा वाटपाच्या घोळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कमी जागा मिळणार असल्याने त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे खासदार राजू शेट्टी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत, त्यांच्यापुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्यातच नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक यांनी मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे.लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांना राजकारणातून हद्दपार करण्याचा विडा उचलला होता. परंतु यात त्यांना यश मिळाले नाही. त्याचवेळी राजू शेट्टी यांनी, विधानसभेला जयंत पाटील यांना हिसका दाखविणारच, असा इशारा दिला आहे. त्यामुळे इस्लामपूर विधानसभेची निवडणूक ही शेट्टी व जयंतरावांच्या प्रतिष्ठेचीही बनणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. परंतु अद्यापही महायुतीतील नेत्यांच्यात एकसंधपणा नसल्याने, राजू शेट्टी यांचा विरोध कितपत टिकेल्, याबाबत येणारा काळच सांगेल.