शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

कुपवाडमधील प्रस्तावित रुग्णालयाचा वाद शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:21 IST

सांगली : कुपवाड येथील प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचा वाद पुन्हा शिगेला पोहोचला आहे. प्रशासनाच्या बोटचेपी भूमिकेमुळे नगरसेवकांत संघर्ष उफाळून आला ...

सांगली : कुपवाड येथील प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचा वाद पुन्हा शिगेला पोहोचला आहे. प्रशासनाच्या बोटचेपी भूमिकेमुळे नगरसेवकांत संघर्ष उफाळून आला आहे. त्यात वारणाली येथील जागेत रुग्णालय उभारण्याचा ठराव महासभेत झाला होता. त्या ठरावाचे काय होणार? याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. एकूणच या प्रकरणात प्रशासनाच्या निर्णयक्षम भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.कुपवाड येथे पाच कोटी रुपये खर्चून मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयासाठी कुपवाड वारणाली येथील गट नं १९१/अ/१+२ ही जागा निश्चित करण्यात आली. या जागेत तीस बेडचे रुग्णालय बांधण्यासाठी आराखडाही तयार केला गेला. त्याला महासभेची मान्यता घेऊन शासनाच्या मंजुरीला पाठविण्यात आला. शासनानेही रुग्णालयाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. पण त्यानंतर पुन्हा रुग्णालयाचे काम रखडले. त्याला काही मुहूर्त लागला नाही. आता महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भाजपशी संबंधित नगरसेवकांनी जागा बदलासाठी प्रशासनावर दबाव आणण्यास सुरुवात केली. त्याला भाजपच्या लोकप्रतिनिधींचाही पाठिंबा मिळाला. त्यामुळे महापालिकेचे प्रशासन कोंडीत सापडले.कुपवाड रुग्णालयाची जागा बदलावरून बरेच वादविवाद झाले आहेत. अजूनही ते सुरूच आहेत. मुळात रुग्णालयासाठी खासगी जागा सूचविण्यात आली आहे. हीच जागा कशासाठी, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेकांच्या मनात जागेवरून शंकेची पालही चुकचुकत आहे. यापूर्वीही अशाच खासगी जागा महापालिकेच्या गळ्यात मारून अनेकांनी स्वत:चा स्वार्थ साधला होता. त्यामुळे तसाच प्रकार भाजपच्या सत्ताकाळातही सुरू झाला की काय? अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. त्यातच प्रशासनाने बोटचेपी भूमिका घेतली आहे. नगरसेवकांतील संघर्षात प्रशासनावर शिंतोडे उडू नये, यासाठी थेट जनतेकडूनच जागाबाबत मते मागविली आहेत. वास्तविक जागेचा निर्णय घेण्याची मुख्य जबाबदारी प्रशासनाची आहे. महापालिकेच्या हितासाठी कोणती जागा उपयुक्त आहे, हे प्रशासन आपल्या अधिकारात निश्चित करू शकते. पण या प्रकरणात प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आत्मविश्वास व निर्णयक्षमताच गमाविल्याचे स्पष्ट दिसते.त्यात महासभेचा ठराव होऊन तीन ते चार वर्षे लोटली आहेत. याच ठरावानुसार शासनानेही रुग्णालयाला मंजुरीसह निधी दिला आहे. त्यामुळे हा ठराव रद्द करावा लागेल. त्यासाठी पुन्हा महासभेसमोर विषय आणावा लागेल. महासभेच्या मंजुरीनंतर पुन्हा शासनाची मंजुरी घ्यावी लागेल. त्यात बराच कालावधी जाऊ शकतो. त्यामुळे रुग्णालयाच्या जागेचा वाद मिटला तरी नवीन समस्या निर्माण होणारच आहेत.आचारसंहितेतच घाई : भूमिकेबद्दल संशयसध्या लोकसभेची आचारसंहिता लागू आहे. आचारसंहिता शिथिल झालेली नाही. केवळ दुष्काळी उपाययोजनांबाबत निवडणूक आयोगाकडून सूचना आलेल्या आहेत. अशा स्थितीत महापालिका प्रशासनाने वृत्तपत्रातून जाहीर निवेदन देऊन जागेबाबत जनतेचे मत मागविले आहे. त्यासाठी सात दिवसांचा कालावधी दिला आहे. आचारसंहिता संपण्यापूर्वीच प्रशासनाला हा प्रश्न निकाली काढण्याची गडबड लागली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबतही संशय निर्माण होत आहे.