शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडमधील प्रस्तावित रुग्णालयाचा वाद शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:21 IST

सांगली : कुपवाड येथील प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचा वाद पुन्हा शिगेला पोहोचला आहे. प्रशासनाच्या बोटचेपी भूमिकेमुळे नगरसेवकांत संघर्ष उफाळून आला ...

सांगली : कुपवाड येथील प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचा वाद पुन्हा शिगेला पोहोचला आहे. प्रशासनाच्या बोटचेपी भूमिकेमुळे नगरसेवकांत संघर्ष उफाळून आला आहे. त्यात वारणाली येथील जागेत रुग्णालय उभारण्याचा ठराव महासभेत झाला होता. त्या ठरावाचे काय होणार? याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. एकूणच या प्रकरणात प्रशासनाच्या निर्णयक्षम भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.कुपवाड येथे पाच कोटी रुपये खर्चून मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयासाठी कुपवाड वारणाली येथील गट नं १९१/अ/१+२ ही जागा निश्चित करण्यात आली. या जागेत तीस बेडचे रुग्णालय बांधण्यासाठी आराखडाही तयार केला गेला. त्याला महासभेची मान्यता घेऊन शासनाच्या मंजुरीला पाठविण्यात आला. शासनानेही रुग्णालयाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. पण त्यानंतर पुन्हा रुग्णालयाचे काम रखडले. त्याला काही मुहूर्त लागला नाही. आता महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भाजपशी संबंधित नगरसेवकांनी जागा बदलासाठी प्रशासनावर दबाव आणण्यास सुरुवात केली. त्याला भाजपच्या लोकप्रतिनिधींचाही पाठिंबा मिळाला. त्यामुळे महापालिकेचे प्रशासन कोंडीत सापडले.कुपवाड रुग्णालयाची जागा बदलावरून बरेच वादविवाद झाले आहेत. अजूनही ते सुरूच आहेत. मुळात रुग्णालयासाठी खासगी जागा सूचविण्यात आली आहे. हीच जागा कशासाठी, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेकांच्या मनात जागेवरून शंकेची पालही चुकचुकत आहे. यापूर्वीही अशाच खासगी जागा महापालिकेच्या गळ्यात मारून अनेकांनी स्वत:चा स्वार्थ साधला होता. त्यामुळे तसाच प्रकार भाजपच्या सत्ताकाळातही सुरू झाला की काय? अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. त्यातच प्रशासनाने बोटचेपी भूमिका घेतली आहे. नगरसेवकांतील संघर्षात प्रशासनावर शिंतोडे उडू नये, यासाठी थेट जनतेकडूनच जागाबाबत मते मागविली आहेत. वास्तविक जागेचा निर्णय घेण्याची मुख्य जबाबदारी प्रशासनाची आहे. महापालिकेच्या हितासाठी कोणती जागा उपयुक्त आहे, हे प्रशासन आपल्या अधिकारात निश्चित करू शकते. पण या प्रकरणात प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आत्मविश्वास व निर्णयक्षमताच गमाविल्याचे स्पष्ट दिसते.त्यात महासभेचा ठराव होऊन तीन ते चार वर्षे लोटली आहेत. याच ठरावानुसार शासनानेही रुग्णालयाला मंजुरीसह निधी दिला आहे. त्यामुळे हा ठराव रद्द करावा लागेल. त्यासाठी पुन्हा महासभेसमोर विषय आणावा लागेल. महासभेच्या मंजुरीनंतर पुन्हा शासनाची मंजुरी घ्यावी लागेल. त्यात बराच कालावधी जाऊ शकतो. त्यामुळे रुग्णालयाच्या जागेचा वाद मिटला तरी नवीन समस्या निर्माण होणारच आहेत.आचारसंहितेतच घाई : भूमिकेबद्दल संशयसध्या लोकसभेची आचारसंहिता लागू आहे. आचारसंहिता शिथिल झालेली नाही. केवळ दुष्काळी उपाययोजनांबाबत निवडणूक आयोगाकडून सूचना आलेल्या आहेत. अशा स्थितीत महापालिका प्रशासनाने वृत्तपत्रातून जाहीर निवेदन देऊन जागेबाबत जनतेचे मत मागविले आहे. त्यासाठी सात दिवसांचा कालावधी दिला आहे. आचारसंहिता संपण्यापूर्वीच प्रशासनाला हा प्रश्न निकाली काढण्याची गडबड लागली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबतही संशय निर्माण होत आहे.