शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षाच्या शिवारात शेट्टी-खोत यांची पायपीट

By admin | Updated: May 28, 2017 23:51 IST

संघर्षाच्या शिवारात शेट्टी-खोत यांची पायपीट

अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश पदयात्रेत खासदार राजू शेट्टी यांच्या पायाला फोड आले तरीही ते मागे हटले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही शेट्टींना सहानुभूती मिळत आहे. याउलट कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपबरोबर गटबंधन घट्ट करीत शेतकऱ्यांच्या शिवारात पायी चालून चळवळीला ताकद देण्याचा प्रयत्न चालवला आहे. संघर्षाच्या शिवारात दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या पायवाटा निवडत शेतकरी चळवळीची कास धरली असल्याचे चित्र आहे. दरम्यान, सोमवारी होणाऱ्या भाजपच्या शेतकरी मेळाव्यात इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील हे शहराच्या विकासासाठीच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.कृष्णा-वारणा खोऱ्यातील ऊस उत्पादक उसासह कमी काळात उत्पन्न देणाऱ्या नगदी पिकाकडे वळू लागला आहे. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील शेतकरी चांगलाच सधन होत चालला आहे. अनेकांनी ग्रीन हाऊस, पॉली हाऊसच्या माध्यमातून आधुनिक शेतीची कास धरली आहे. त्यामुळे पूर्वीच्या प्रमाणात आता शेतकरी संघटनांना शेतकऱ्यांची साथ मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे या शेतकरी नेत्यांना आता आपला भाग सोडून आपला मोर्चा विदर्भ, मराठवाड्यात वळवावा लागला आहे. त्यातूनही जे काही शेतकरी या संघटनांच्या पाठीशी आहेत, त्यांच्या जिवावर शेट्टी आणि खोत यांचे राजकारण सुरू आहे. अलीकडील काळात त्यांच्यात पडलेल्या दरीचे राजकारणही आता चांगलेच रंगले आहे. त्याचाच फायदा भाजप उठवण्याचा प्रयत्न करत आहे.इस्लामपूर पालिकेवर एक हुकमी सत्ता असलेल्या आमदार जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असलेल्या निशिकांत पाटील यांनी ऐन पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात सक्रिय असलेल्या विकास आघाडीशी हातमिळवणी केली. त्यावेळीच भविष्यात निशिकांत पाटील भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे स्पष्ट होते. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने पालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांना निधीची कमतरता पडू नये, यासाठीच निशिकांत पाटील हे सोमवार, दि. २९ रोजी होणाऱ्या भाजपच्या शेतकरी मेळाव्यात भाजपवासी होणार आहेत.भाजप प्रवेशाबाबत ‘लोकमत’शी बोलताना निशिकांत पाटील म्हणाले, गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ इस्लामपूर शहराने आ. जयंत पाटील यांच्याकडे सत्ता दिली होती. परंतु त्यांच्याकडून शहराचा म्हणावा असा विकास झाला नाही. मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होतो. राष्ट्रवादीतून बाहेर पडताना मला खूप यातना झाल्या. शहराच्या विकासासाठीच आपण विरोधाची भूमिका घेत निवडणूक लढवली. भविष्यात होणाऱ्या भुयारी गटर योजना, २४ बाय ७ नळ पाणी योजना, शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण, चौक सुशोभिकरण आदी प्रमुख कामांसह रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी १०० कोटींहून अधिक निधीची गरज आहे. त्यासाठीच आपण भाजपात प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. शहराचा विकास हाच ध्यास आहे. शहराबाहेर जाऊन राजकारण करण्याचा उद्देश नाही. इस्लामपूरचा सर्वांगीण विकास हाच उद्देश असणार आहे.वाळू तस्कर झाले मालामालकृष्णा खोऱ्यातील मोठे वाळू तस्कर राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते म्हणून सक्रिय आहेत. गेल्या ३० वर्षांत आ. जयंत पाटील यांच्या कृपेने ते मालामाल झाले आहेत. तेच आता वाळू ठेकेदार स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी मंत्री सदाभाऊ खोत यांना चिकटले आहेत. ते सोमवारच्या कार्यक्रमात भाजपमध्ये येणार होते. परंतु या वाळू तस्करांची अवस्था आता ‘तेलही गेले, तूपही गेले....’ अशी झाली आहे.करेक्ट कार्यक्रम करण्याचा प्रयत्न विद्यमान आ. जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी वाळवा तालुक्यातील माजी आ. विलासराव शिंदे यांना भाजपमध्ये आणण्यासाठी खोत यांनी मोठे प्रयत्न केले; परंतु यामध्ये ते सपशेल फेल झाले आहेत. शिंदे यांच्यासह त्यांनी हुतात्मा संकुल, कामेरीचे ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील, वैभव पवार, राष्ट्रवादीतील काही नगरसेवक, पेठनाक्यावरील महाडिक गटाचे काही मोहरे टिपण्यासाठी प्रयत्न केले. आता यातील कोणते चेहरे सोमवारच्या कार्यक्रमात भाजपमध्ये जाणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.