शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

संघर्षाच्या शिवारात शेट्टी-खोत यांची पायपीट

By admin | Updated: May 28, 2017 23:51 IST

संघर्षाच्या शिवारात शेट्टी-खोत यांची पायपीट

अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश पदयात्रेत खासदार राजू शेट्टी यांच्या पायाला फोड आले तरीही ते मागे हटले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही शेट्टींना सहानुभूती मिळत आहे. याउलट कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपबरोबर गटबंधन घट्ट करीत शेतकऱ्यांच्या शिवारात पायी चालून चळवळीला ताकद देण्याचा प्रयत्न चालवला आहे. संघर्षाच्या शिवारात दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या पायवाटा निवडत शेतकरी चळवळीची कास धरली असल्याचे चित्र आहे. दरम्यान, सोमवारी होणाऱ्या भाजपच्या शेतकरी मेळाव्यात इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील हे शहराच्या विकासासाठीच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.कृष्णा-वारणा खोऱ्यातील ऊस उत्पादक उसासह कमी काळात उत्पन्न देणाऱ्या नगदी पिकाकडे वळू लागला आहे. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील शेतकरी चांगलाच सधन होत चालला आहे. अनेकांनी ग्रीन हाऊस, पॉली हाऊसच्या माध्यमातून आधुनिक शेतीची कास धरली आहे. त्यामुळे पूर्वीच्या प्रमाणात आता शेतकरी संघटनांना शेतकऱ्यांची साथ मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे या शेतकरी नेत्यांना आता आपला भाग सोडून आपला मोर्चा विदर्भ, मराठवाड्यात वळवावा लागला आहे. त्यातूनही जे काही शेतकरी या संघटनांच्या पाठीशी आहेत, त्यांच्या जिवावर शेट्टी आणि खोत यांचे राजकारण सुरू आहे. अलीकडील काळात त्यांच्यात पडलेल्या दरीचे राजकारणही आता चांगलेच रंगले आहे. त्याचाच फायदा भाजप उठवण्याचा प्रयत्न करत आहे.इस्लामपूर पालिकेवर एक हुकमी सत्ता असलेल्या आमदार जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असलेल्या निशिकांत पाटील यांनी ऐन पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात सक्रिय असलेल्या विकास आघाडीशी हातमिळवणी केली. त्यावेळीच भविष्यात निशिकांत पाटील भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे स्पष्ट होते. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने पालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांना निधीची कमतरता पडू नये, यासाठीच निशिकांत पाटील हे सोमवार, दि. २९ रोजी होणाऱ्या भाजपच्या शेतकरी मेळाव्यात भाजपवासी होणार आहेत.भाजप प्रवेशाबाबत ‘लोकमत’शी बोलताना निशिकांत पाटील म्हणाले, गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ इस्लामपूर शहराने आ. जयंत पाटील यांच्याकडे सत्ता दिली होती. परंतु त्यांच्याकडून शहराचा म्हणावा असा विकास झाला नाही. मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होतो. राष्ट्रवादीतून बाहेर पडताना मला खूप यातना झाल्या. शहराच्या विकासासाठीच आपण विरोधाची भूमिका घेत निवडणूक लढवली. भविष्यात होणाऱ्या भुयारी गटर योजना, २४ बाय ७ नळ पाणी योजना, शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण, चौक सुशोभिकरण आदी प्रमुख कामांसह रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी १०० कोटींहून अधिक निधीची गरज आहे. त्यासाठीच आपण भाजपात प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. शहराचा विकास हाच ध्यास आहे. शहराबाहेर जाऊन राजकारण करण्याचा उद्देश नाही. इस्लामपूरचा सर्वांगीण विकास हाच उद्देश असणार आहे.वाळू तस्कर झाले मालामालकृष्णा खोऱ्यातील मोठे वाळू तस्कर राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते म्हणून सक्रिय आहेत. गेल्या ३० वर्षांत आ. जयंत पाटील यांच्या कृपेने ते मालामाल झाले आहेत. तेच आता वाळू ठेकेदार स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी मंत्री सदाभाऊ खोत यांना चिकटले आहेत. ते सोमवारच्या कार्यक्रमात भाजपमध्ये येणार होते. परंतु या वाळू तस्करांची अवस्था आता ‘तेलही गेले, तूपही गेले....’ अशी झाली आहे.करेक्ट कार्यक्रम करण्याचा प्रयत्न विद्यमान आ. जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी वाळवा तालुक्यातील माजी आ. विलासराव शिंदे यांना भाजपमध्ये आणण्यासाठी खोत यांनी मोठे प्रयत्न केले; परंतु यामध्ये ते सपशेल फेल झाले आहेत. शिंदे यांच्यासह त्यांनी हुतात्मा संकुल, कामेरीचे ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील, वैभव पवार, राष्ट्रवादीतील काही नगरसेवक, पेठनाक्यावरील महाडिक गटाचे काही मोहरे टिपण्यासाठी प्रयत्न केले. आता यातील कोणते चेहरे सोमवारच्या कार्यक्रमात भाजपमध्ये जाणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.