शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

संघर्षाच्या शिवारात शेट्टी-खोत यांची पायपीट

By admin | Updated: May 28, 2017 23:51 IST

संघर्षाच्या शिवारात शेट्टी-खोत यांची पायपीट

अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश पदयात्रेत खासदार राजू शेट्टी यांच्या पायाला फोड आले तरीही ते मागे हटले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही शेट्टींना सहानुभूती मिळत आहे. याउलट कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपबरोबर गटबंधन घट्ट करीत शेतकऱ्यांच्या शिवारात पायी चालून चळवळीला ताकद देण्याचा प्रयत्न चालवला आहे. संघर्षाच्या शिवारात दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या पायवाटा निवडत शेतकरी चळवळीची कास धरली असल्याचे चित्र आहे. दरम्यान, सोमवारी होणाऱ्या भाजपच्या शेतकरी मेळाव्यात इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील हे शहराच्या विकासासाठीच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.कृष्णा-वारणा खोऱ्यातील ऊस उत्पादक उसासह कमी काळात उत्पन्न देणाऱ्या नगदी पिकाकडे वळू लागला आहे. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील शेतकरी चांगलाच सधन होत चालला आहे. अनेकांनी ग्रीन हाऊस, पॉली हाऊसच्या माध्यमातून आधुनिक शेतीची कास धरली आहे. त्यामुळे पूर्वीच्या प्रमाणात आता शेतकरी संघटनांना शेतकऱ्यांची साथ मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे या शेतकरी नेत्यांना आता आपला भाग सोडून आपला मोर्चा विदर्भ, मराठवाड्यात वळवावा लागला आहे. त्यातूनही जे काही शेतकरी या संघटनांच्या पाठीशी आहेत, त्यांच्या जिवावर शेट्टी आणि खोत यांचे राजकारण सुरू आहे. अलीकडील काळात त्यांच्यात पडलेल्या दरीचे राजकारणही आता चांगलेच रंगले आहे. त्याचाच फायदा भाजप उठवण्याचा प्रयत्न करत आहे.इस्लामपूर पालिकेवर एक हुकमी सत्ता असलेल्या आमदार जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असलेल्या निशिकांत पाटील यांनी ऐन पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात सक्रिय असलेल्या विकास आघाडीशी हातमिळवणी केली. त्यावेळीच भविष्यात निशिकांत पाटील भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे स्पष्ट होते. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने पालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांना निधीची कमतरता पडू नये, यासाठीच निशिकांत पाटील हे सोमवार, दि. २९ रोजी होणाऱ्या भाजपच्या शेतकरी मेळाव्यात भाजपवासी होणार आहेत.भाजप प्रवेशाबाबत ‘लोकमत’शी बोलताना निशिकांत पाटील म्हणाले, गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ इस्लामपूर शहराने आ. जयंत पाटील यांच्याकडे सत्ता दिली होती. परंतु त्यांच्याकडून शहराचा म्हणावा असा विकास झाला नाही. मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होतो. राष्ट्रवादीतून बाहेर पडताना मला खूप यातना झाल्या. शहराच्या विकासासाठीच आपण विरोधाची भूमिका घेत निवडणूक लढवली. भविष्यात होणाऱ्या भुयारी गटर योजना, २४ बाय ७ नळ पाणी योजना, शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण, चौक सुशोभिकरण आदी प्रमुख कामांसह रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी १०० कोटींहून अधिक निधीची गरज आहे. त्यासाठीच आपण भाजपात प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. शहराचा विकास हाच ध्यास आहे. शहराबाहेर जाऊन राजकारण करण्याचा उद्देश नाही. इस्लामपूरचा सर्वांगीण विकास हाच उद्देश असणार आहे.वाळू तस्कर झाले मालामालकृष्णा खोऱ्यातील मोठे वाळू तस्कर राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते म्हणून सक्रिय आहेत. गेल्या ३० वर्षांत आ. जयंत पाटील यांच्या कृपेने ते मालामाल झाले आहेत. तेच आता वाळू ठेकेदार स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी मंत्री सदाभाऊ खोत यांना चिकटले आहेत. ते सोमवारच्या कार्यक्रमात भाजपमध्ये येणार होते. परंतु या वाळू तस्करांची अवस्था आता ‘तेलही गेले, तूपही गेले....’ अशी झाली आहे.करेक्ट कार्यक्रम करण्याचा प्रयत्न विद्यमान आ. जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी वाळवा तालुक्यातील माजी आ. विलासराव शिंदे यांना भाजपमध्ये आणण्यासाठी खोत यांनी मोठे प्रयत्न केले; परंतु यामध्ये ते सपशेल फेल झाले आहेत. शिंदे यांच्यासह त्यांनी हुतात्मा संकुल, कामेरीचे ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील, वैभव पवार, राष्ट्रवादीतील काही नगरसेवक, पेठनाक्यावरील महाडिक गटाचे काही मोहरे टिपण्यासाठी प्रयत्न केले. आता यातील कोणते चेहरे सोमवारच्या कार्यक्रमात भाजपमध्ये जाणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.