शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शेट्टींकडून सत्तेसाठी शेतकऱ्यांचा विश्वासघात

By admin | Updated: October 15, 2015 00:35 IST

पंजाबराव पाटील : एफआरपीसाठी बळिराजा संघटना रस्त्यावर उतरणार

इस्लामपूर : गेल्या दहा वर्षांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी ऊसदराची आंदोलने केली. तेच शेट्टी आता सत्ता, संपत्ती, मंत्रिपदाच्या लाभासाठी आंदोलनाला बगल देऊन शेतकऱ्यांचा विश्वासघात करीत आहेत, असा घणाघाती आरोप बळिराजा शेतकरी संघटनेचे नेते पंजाबराव पाटील यांनी बुधवारी केला.इस्लामपूर येथे न्यायालयीन कामकाजासाठी आल्यावर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, उसाच्या एफआरपीनुसार दर देण्यावरून सरकार, कारखानदारांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. खा. शेट्टी आता शेतकऱ्यांविषयी बेगडी कळवळा दाखवून मतदारसंघ टिकवून ठेवत आहेत. त्यामुळे एफआरपीसाठी बळिराजा संघटना रस्त्यावर उतरेल. प्रसंगी त्यासाठी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावू.पाटील म्हणाले की, मंत्री समितीच्या बैठकीत खा. शेट्टी सरकार व कारखानदारांच्या निर्णयाला मान्यता देतात. यावरून त्यांना आता शेतकऱ्यांशी काही देणे-घेणे नसल्याचे स्पष्ट होते. मंत्रिपदासाठी सरकारची मर्जी सांभाळताना ते आता शेतकऱ्यांच्या विश्वासघात करीत आहेत. निवडणुकीपूर्वी भाजपने ऊस आंदोलनातील खटले मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर काहीच निर्णय नाही. बी. जी. पाटील म्हणाले, जात, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन काम करणारी चळवळ मोडण्याचे काम खा. शेट्टी व सदाभाऊ खोत करीत आहेत. शेतकऱ्याला किमान हमीभाव देता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खा. शेट्टी मिठ्या मारत आहेत. मग ही मिठी शेतकऱ्यांना मारण्यासाठी आहे का? आघाडी सरकारच्या काळात खा. शेट्टी तीव्र आंदोलन करायचे. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीला बदनाम करण्याची सुपारी खा. शेट्टी यांनी भाजपकडून घेतली होती का? अशी शंका येते. सत्ता, संपत्तीच्या लाभासाठी ते भाजपच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. यावेळी चंद्रकांत जाधव, उत्तम साळुंखे, साजीद मुल्ला, बाबासाहेब मोहिते, अशोक सलगर, विक्रम थोरात, दीपक पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)बांधकाम कामाची गुणवत्ता तपासावीबी. जी. पाटील म्हणाले की, मोर्चा काढण्याच्या नावाखाली खा. शेट्टींकडून भावनेशी खेळ सुरू आहे. ऊस बिलातून शेतकऱ्यांचे पैसे कपात करण्यासाठी आ. जयंत पाटील व खा. शेट्टी यांचे साटेलोटे आहे. जिल्हा बँकेत दिलीप पाटील यांची भेट घेऊन हे कपातीचे कुभांड रचले गेले आहे. शेट्टी व जयंत पाटील यांच्या पिलावळीची बांधकाम खात्यात चलती आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या बांधकामाची गुणवत्ता तपासली पाहिजे.