शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

शेटफळे दोन दिवसांपासून अंधारात; संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग राेखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST

करगणी : शेटफळे (ता.आटपाडी) गाव दोन दिवसांपासून अंधारात असून, संतप्त ग्रामस्थांनी दिघंची-हेरवाड महामार्ग अडवत वाहतूक बंद केली. महावितरण व ...

करगणी : शेटफळे (ता.आटपाडी) गाव दोन दिवसांपासून अंधारात असून, संतप्त ग्रामस्थांनी दिघंची-हेरवाड महामार्ग अडवत वाहतूक बंद केली. महावितरण व महामार्ग बनविणारी कंपनी यांच्या वादामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे.

शेटफळेतून दिघंची-हेरवाड महामार्ग जात आहे. या महामार्गाचे काम राजपथ इन्फ्रा कंपनी करत असून, शेटफळे गावातून सिमेंट काँक्रिटचा रस्ता बनत आहे. मात्र, या महामार्गातच अनेक विजेचे खांब आहेत. ते तसेच ठेऊन सिमेंट काँक्रिटचा रस्ता बनविला गेला आहे. दरम्यान, शनिवारी एक मालवाहतूक ट्रक विजेच्या खांबावर आदळल्याने दोन दिवसांपासून निम्मे गाव अंधारात आहे. महामार्ग बनवत असताना, विजेचे खांब महामार्गाच्या बाजूला घेणे गरजेचे असताना, राजपथ कंपनीने महामार्गातच विजेचे खांब कायम ठेवून काम केले आहे. महावितरण कंपनीने विजेचे खांब सुरक्षित ठिकाणी हलवूनच महामार्गाचे काम करण्याच्या सूचना देणे गरजेचे होते. मात्र, महावितरणकडूनही याबाबत दुर्लक्ष करण्यात आले. याचा फटका ग्रामस्थांना बसत असून, दोन दिवसांपासून गाव अंधारात असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.