शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

शेटफळे दोन दिवसांपासून अंधारात; संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग राेखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST

करगणी : शेटफळे (ता.आटपाडी) गाव दोन दिवसांपासून अंधारात असून, संतप्त ग्रामस्थांनी दिघंची-हेरवाड महामार्ग अडवत वाहतूक बंद केली. महावितरण व ...

करगणी : शेटफळे (ता.आटपाडी) गाव दोन दिवसांपासून अंधारात असून, संतप्त ग्रामस्थांनी दिघंची-हेरवाड महामार्ग अडवत वाहतूक बंद केली. महावितरण व महामार्ग बनविणारी कंपनी यांच्या वादामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे.

शेटफळेतून दिघंची-हेरवाड महामार्ग जात आहे. या महामार्गाचे काम राजपथ इन्फ्रा कंपनी करत असून, शेटफळे गावातून सिमेंट काँक्रिटचा रस्ता बनत आहे. मात्र, या महामार्गातच अनेक विजेचे खांब आहेत. ते तसेच ठेऊन सिमेंट काँक्रिटचा रस्ता बनविला गेला आहे. दरम्यान, शनिवारी एक मालवाहतूक ट्रक विजेच्या खांबावर आदळल्याने दोन दिवसांपासून निम्मे गाव अंधारात आहे. महामार्ग बनवत असताना, विजेचे खांब महामार्गाच्या बाजूला घेणे गरजेचे असताना, राजपथ कंपनीने महामार्गातच विजेचे खांब कायम ठेवून काम केले आहे. महावितरण कंपनीने विजेचे खांब सुरक्षित ठिकाणी हलवूनच महामार्गाचे काम करण्याच्या सूचना देणे गरजेचे होते. मात्र, महावितरणकडूनही याबाबत दुर्लक्ष करण्यात आले. याचा फटका ग्रामस्थांना बसत असून, दोन दिवसांपासून गाव अंधारात असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.