शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
3
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
4
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
5
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
6
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
8
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
9
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
10
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
11
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
12
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
13
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
14
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
15
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
16
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
17
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
18
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
19
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
20
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...

शेटफळे दोन दिवसांपासून अंधारात; संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग राेखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST

करगणी : शेटफळे (ता.आटपाडी) गाव दोन दिवसांपासून अंधारात असून, संतप्त ग्रामस्थांनी दिघंची-हेरवाड महामार्ग अडवत वाहतूक बंद केली. महावितरण व ...

करगणी : शेटफळे (ता.आटपाडी) गाव दोन दिवसांपासून अंधारात असून, संतप्त ग्रामस्थांनी दिघंची-हेरवाड महामार्ग अडवत वाहतूक बंद केली. महावितरण व महामार्ग बनविणारी कंपनी यांच्या वादामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे.

शेटफळेतून दिघंची-हेरवाड महामार्ग जात आहे. या महामार्गाचे काम राजपथ इन्फ्रा कंपनी करत असून, शेटफळे गावातून सिमेंट काँक्रिटचा रस्ता बनत आहे. मात्र, या महामार्गातच अनेक विजेचे खांब आहेत. ते तसेच ठेऊन सिमेंट काँक्रिटचा रस्ता बनविला गेला आहे. दरम्यान, शनिवारी एक मालवाहतूक ट्रक विजेच्या खांबावर आदळल्याने दोन दिवसांपासून निम्मे गाव अंधारात आहे. महामार्ग बनवत असताना, विजेचे खांब महामार्गाच्या बाजूला घेणे गरजेचे असताना, राजपथ कंपनीने महामार्गातच विजेचे खांब कायम ठेवून काम केले आहे. महावितरण कंपनीने विजेचे खांब सुरक्षित ठिकाणी हलवूनच महामार्गाचे काम करण्याच्या सूचना देणे गरजेचे होते. मात्र, महावितरणकडूनही याबाबत दुर्लक्ष करण्यात आले. याचा फटका ग्रामस्थांना बसत असून, दोन दिवसांपासून गाव अंधारात असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.