शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

‘ती’ १७ गावेही दुष्काळग्रस्त यादीत घेणार

By admin | Updated: May 17, 2016 01:47 IST

विजय देशमुख

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील वंचित १७ गावांचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समावेश करण्यात येणार असून, कडेगाव तालुक्यातील ३९ दुष्काळी गावांसाठी उर्वरित ८६ लाख १३ हजारांचे अनुदान तातडीने देऊ, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री विजय देशमुख यांनी दिले. कडेगाव तहसील कार्यालय येथे देशमुख यांनी लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, गोपीचंद पडळकर, आदी उपस्थित होते.देशमुख यांनी कडेगाव बसस्थानकाचे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. जि. प. सदस्य सुरेश मोहिते यांनी कडेगाव तालुक्यातील १७ गावांचा समावेश दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत करण्याबाबतची मागणी केली. यावर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा करून या १७ गावांचा समावेश दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.यावेळी राजाराम गरुड यांनी कडेगाव तलावात टेंभू योजनेचे पुरेसे पाणी सोडले जात नाही. याकडे लक्ष वेधले. देशमुख यांनी तालुक्याचे ठिकाण असलेल्या कडेगाव तलावात पाणी सोडण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. परंतु, याबरोबरच शिवाजीनगरपासून पुढील नेर्ली, अपशिंगे, कोतवडे, खांबाळे, तडसर गावांना पाणी कमी पडू नये, याची दक्षता घ्यावी, असेही सांगितले.ताकारी योजनेची शिरसगाव हद्दीतील गळती वारंवार सूचना करूनही काढली जात नाही, असे सरपंच सतीश मांडके यांनी सांगितले. याबाबत योजनेच्या अधिकाऱ्यांना लक्ष घालण्यास विजय देशमुख यांनी सांगितले. कृषी विभागाचे अधिकारी नामदेव पिंजारी यांनी कामाबाबत माहिती दिली. यावेळी पृथ्वीराज देशमुख व उपस्थित ग्रामस्थांनी (पान ८ वर)