तांदूळवाडी : गावाला विविध नागरी सुविधा देत गावाच्या विकासाला निश्चित आकार देणारी संस्था म्हणजे ग्रामपंचायत आहे. आपल्या गावात गावाच्या वैभवात भर घालणारी ग्रामपंचायतीची इमारत उभी राहत आहे. या नव्या इमारतीतून लोकाभिमुख सेवा द्या, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
तांदूळवाडी (ता. वाळवा) येथे ग्राम सचिवालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन व गावातील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरण कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार मानसिंगराव नाईक अध्यक्षस्थानी होते. या वेळी जिल्हा बँकेचे संचालक बी. के. पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव भीमरावआण्णा पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, सरपंच रमेश पाटील आदी उपस्थित होते. या वेळी उद्योजक शैलेश पाटील तसेच जाधव व शेळके कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमात गावातील कोरोना योद्धे व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या ताकदीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत चांगले यश मिळेल.
मानसिंगराव नाईक म्हणाले, नूतन इमारतीस जिल्हा नियोजनमधून २० लाखांचा निधी दिला आहे. अंतर्गत रस्त्यांच्या सुधारणेसाठी चाैदाव्या वित्त आयोगातून २० लाख रुपयांचा निधी दिला आहे.
भीमरावआण्णा पाटील यांनीही मनाेगत व्यक्त केले. या वेळी डॉ. दिलीप पाटील, डॉ. प्रभाकर पाटील, डॉ. अमित माने, भारती लोहार, सुनीता चौगुले, विश्वास पाटील, वैशाली पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
माजी उपसरपंच अर्जुन पाटील यांनी स्वागत केले. याप्रसंगी माजी सभापती ॲड. विश्वासराव पाटील, वारणेचे संचालक किशोर पाटील, राजारामबापू कारखान्याचे संचालक दिलीपराव पाटील, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारे, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी रवींद्र पवार, प्रताप पाटील, जयसिंग पाटील उपस्थित होते. संदीप शिंदे यांनी आभार मानले.
फोटो : १८ तांदूळवाडी १
ओळी : तांदूळवाडी (ता. वाळवा) येथील ग्राम सचिवालय इमारतीचे भूमिपूजन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार मानसिंगराव नाईक, भीमराव पाटील, सरपंच रमेश पाटील, प्रताप पाटील, राजाराम पाटील, अर्जुन पाटील उपस्थित हाेते.