शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
2
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
3
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
4
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
5
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
6
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
8
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
9
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
10
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
11
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
12
भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
13
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
14
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
15
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
16
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
17
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
18
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
19
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
20
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स

शांतीसागर महाराजांनी जैन धर्माची पताका देशभर फडकवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:31 IST

सांगली : आपल्या अलौकिक कार्याने आचार्य शांतीसागर महाराज यांनी देशभर जैन धर्माची पताका फडकवली, असे गौरवोद्गार पंचम पट्टाधीश प.पू. ...

सांगली : आपल्या अलौकिक कार्याने आचार्य शांतीसागर महाराज यांनी देशभर जैन धर्माची पताका फडकवली, असे गौरवोद्गार पंचम पट्टाधीश प.पू. १०८ आचार्य वर्धमानसागर महाराज यांनी काढले.

दक्षिण भारत जैन सभा, वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या वतीने चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य प. पू. १०८ श्री शांतिसागर महाराज यांची ६६ वी पुण्यतिथी पार पडली. वीर सेवा दल व समस्त दिगंबर जैन समाज, कोथळी कुप्पनवाडी यांच्यावतीने ऑनलाईन सवांद आयोजित केला होता, अशी माहिती वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष शशिकांत राजोबा यांनी सांगितले.

सकाळी १०८ णमोकार महामंत्राचे जाप्य व विश्वशांती प्रार्थना करण्यात आली. शांतिसागर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व शांती दीपप्रज्वलन करण्यात आले. शांतिसागर महाराज यांनी त्यांच्याच मुखातून सल्लेखनाच्या २६ व्या दिवशी दिलेला अंतिम उपदेश वीर सेवा दल या फेसबुकवरून लाईव्ह करण्यात आला. जन्मभूमी भोज येथून आलेल्या शांतिकलशाचे स्वागत करून धर्मानुरागी सुरेंद्र पिटके यांच्याहस्ते ध्वजारोहण होऊन वर्धमानसागर महाराज यांच्या व संघस्थ त्यागी, आर्यिका यांच्या पचांमृत अभिषेक करण्यात आला.

यावेळी वर्धमानसागर महाराज म्हणाले की, शांतिसागर महाराजांनी आपल्या विहारात जल आणि वायू यांचा त्याग केला. पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर पायी विहार करून सर्व अडचणींवर संयम व शांतीच्या मार्गाने मात करून जैन धर्माची पताका देशभर फिरविला. आयुष्यातील २७ वर्षांहून अधिक काळ उपवास करून तप साधना केली. वीर सेवा दल हे गेली ४० वर्षे प्रथमाचार्य शांतिसागरजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करते ही बाब कौतुकास्पद आहे. तसेच व्यसनमुक्ती, वृक्षारोपण व सामाजिक कार्य करीत आहे. ही परंपरा त्यांनी कायम ठेवावी.

या वेळी प.पू. १०८ हितेंद्रसागर महाराज, प.पू.स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक महाराज यांचे आशीर्वचन व महामंत्री बाळासाहेब पाटील, महावीर (राजस्थान), एन. जे. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वागत डॉ. रावसो कुन्नुरे, प्रास्ताविक भूपाल गिरमल यांनी केले. संयोजन राजू दोड्डण्णावर तर आभार मुख्य संघटक सुभाष मगदूम यांनी मानले. सूत्रसंचालन आर.बी खोत, अजित भंडे यांनी केले. शांतिकलशाचा मान अजित मडके व जलदकुमार पाटील यांना देण्यात आला. अध्यक्षस्थानी पी.आर. पाटील होते.