शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
3
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
4
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
5
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
6
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
7
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
8
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
9
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
10
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
11
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
12
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
13
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
14
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
15
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
16
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
17
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
18
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
19
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
20
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!

शांतीसागर महाराजांनी जैन धर्माची पताका देशभर फडकवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:31 IST

सांगली : आपल्या अलौकिक कार्याने आचार्य शांतीसागर महाराज यांनी देशभर जैन धर्माची पताका फडकवली, असे गौरवोद्गार पंचम पट्टाधीश प.पू. ...

सांगली : आपल्या अलौकिक कार्याने आचार्य शांतीसागर महाराज यांनी देशभर जैन धर्माची पताका फडकवली, असे गौरवोद्गार पंचम पट्टाधीश प.पू. १०८ आचार्य वर्धमानसागर महाराज यांनी काढले.

दक्षिण भारत जैन सभा, वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या वतीने चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य प. पू. १०८ श्री शांतिसागर महाराज यांची ६६ वी पुण्यतिथी पार पडली. वीर सेवा दल व समस्त दिगंबर जैन समाज, कोथळी कुप्पनवाडी यांच्यावतीने ऑनलाईन सवांद आयोजित केला होता, अशी माहिती वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष शशिकांत राजोबा यांनी सांगितले.

सकाळी १०८ णमोकार महामंत्राचे जाप्य व विश्वशांती प्रार्थना करण्यात आली. शांतिसागर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व शांती दीपप्रज्वलन करण्यात आले. शांतिसागर महाराज यांनी त्यांच्याच मुखातून सल्लेखनाच्या २६ व्या दिवशी दिलेला अंतिम उपदेश वीर सेवा दल या फेसबुकवरून लाईव्ह करण्यात आला. जन्मभूमी भोज येथून आलेल्या शांतिकलशाचे स्वागत करून धर्मानुरागी सुरेंद्र पिटके यांच्याहस्ते ध्वजारोहण होऊन वर्धमानसागर महाराज यांच्या व संघस्थ त्यागी, आर्यिका यांच्या पचांमृत अभिषेक करण्यात आला.

यावेळी वर्धमानसागर महाराज म्हणाले की, शांतिसागर महाराजांनी आपल्या विहारात जल आणि वायू यांचा त्याग केला. पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर पायी विहार करून सर्व अडचणींवर संयम व शांतीच्या मार्गाने मात करून जैन धर्माची पताका देशभर फिरविला. आयुष्यातील २७ वर्षांहून अधिक काळ उपवास करून तप साधना केली. वीर सेवा दल हे गेली ४० वर्षे प्रथमाचार्य शांतिसागरजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करते ही बाब कौतुकास्पद आहे. तसेच व्यसनमुक्ती, वृक्षारोपण व सामाजिक कार्य करीत आहे. ही परंपरा त्यांनी कायम ठेवावी.

या वेळी प.पू. १०८ हितेंद्रसागर महाराज, प.पू.स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक महाराज यांचे आशीर्वचन व महामंत्री बाळासाहेब पाटील, महावीर (राजस्थान), एन. जे. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वागत डॉ. रावसो कुन्नुरे, प्रास्ताविक भूपाल गिरमल यांनी केले. संयोजन राजू दोड्डण्णावर तर आभार मुख्य संघटक सुभाष मगदूम यांनी मानले. सूत्रसंचालन आर.बी खोत, अजित भंडे यांनी केले. शांतिकलशाचा मान अजित मडके व जलदकुमार पाटील यांना देण्यात आला. अध्यक्षस्थानी पी.आर. पाटील होते.