शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

नागपंचमीच्या बैठकीला शिराळकरांची दांडी

By admin | Updated: July 18, 2014 23:58 IST

दीपेंद्रसिंह कुशवाह : आदेशाचे पालन करा; जिवंत नाग पकडून त्याची पूजा व खेळविण्याचा प्रयत्न करू नये

सांगली : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शिराळा येथील ग्रामस्थांनी नागपंचमी साजरी करावी. जिवंत नाग पकडून त्याची पूजा व त्याला खेळविण्याचा कोणी प्रयत्न केल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत दिला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलीस व प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, न्यायालयाच्या निकालाप्रमाणे नागपंचमी साजरी करण्यासाठी कुशवाह यांनी बोलाविलेल्या प्रबोधनात्मक बैठकीला शिराळकरांनी दांडी मारली. यावरून त्यांचा या आदेशाला विरोध असल्याचे दिसून येते. कुशवाह म्हणाले की, जिवंत नाग पकडण्यास बंदी आहे. त्यामुळे नागप्रेमी मंडळांनी कुठेही नाग पकडू नये. शिराळ्यातील एकही मंडळ नोंदणीकृत नाही. या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या जाणार आहेत. जिवंत नाग पकडून त्याची पूजा करू नये, तसेच त्याला खेळवू नये, असा १९७२ ला कायदा झाला आहे. तरीही त्याची अंमलबजावणी करण्याची ग्रामस्थांची तयारी नसल्याचे दिसून येते. मात्र आता आम्हाला न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे. ग्रामस्थांच्या भावना व श्रद्धा दुखावण्याचा आमचा प्रयत्न नाही, हे त्यांनी समजून घ्यावे. नागपंचमीला अजून तेरा ते चौदा दिवसांचा कालावधी आहे. या काळात ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यावर भर दिला जाईल. गाव बंद ठेवून ते या निकालाचा निषेध करीत असले तरी, त्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. कायद्याचे पालन करणे, ही सर्वांची जबाबदारी आहे. ते म्हणाले की, न्यायालयाने काय आदेश दिला आहे, नागपंचमी कशी साजरी करावी, यासंदर्भात ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. शिराळ्यात प्रशासनातर्फे पोस्टर्स लावली जाणार आहेत. प्रसिद्धीपत्रकांचेही वाटप केले जाणार आहे. प्रबोधन करण्याची ग्रामपंचायतीचीही जबाबदारी आहे. विशेष सभा बोलावून त्यांनी तसा ठराव करून घ्यावा. सरपंचांनाही न्यायालयाच्या आदेशाला विरोध करता येणार नाही. ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यासाठी आज कार्यालयात बैठक बोलाविली होती. मात्र एकाही ग्रामस्थाने बैठकीला हजेरी लावली नाही. (प्रतिनिधी) या पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत उपस्थित होते. ते म्हणाले की, न्यायालयाचा आदेश झुगारून कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पोलीस यंत्रणा सक्षम आहे. नागपंचमीदिवशी बाहेरून बंदोबस्त मागविण्याची गरज आहे. बंदोबस्तासाठी जिल्ह्यातील पोलीस सक्षम आहेत. यापूर्वी नागपंचमी साजरी करताना न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्यात आली आहे. आता तशी परिस्थिती निर्माण झाल्यास कठोर कारवाई केली जाईल.