शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
3
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
4
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
5
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
6
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
7
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
8
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
9
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
10
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
11
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
12
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
13
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
14
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
15
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
16
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
17
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
18
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
19
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

नागपंचमीच्या बैठकीला शिराळकरांची दांडी

By admin | Updated: July 18, 2014 23:58 IST

दीपेंद्रसिंह कुशवाह : आदेशाचे पालन करा; जिवंत नाग पकडून त्याची पूजा व खेळविण्याचा प्रयत्न करू नये

सांगली : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शिराळा येथील ग्रामस्थांनी नागपंचमी साजरी करावी. जिवंत नाग पकडून त्याची पूजा व त्याला खेळविण्याचा कोणी प्रयत्न केल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत दिला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलीस व प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, न्यायालयाच्या निकालाप्रमाणे नागपंचमी साजरी करण्यासाठी कुशवाह यांनी बोलाविलेल्या प्रबोधनात्मक बैठकीला शिराळकरांनी दांडी मारली. यावरून त्यांचा या आदेशाला विरोध असल्याचे दिसून येते. कुशवाह म्हणाले की, जिवंत नाग पकडण्यास बंदी आहे. त्यामुळे नागप्रेमी मंडळांनी कुठेही नाग पकडू नये. शिराळ्यातील एकही मंडळ नोंदणीकृत नाही. या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या जाणार आहेत. जिवंत नाग पकडून त्याची पूजा करू नये, तसेच त्याला खेळवू नये, असा १९७२ ला कायदा झाला आहे. तरीही त्याची अंमलबजावणी करण्याची ग्रामस्थांची तयारी नसल्याचे दिसून येते. मात्र आता आम्हाला न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे. ग्रामस्थांच्या भावना व श्रद्धा दुखावण्याचा आमचा प्रयत्न नाही, हे त्यांनी समजून घ्यावे. नागपंचमीला अजून तेरा ते चौदा दिवसांचा कालावधी आहे. या काळात ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यावर भर दिला जाईल. गाव बंद ठेवून ते या निकालाचा निषेध करीत असले तरी, त्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. कायद्याचे पालन करणे, ही सर्वांची जबाबदारी आहे. ते म्हणाले की, न्यायालयाने काय आदेश दिला आहे, नागपंचमी कशी साजरी करावी, यासंदर्भात ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. शिराळ्यात प्रशासनातर्फे पोस्टर्स लावली जाणार आहेत. प्रसिद्धीपत्रकांचेही वाटप केले जाणार आहे. प्रबोधन करण्याची ग्रामपंचायतीचीही जबाबदारी आहे. विशेष सभा बोलावून त्यांनी तसा ठराव करून घ्यावा. सरपंचांनाही न्यायालयाच्या आदेशाला विरोध करता येणार नाही. ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यासाठी आज कार्यालयात बैठक बोलाविली होती. मात्र एकाही ग्रामस्थाने बैठकीला हजेरी लावली नाही. (प्रतिनिधी) या पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत उपस्थित होते. ते म्हणाले की, न्यायालयाचा आदेश झुगारून कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पोलीस यंत्रणा सक्षम आहे. नागपंचमीदिवशी बाहेरून बंदोबस्त मागविण्याची गरज आहे. बंदोबस्तासाठी जिल्ह्यातील पोलीस सक्षम आहेत. यापूर्वी नागपंचमी साजरी करताना न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्यात आली आहे. आता तशी परिस्थिती निर्माण झाल्यास कठोर कारवाई केली जाईल.