शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

शाहू महाराजांचे प्लेगमधील कार्य आजही अनुकरणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:32 IST

‘अंनिस’च्या वार्तापत्र प्रकाशन कार्यक्रमात डॉ. विलासराव पोवार यांनी मार्गदर्शन केले. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी ...

‘अंनिस’च्या वार्तापत्र प्रकाशन कार्यक्रमात डॉ. विलासराव पोवार यांनी मार्गदर्शन केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १२५ वर्षांपूर्वी प्लेगच्या महामारीत राज्यकर्त्याच्या भूमिकेतून केलेले कार्य आजही अनुकरणीय आहे. प्लेगची लस प्रथम स्वत: टोचून घेतली, लस घेणाऱ्याला रजा, रोख बक्षिसे जाहीर केली. याचा आदर्श घेतला पाहिजे, असे प्रतिपादन इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डाॅ. विलासराव पोवार यांनी केले. मानवतेच्या दृष्टिकोनातून महाराजांनी प्रशासन, प्रबोधन, आरोग्य, उपचार, आर्थिक मदत, पुर्नवसन यांचा मेळ साधत शास्त्रशुद्ध उपाययोजना राबवल्या, त्यामुळे प्लेगच्या संकटावर मात करता आली, असे डॉ. पोवार म्हणाले.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या ऑनलाईन अंक प्रकाशनावेळी डॉ. पवार बोलत होते. ‘प्लेगच्या साथीतील शाहू महाराजांचे कार्य’ या विषयावर त्यांनी विवेचन केले. यावेळी पत्रकार विजय चोरमारे हे अध्यक्षस्थानी होते. डॉ. पोवार म्हणाले, महाराजांनी रेल्वेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारन्टाईन केले. अपंग, दिनदुबळे व गरजूंसाठी अन्नदान सुरु केले, मजुरांना रोजगार दिला. यात्रा-जत्रा व उत्सवांवर बंधने घातली. साठेबाजी व महागाई करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवले. प्लेगने निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना निवृत्तीवेतन दिले. जनतेचे दागदागिने, मौल्यवान वस्तू राजदरबारातील तिजोरीत सुरक्षित ठेवण्याची सोय केली.

पोवार यांनी सांगितले की, महाराजांनी लोकानुनय न करता प्लेग निर्मूलनासाठी शास्त्रीय उपायांची कठोर अंमलबजावणी केली. त्यांचा प्लेगविरोधी जाहीरनामा, करवीर सरकारचे गॅझेट व वेळोवेळी काढलेल्या अधिकृत हुकुमांच्या आधारे प्लेगमधील कामाची माहिती मिळते.

यावेळी चोरमारे यांच्या हस्ते अंनिस वार्तात्राच्या जूनच्या अंकाचे प्रकाशन झाले. चोरमारे यांनी शाहू महाराज व आजच्या राज्यकर्त्यांमध्ये तुलना केली. संयोजन अनिल चव्हाण, मधुकर गायकवाड, राहुल थोरात, आदींनी केले.

चौकट

टाळ्या आणि थाळ्यांची भंपकगिरी

चोरमारे म्हणाले, आजचे राज्यकर्ते टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, असे भंपक व अवैज्ञानिक कार्यक्रम करत आहेत. महाराजांनी टीका करणाऱ्या वृत्तपत्रांनाही मोठ्या मनाने मदत केली, मात्र आजचे राज्यकर्ते माध्यमांची मुस्कटदाबी करताहेत. शाहू महाराजांच्या कार्याचा अभ्यास केल्यास त्यांना मार्ग सापडेल.