शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

शहाबाजचा मृत्यू वीज तोडताना

By admin | Updated: December 14, 2015 00:03 IST

वळसंग येथील प्रकार : केवळ पाचशे रूपयांसाठी जीव गमावला

जत : तालुक्यातील वळसंग येथील शहाबाज हजरत मुल्ला (वय २५) याचा विजेचा शॉक बसून मृत्यू झाला नसून, भीमाण्णा अण्णाप्पा तेली (वय ५८) व त्यांचा मुलगा अनिल भीमाण्णा तेली ( ३०, रा. दोघे वळसंग, ता. जत) यांनी पवनऊर्जा निर्माण कंपनीकडून आर्थिक मोबदला मिळविण्यासाठी पाचशे रुपयांचे आमिष दाखवून त्याला विद्युत पोलवर चढवून विद्युत जनित्र उडवून संपूर्ण वीज पुरवठा खंडित करत असताना शॉक बसून त्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. याप्रकरणी भीमाण्णा व त्याचा मुलगा अनिल यास जत पोेलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वळसंगपासून दोन किलोमीटर अंतरावर तेली मळा आहे. तेथे भीमाण्णा अण्णाप्पा तेली व मलकारी अणाप्पा तेली यांची समाईक शेतजमीन आहे. शेतजमिनीच्या समाईक बांधावरून पवनऊर्जा निर्माण कंपनीच्या मुख्य विद्युत वाहिनीचे खांब व त्यावरून वीज वाहिनी गेली आहे. यासंदर्भात संबंधित पवनऊर्जा निर्माण कंपनीच्या व्यवस्थापनाने मलकारी तेली यांच्याबरोबर करारपत्र करून त्यांना आर्थिक नुकसानभरपाई दिली आहे. ही नुकसानभरपाई भीमाप्णा तेली याला मिळाली नाही, त्यामुळे ते स्वत: व त्यांचा मुलगा अनिल पवन ऊर्जा निर्माण कंपनीवर चिडून होते.१ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्यादरम्यान शहाबाज मुल्ला यास पाचशे रुपये देतो, असे आमिष दाखवून त्यास तेली मळ््यातील बांधावर नेले. नायलॉनच्या दोरीला लोखंडी हुक लावून ती वीज वाहक तारेवर टाकण्यात आली. तेथील तीन वीज वाहक तारा दोरीने एकत्र बांधून संपूर्ण वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न करत असताना, तारा अचानक खाली आल्या व बांधावर उभा असलेल्या शहाबाज मुल्ला याचा त्या तारांना स्पर्श होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर मुल्ला हे शेतात गेले असता, विजेचा शॉक लागून अचानक मृत्यू झाला आहे, अशी फिर्याद सुरुवातीस जत पोलिसात दाखल करण्यात आली होती. विद्युत खांबावरून खाली आलेल्या वीज वाहक तारा, लोखंडी हुक, नायलॉनची दोरी घटनास्थळी पडली होती. यासंदर्भात गावात उलट-सुलट चर्चा सुरू होती. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी घटनेची सखोल चौकशी केली असता, भीमाण्णा तेली व त्यांचा मुलगा अनिल या दोघांनी शहाबाज यास पैशाचे आमिष दाखवून विद्युत खांबावर चढविले व संपूर्ण वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न करत असताना शॉक बसून त्याचा मृत्यू झाला आहे, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी शहाबाज याची आत्या आशाबी गुलाब मुल्ला (वय ५०, रा. वळसंग, ता. जत) यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी भीमाण्णा व अनिल यास अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. टी. इंगळे यांच्यासमोर उभे केले असता, सुरुवातीस दोन दिवस पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. (वार्ताहर)सर्वसामान्यांचा बळी : प्रशासनाचे दुर्लक्षपवनऊर्जा निर्माण कंपनीची वीज वाहिनी किंवा विद्युत पोल एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामधून जात असतील तर, कंपनीचे दलाल आणि शेतकऱ्यांना लॉटरी लागली, असे येथे मानले जाते. परंतु कंपनी व्यवस्थापन, शेतकरी व दलाल यांच्या भांडणात सर्वसामान्यांचा बळी जाऊ लागला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.