शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

शहाबाजचा मृत्यू वीज तोडताना

By admin | Updated: December 14, 2015 00:03 IST

वळसंग येथील प्रकार : केवळ पाचशे रूपयांसाठी जीव गमावला

जत : तालुक्यातील वळसंग येथील शहाबाज हजरत मुल्ला (वय २५) याचा विजेचा शॉक बसून मृत्यू झाला नसून, भीमाण्णा अण्णाप्पा तेली (वय ५८) व त्यांचा मुलगा अनिल भीमाण्णा तेली ( ३०, रा. दोघे वळसंग, ता. जत) यांनी पवनऊर्जा निर्माण कंपनीकडून आर्थिक मोबदला मिळविण्यासाठी पाचशे रुपयांचे आमिष दाखवून त्याला विद्युत पोलवर चढवून विद्युत जनित्र उडवून संपूर्ण वीज पुरवठा खंडित करत असताना शॉक बसून त्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. याप्रकरणी भीमाण्णा व त्याचा मुलगा अनिल यास जत पोेलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वळसंगपासून दोन किलोमीटर अंतरावर तेली मळा आहे. तेथे भीमाण्णा अण्णाप्पा तेली व मलकारी अणाप्पा तेली यांची समाईक शेतजमीन आहे. शेतजमिनीच्या समाईक बांधावरून पवनऊर्जा निर्माण कंपनीच्या मुख्य विद्युत वाहिनीचे खांब व त्यावरून वीज वाहिनी गेली आहे. यासंदर्भात संबंधित पवनऊर्जा निर्माण कंपनीच्या व्यवस्थापनाने मलकारी तेली यांच्याबरोबर करारपत्र करून त्यांना आर्थिक नुकसानभरपाई दिली आहे. ही नुकसानभरपाई भीमाप्णा तेली याला मिळाली नाही, त्यामुळे ते स्वत: व त्यांचा मुलगा अनिल पवन ऊर्जा निर्माण कंपनीवर चिडून होते.१ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्यादरम्यान शहाबाज मुल्ला यास पाचशे रुपये देतो, असे आमिष दाखवून त्यास तेली मळ््यातील बांधावर नेले. नायलॉनच्या दोरीला लोखंडी हुक लावून ती वीज वाहक तारेवर टाकण्यात आली. तेथील तीन वीज वाहक तारा दोरीने एकत्र बांधून संपूर्ण वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न करत असताना, तारा अचानक खाली आल्या व बांधावर उभा असलेल्या शहाबाज मुल्ला याचा त्या तारांना स्पर्श होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर मुल्ला हे शेतात गेले असता, विजेचा शॉक लागून अचानक मृत्यू झाला आहे, अशी फिर्याद सुरुवातीस जत पोलिसात दाखल करण्यात आली होती. विद्युत खांबावरून खाली आलेल्या वीज वाहक तारा, लोखंडी हुक, नायलॉनची दोरी घटनास्थळी पडली होती. यासंदर्भात गावात उलट-सुलट चर्चा सुरू होती. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी घटनेची सखोल चौकशी केली असता, भीमाण्णा तेली व त्यांचा मुलगा अनिल या दोघांनी शहाबाज यास पैशाचे आमिष दाखवून विद्युत खांबावर चढविले व संपूर्ण वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न करत असताना शॉक बसून त्याचा मृत्यू झाला आहे, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी शहाबाज याची आत्या आशाबी गुलाब मुल्ला (वय ५०, रा. वळसंग, ता. जत) यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी भीमाण्णा व अनिल यास अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. टी. इंगळे यांच्यासमोर उभे केले असता, सुरुवातीस दोन दिवस पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. (वार्ताहर)सर्वसामान्यांचा बळी : प्रशासनाचे दुर्लक्षपवनऊर्जा निर्माण कंपनीची वीज वाहिनी किंवा विद्युत पोल एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामधून जात असतील तर, कंपनीचे दलाल आणि शेतकऱ्यांना लॉटरी लागली, असे येथे मानले जाते. परंतु कंपनी व्यवस्थापन, शेतकरी व दलाल यांच्या भांडणात सर्वसामान्यांचा बळी जाऊ लागला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.