शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

शहाजीबापू पाटील लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST

मनाच्या श्रीमंतीचे वैभव लाभलेले, सद््भावना, सद्‌गुण, सद्‌विचार, सद्‌वर्तन आदी शिदोरी असलेले, समोरच्या व्यक्तीचे हसतमुख स्वागत करणे, बापू यांना राजकीय ...

मनाच्या श्रीमंतीचे वैभव लाभलेले, सद््भावना, सद्‌गुण, सद्‌विचार, सद्‌वर्तन आदी शिदोरी असलेले, समोरच्या व्यक्तीचे हसतमुख स्वागत करणे, बापू यांना राजकीय क्षेत्रांत वरदहस्त लाभला तो ना. जयंत पाटील साहेबांचा. पण तत्पूर्वी त्यांच्या घराण्याला राजकीय वारसा मिळाला तो लोकनेते राजारामबापू पाटील यांचा. त्यामुळे क्रमाने सलग दोन वर्षे पंचवार्षिक इस्लामपूर नगरपालिकेत बहुमताने नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. जनतेमध्ये जायचं, जनतेबरोबर राहायचं. त्यांच्या अडचणी समजावून घ्यायच्या. त्या सोडवायच्या हा त्यांचा रोजचा नित्य उपक्रम ठरलेलाच आहे. त्यांनी आपल्या वाॅर्डाचा चेहरा-मोहरा बदलला आहेच; पण इस्लामपूर शहराच्या विकासासाठी अनेक प्रश्न उपस्थित करून ते सोडविण्याच्या बाबतीत नेहमीच आपली भूमिका बजावत आलेले आहेत.

समाजातील पतहिनांना पत मिळवून देण्यासाठी विकासातून समृद्धी हा विचार सार्थ ठरविण्यासाठी जय हनुमान नागरी सहकारी पतसंस्थेची निर्मिती केली. आज पतसंस्थेची विद्यासहती इतकी वाढली आहे ती सर्वसामान्यांपासून ते छोटे-छोटे उद्योजक, व्यापाऱ्यांना वेळोवेळी मदत केली आहे. महिलांना कर्जपुरवठा करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले आहे. हे कोणत्या ज्योतिषाला विचारायची गरज नाही. अनेक ठिकाणी भरणाऱ्या क्रीडा स्पर्धा असतील त्यांनी शहाजीबापूंचे योगदान हे ठरलेलच आहे. शहाजीबापू म्हणजे खरोखरंच सत्य, शिस्त सेवेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांचे आपल्या कार्यकर्त्यांना नेहमीच मार्गदर्शन असते. नेतृत्व-दातृत्व-कर्तृत्वाचा सुरेख संगम म्हणजे शहाजीबापू होय. सुख-दु:खाच्या कार्यक्रमात आपलेपणाने भाग घेतात हे वाखाण्यासारखे आहे.

शहाजीबापूंनी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर येथील मूकबधीर साठहून अधिक विद्यार्थ्यांना स्वत:च्या खिशांतून पैसे खर्च करून त्यांना ताकारी येथे लोकनेते राजारामबापू पाटील मूकबधीर विद्यालय उभे केले आहे. मुलांना संगणकाचे, खेळाचे प्रशिक्षण देताना त्यांच्या आरोग्याची तेवढीच काळजी घेतली जाते. एवढेच नव्हे तर विद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले आहे. आज ही विद्यालयाची स्वत:च्या मालकीची इमारत आहे. अनेक कार्यक्रमांची निर्मिती करून मुलांमध्ये आवड निर्माण केली जाते. शासनाच्या सर्व निकषांस पात्र ठरलेले हे विद्यालय अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेले आहे. सोळा वर्षे झाली पण बापूंनी विद्यालयाला कोणतीही अडचण भासू दिली नाही. स्वत:चे नातेवाईकसुद्धा हेटाळणी करतात, समाजसुद्धा हेटाळणी करतो; पण मन आणि माणुसकीचा विचार मानवतेकडे नेण्याचा ज्याला लाभतो, त्याच्याच हातून हे सत्कार्य घडते एवढा मात्र तितकेच सत्य आहे.

व्याख्यानाचे अनेक कार्यक्रम निर्माण करून ज्ञानीवंत वक्त्यांना बोलवून समाजाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्नही त्यांनी केलेला आहे. अनेकांना त्यांनी अडचणीच्या काळात मदत केलेली आहे. एखाद्या कामाची कड गाठणे हे बापूंचे वैशिट्य आहे. हे सर्व इस्लामपूरच जाणते, असे नाही तर परिसरही जाणतो. कुटुंबवत्सल तर आहेतच समाजव्यवस्थेच भान असलेले व्यक्तिमत्त्वही आहेत. कोणत्याही चांगल्या गोष्टीला बापूंची उपस्थिती ठरलेली असते. चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत बापूंच्यात आहे. म्हणून बापूंच्या व्यक्तिमत्त्वाकडे आदराने पाहतो. माणसांच्या गर्दीतले पण तेवढेच दर्दी असलेले शहाजीबापू आहेत. आपलेपण, जिव्हाळा म्हणजे शहाजीबापू होय. शहाजीबापूंचे जीवन म्हणजे सत्कार्याचा सप्तसूरच म्हणावा लागेल. नेहमीच जनमाणसांच्या हृदयावर कामाने स्थान निर्माण करावे तर शहाजीबापूंनीच. कार्यकर्ता ही मोठी संपत्ती आहे असे बापू मानतात. म्हणूनच त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांचे जाळे नेहमीच उभे असते. अशा शहाजी बापूंना दीर्घआयुष्य, निरोगी जीवन लाभावे आणि सत्कार्याची निर्मिती व्हावी, हीच शुभेच्छा..!

- पृथ्वीराज पाटील, अध्यक्ष, सोनराज सेवाभावी संस्था, इस्लामपूर