शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शहाजीबापू पाटील लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST

मनाच्या श्रीमंतीचे वैभव लाभलेले, सद््भावना, सद्‌गुण, सद्‌विचार, सद्‌वर्तन आदी शिदोरी असलेले, समोरच्या व्यक्तीचे हसतमुख स्वागत करणे, बापू यांना राजकीय ...

मनाच्या श्रीमंतीचे वैभव लाभलेले, सद््भावना, सद्‌गुण, सद्‌विचार, सद्‌वर्तन आदी शिदोरी असलेले, समोरच्या व्यक्तीचे हसतमुख स्वागत करणे, बापू यांना राजकीय क्षेत्रांत वरदहस्त लाभला तो ना. जयंत पाटील साहेबांचा. पण तत्पूर्वी त्यांच्या घराण्याला राजकीय वारसा मिळाला तो लोकनेते राजारामबापू पाटील यांचा. त्यामुळे क्रमाने सलग दोन वर्षे पंचवार्षिक इस्लामपूर नगरपालिकेत बहुमताने नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. जनतेमध्ये जायचं, जनतेबरोबर राहायचं. त्यांच्या अडचणी समजावून घ्यायच्या. त्या सोडवायच्या हा त्यांचा रोजचा नित्य उपक्रम ठरलेलाच आहे. त्यांनी आपल्या वाॅर्डाचा चेहरा-मोहरा बदलला आहेच; पण इस्लामपूर शहराच्या विकासासाठी अनेक प्रश्न उपस्थित करून ते सोडविण्याच्या बाबतीत नेहमीच आपली भूमिका बजावत आलेले आहेत.

समाजातील पतहिनांना पत मिळवून देण्यासाठी विकासातून समृद्धी हा विचार सार्थ ठरविण्यासाठी जय हनुमान नागरी सहकारी पतसंस्थेची निर्मिती केली. आज पतसंस्थेची विद्यासहती इतकी वाढली आहे ती सर्वसामान्यांपासून ते छोटे-छोटे उद्योजक, व्यापाऱ्यांना वेळोवेळी मदत केली आहे. महिलांना कर्जपुरवठा करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले आहे. हे कोणत्या ज्योतिषाला विचारायची गरज नाही. अनेक ठिकाणी भरणाऱ्या क्रीडा स्पर्धा असतील त्यांनी शहाजीबापूंचे योगदान हे ठरलेलच आहे. शहाजीबापू म्हणजे खरोखरंच सत्य, शिस्त सेवेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांचे आपल्या कार्यकर्त्यांना नेहमीच मार्गदर्शन असते. नेतृत्व-दातृत्व-कर्तृत्वाचा सुरेख संगम म्हणजे शहाजीबापू होय. सुख-दु:खाच्या कार्यक्रमात आपलेपणाने भाग घेतात हे वाखाण्यासारखे आहे.

शहाजीबापूंनी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर येथील मूकबधीर साठहून अधिक विद्यार्थ्यांना स्वत:च्या खिशांतून पैसे खर्च करून त्यांना ताकारी येथे लोकनेते राजारामबापू पाटील मूकबधीर विद्यालय उभे केले आहे. मुलांना संगणकाचे, खेळाचे प्रशिक्षण देताना त्यांच्या आरोग्याची तेवढीच काळजी घेतली जाते. एवढेच नव्हे तर विद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले आहे. आज ही विद्यालयाची स्वत:च्या मालकीची इमारत आहे. अनेक कार्यक्रमांची निर्मिती करून मुलांमध्ये आवड निर्माण केली जाते. शासनाच्या सर्व निकषांस पात्र ठरलेले हे विद्यालय अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेले आहे. सोळा वर्षे झाली पण बापूंनी विद्यालयाला कोणतीही अडचण भासू दिली नाही. स्वत:चे नातेवाईकसुद्धा हेटाळणी करतात, समाजसुद्धा हेटाळणी करतो; पण मन आणि माणुसकीचा विचार मानवतेकडे नेण्याचा ज्याला लाभतो, त्याच्याच हातून हे सत्कार्य घडते एवढा मात्र तितकेच सत्य आहे.

व्याख्यानाचे अनेक कार्यक्रम निर्माण करून ज्ञानीवंत वक्त्यांना बोलवून समाजाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्नही त्यांनी केलेला आहे. अनेकांना त्यांनी अडचणीच्या काळात मदत केलेली आहे. एखाद्या कामाची कड गाठणे हे बापूंचे वैशिट्य आहे. हे सर्व इस्लामपूरच जाणते, असे नाही तर परिसरही जाणतो. कुटुंबवत्सल तर आहेतच समाजव्यवस्थेच भान असलेले व्यक्तिमत्त्वही आहेत. कोणत्याही चांगल्या गोष्टीला बापूंची उपस्थिती ठरलेली असते. चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत बापूंच्यात आहे. म्हणून बापूंच्या व्यक्तिमत्त्वाकडे आदराने पाहतो. माणसांच्या गर्दीतले पण तेवढेच दर्दी असलेले शहाजीबापू आहेत. आपलेपण, जिव्हाळा म्हणजे शहाजीबापू होय. शहाजीबापूंचे जीवन म्हणजे सत्कार्याचा सप्तसूरच म्हणावा लागेल. नेहमीच जनमाणसांच्या हृदयावर कामाने स्थान निर्माण करावे तर शहाजीबापूंनीच. कार्यकर्ता ही मोठी संपत्ती आहे असे बापू मानतात. म्हणूनच त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांचे जाळे नेहमीच उभे असते. अशा शहाजी बापूंना दीर्घआयुष्य, निरोगी जीवन लाभावे आणि सत्कार्याची निर्मिती व्हावी, हीच शुभेच्छा..!

- पृथ्वीराज पाटील, अध्यक्ष, सोनराज सेवाभावी संस्था, इस्लामपूर