शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

घाटमाथ्यावर दुष्काळाची छाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कघाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, गर्जेवाडी, वाघोली, कुंडलापूर, जाखापूर व कुची परिसरात वरुणराजाच्या अवकृपेमुळे पाण्याची आणि चाºयाची भीषण टंचाई जाणवत असून, पावसाळा मध्यावर आला तरी एकही दमदार पाऊस न झाल्याने, या परिसरातील तलाव, बंधारे, ओढे, नाले, विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील खरीप हंगाम पूर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्कघाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, गर्जेवाडी, वाघोली, कुंडलापूर, जाखापूर व कुची परिसरात वरुणराजाच्या अवकृपेमुळे पाण्याची आणि चाºयाची भीषण टंचाई जाणवत असून, पावसाळा मध्यावर आला तरी एकही दमदार पाऊस न झाल्याने, या परिसरातील तलाव, बंधारे, ओढे, नाले, विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील खरीप हंगाम पूर्ण वाया जाण्याच्या मार्गावर आहे. पाऊसच झाला नसल्याने नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारा चाराही तयार झालेला नाही. त्यामुळे भीषण पाणी व चाराटंचाई जाणवू लागली आहे.खरीप हंगाम पूर्ण वाया जाण्याच्या मार्गावर असून जून महिन्यात झालेल्या तुरळक पावसाच्या ओलीवर बळीराजाने मोठ्या धाडसाने पेरा केला. पिके चांगली तग धरु लागली. परंतु तद्नंतर पावसाने पाठ फिरविल्याने पिके करपू लागली असून, सध्या पावसाऐवजी कडक ऊन पडत असल्याने पूर्ण पिके वाया जाऊ लागली आहेत. त्यामुळे बळीराजावर अस्मानी संकट कोसळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. घाटमाथ्यावर शिवारात पिके करपू लागली आहेत.पाण्याची ऐन पावसाळ्यात तीव्र टंचाई जाणवू लागली असून ऐन पावसाळ्यात घाटनांद्रे, जाखापूर, कुची वस्ती भागात टॅँकरने पाणी पुरवठा होत आहे. टॅँकर हे गेल्या वर्षभरापासून सुरु असून, या पट्ट्यात कुची वगळता कुठेही सिंचन योजनेचे काम झालेले नाही. पाच गावांसाठी मंजूर असणारी घाटनांद्रे उपसा सिंचन योजना निधीअभावी रखडली असून घोषणेशिवाय कोणतीही ठोस कारवाई याबाबत झाली नाही. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची असणारी वाघोली प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना बंद असल्याने वाघोली, गर्जेवाडी, कुंडलापूर येथे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.या पट्ट्यातील पाणीप्रश्न कायमस्वरुपी मिटण्यासाठी वरिष्ठ पातळीवर केवळ घोषणा करतात, पण स्थानिक पातळीवरील नेते याबाबत कोणतेही नेतृत्व करण्यास तयार होत नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे. याबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.सरकारकडून जनतेची केवळ चेष्टाघाटमाथ्यावरील जनता प्रखर दुष्काळाला तोंड देत असताना, टेंभू योजनेचे केवळ गाजर दाखवून चेष्टा केली जात आहे. या प्रश्नाचा केवळ राजकारणासाठी वापर केला जात असून, आज जवळजवळ एक वर्षापासून या भागातील जाखापूर, कुची व घाटनांद्रे भागास पिण्यास योग्य नसणारे पाणी टॅँकरने पुरविले जाते. त्या पाण्यास वास येतो. त्याचबरोबर वाघोली प्रादेशिक योजना बंद असल्याने वाघोली, गर्जेवाडी, कुंडलापुरात भीषण पाणीटंचाई आहे. चाºयाविना जनावरे दगावत असतानाही त्याचे शासनाला गांभीर्य नाही. गेली दोन वर्षे पिके वाया गेली तरीही त्याची खोटी आणेवारी लावल्याने पीक विमा मिळाला नाही. त्यामुळे शासकीय अधिकाºयाने वस्तुस्थितीची जाणीव ठेवून काम करावे व जनतेची चेष्टा थांबवावी, असे कॉँगे्रसचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले.