शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

घाटमाथ्यावर दुष्काळाची छाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कघाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, गर्जेवाडी, वाघोली, कुंडलापूर, जाखापूर व कुची परिसरात वरुणराजाच्या अवकृपेमुळे पाण्याची आणि चाºयाची भीषण टंचाई जाणवत असून, पावसाळा मध्यावर आला तरी एकही दमदार पाऊस न झाल्याने, या परिसरातील तलाव, बंधारे, ओढे, नाले, विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील खरीप हंगाम पूर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्कघाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, गर्जेवाडी, वाघोली, कुंडलापूर, जाखापूर व कुची परिसरात वरुणराजाच्या अवकृपेमुळे पाण्याची आणि चाºयाची भीषण टंचाई जाणवत असून, पावसाळा मध्यावर आला तरी एकही दमदार पाऊस न झाल्याने, या परिसरातील तलाव, बंधारे, ओढे, नाले, विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील खरीप हंगाम पूर्ण वाया जाण्याच्या मार्गावर आहे. पाऊसच झाला नसल्याने नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारा चाराही तयार झालेला नाही. त्यामुळे भीषण पाणी व चाराटंचाई जाणवू लागली आहे.खरीप हंगाम पूर्ण वाया जाण्याच्या मार्गावर असून जून महिन्यात झालेल्या तुरळक पावसाच्या ओलीवर बळीराजाने मोठ्या धाडसाने पेरा केला. पिके चांगली तग धरु लागली. परंतु तद्नंतर पावसाने पाठ फिरविल्याने पिके करपू लागली असून, सध्या पावसाऐवजी कडक ऊन पडत असल्याने पूर्ण पिके वाया जाऊ लागली आहेत. त्यामुळे बळीराजावर अस्मानी संकट कोसळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. घाटमाथ्यावर शिवारात पिके करपू लागली आहेत.पाण्याची ऐन पावसाळ्यात तीव्र टंचाई जाणवू लागली असून ऐन पावसाळ्यात घाटनांद्रे, जाखापूर, कुची वस्ती भागात टॅँकरने पाणी पुरवठा होत आहे. टॅँकर हे गेल्या वर्षभरापासून सुरु असून, या पट्ट्यात कुची वगळता कुठेही सिंचन योजनेचे काम झालेले नाही. पाच गावांसाठी मंजूर असणारी घाटनांद्रे उपसा सिंचन योजना निधीअभावी रखडली असून घोषणेशिवाय कोणतीही ठोस कारवाई याबाबत झाली नाही. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची असणारी वाघोली प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना बंद असल्याने वाघोली, गर्जेवाडी, कुंडलापूर येथे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.या पट्ट्यातील पाणीप्रश्न कायमस्वरुपी मिटण्यासाठी वरिष्ठ पातळीवर केवळ घोषणा करतात, पण स्थानिक पातळीवरील नेते याबाबत कोणतेही नेतृत्व करण्यास तयार होत नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे. याबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.सरकारकडून जनतेची केवळ चेष्टाघाटमाथ्यावरील जनता प्रखर दुष्काळाला तोंड देत असताना, टेंभू योजनेचे केवळ गाजर दाखवून चेष्टा केली जात आहे. या प्रश्नाचा केवळ राजकारणासाठी वापर केला जात असून, आज जवळजवळ एक वर्षापासून या भागातील जाखापूर, कुची व घाटनांद्रे भागास पिण्यास योग्य नसणारे पाणी टॅँकरने पुरविले जाते. त्या पाण्यास वास येतो. त्याचबरोबर वाघोली प्रादेशिक योजना बंद असल्याने वाघोली, गर्जेवाडी, कुंडलापुरात भीषण पाणीटंचाई आहे. चाºयाविना जनावरे दगावत असतानाही त्याचे शासनाला गांभीर्य नाही. गेली दोन वर्षे पिके वाया गेली तरीही त्याची खोटी आणेवारी लावल्याने पीक विमा मिळाला नाही. त्यामुळे शासकीय अधिकाºयाने वस्तुस्थितीची जाणीव ठेवून काम करावे व जनतेची चेष्टा थांबवावी, असे कॉँगे्रसचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले.