शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
2
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
3
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
4
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
5
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
6
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
7
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
8
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
9
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
10
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
11
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
12
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
13
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
14
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
15
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
16
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
17
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
18
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
19
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
20
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ’साठी सतरा कोटींची अट सिंचन व्यवस्थापन विभागाचा निर्णय : २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत वसुली मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:20 IST

सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ७१ कोटींची पाणीपट्टी थकीत असून, ३४ कोटींचे वीज बिल थकीत आहे. योजना सुरू करण्यासाठी शेतकºयांनी १७ कोटी १० लाख रुपये भरले,

सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ७१ कोटींची पाणीपट्टी थकीत असून, ३४ कोटींचे वीज बिल थकीत आहे. योजना सुरू करण्यासाठी शेतकºयांनी १७ कोटी १० लाख रुपये भरले, तरच म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु होणार आहे. म्हणूनच म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाच्या अधिकाºयांनी दि. २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारी कालावधित वसुलीची विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनांच्या वीजबिलांचा प्रश्न गंभीर बनला होता. थकित बिलापोटी तिन्ही योजना आॅक्टोबर २०१७ पासून बंद राहिल्या. थकबाकी भरल्याशिवाय योजना सुरु होणार नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले. म्हैसाळ योजनेचा मिरज, कवठेमहांकाळ आणि जत या तीन तालुक्यांना लाभ होतो. योजनेत १७१ गावांचा समावेश असून, ८२ हजार ९२२ हेक्टर सिंचनाखाली येणार आहे. सध्या ३६ हजार ६३५ हेक्टरवरील शेती पाण्याखाली आली आहे. म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रात द्राक्ष आणि डाळिंबाची पिके मोठ्या प्रमाणात आहेत. योजनेची पाणीपट्टी ७१ कोटी, तर ३४ कोटी ४९ लाख रुपये वीजबिल थकित आहे. योजना तात्काळ चालू करण्यासाठी १७ कोटी १० लाख भरावे लागणार आहेत.

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने पिकांना पाण्याची गरज आहे. पाण्याअभावी पिके करपू लागल्याने शेतकºयांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पाणी चालू करण्याची मागणी जोर धरत असली तरी, पाणीपट्टी भरल्याशिवाय योजना सुरू केली जाणार नाही, अशी भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली आहे. टंचाईच्या निधीतील शिल्लक रक्कम साडेसहा कोटी रुपये जमा झाले आहेत. परंतु उर्वरित रक्कम शेतकºयांना भरावी लागणार असल्याचे अटळ आहे.

अधिकाºयांनी म्हैसाळ योजनेच्या कार्यक्षेत्रात दि. २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधित पाणीपट्टी वसुलीची विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधित वसुली झाली तरच, म्हैसाळ योजना चालू होणार आहे, अन्यथा आवर्तन चालू होण्याची अपेक्षा फारच कमी आहे. परिणामी मिरज पूर्व, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील पिके अडचणीत सापडणार आहेत. विशेषत: द्राक्ष, डाळिंब बागांचे खूप मोठे नुकसान होणार आहे. यासाठी राजकारण बाजूला ठेवून शेतकºयांच्या हितासाठी पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.सहकार्य करावे : सूर्यकांत नलवडेवाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पिके धोक्यात आली आहेत, ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकारने आतापर्यंत थकीत वीज बिल भरण्यासाठी सहकार्य केले होते. त्यानुसार दोनवेळा पाणी योजना सुरु झाल्या आहेत. सध्या म्हैसाळ योजनेचे ३४ कोटींपर्यंत वीज बिल थकित असून, महावितरण कंपनीने किमान १७ कोटी १० लाखांपर्यंतची रक्कम भरण्याची सूचना केली आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी म्हैसाळ योजनेचा निश्चित फायदा होणार आहे. म्हणूनच शेतकºयांनी पाणीपट्टी भरल्यास लगेच म्हैसाळ योजना सुरू करणे शक्य होणार आहे, असे आवाहन म्हैसाळ पाणी व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांनी यांनी केले आहे. तसेच यासाठीच म्हैसाळ योजनेकडील वसुलीसाठी दि. २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारी कालावधित विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन पाणीपट्टीची रक्कम भरुन सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.