शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

‘म्हैसाळ’साठी सतरा कोटींची अट सिंचन व्यवस्थापन विभागाचा निर्णय : २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत वसुली मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:20 IST

सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ७१ कोटींची पाणीपट्टी थकीत असून, ३४ कोटींचे वीज बिल थकीत आहे. योजना सुरू करण्यासाठी शेतकºयांनी १७ कोटी १० लाख रुपये भरले,

सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ७१ कोटींची पाणीपट्टी थकीत असून, ३४ कोटींचे वीज बिल थकीत आहे. योजना सुरू करण्यासाठी शेतकºयांनी १७ कोटी १० लाख रुपये भरले, तरच म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु होणार आहे. म्हणूनच म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाच्या अधिकाºयांनी दि. २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारी कालावधित वसुलीची विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनांच्या वीजबिलांचा प्रश्न गंभीर बनला होता. थकित बिलापोटी तिन्ही योजना आॅक्टोबर २०१७ पासून बंद राहिल्या. थकबाकी भरल्याशिवाय योजना सुरु होणार नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले. म्हैसाळ योजनेचा मिरज, कवठेमहांकाळ आणि जत या तीन तालुक्यांना लाभ होतो. योजनेत १७१ गावांचा समावेश असून, ८२ हजार ९२२ हेक्टर सिंचनाखाली येणार आहे. सध्या ३६ हजार ६३५ हेक्टरवरील शेती पाण्याखाली आली आहे. म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रात द्राक्ष आणि डाळिंबाची पिके मोठ्या प्रमाणात आहेत. योजनेची पाणीपट्टी ७१ कोटी, तर ३४ कोटी ४९ लाख रुपये वीजबिल थकित आहे. योजना तात्काळ चालू करण्यासाठी १७ कोटी १० लाख भरावे लागणार आहेत.

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने पिकांना पाण्याची गरज आहे. पाण्याअभावी पिके करपू लागल्याने शेतकºयांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पाणी चालू करण्याची मागणी जोर धरत असली तरी, पाणीपट्टी भरल्याशिवाय योजना सुरू केली जाणार नाही, अशी भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली आहे. टंचाईच्या निधीतील शिल्लक रक्कम साडेसहा कोटी रुपये जमा झाले आहेत. परंतु उर्वरित रक्कम शेतकºयांना भरावी लागणार असल्याचे अटळ आहे.

अधिकाºयांनी म्हैसाळ योजनेच्या कार्यक्षेत्रात दि. २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधित पाणीपट्टी वसुलीची विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधित वसुली झाली तरच, म्हैसाळ योजना चालू होणार आहे, अन्यथा आवर्तन चालू होण्याची अपेक्षा फारच कमी आहे. परिणामी मिरज पूर्व, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील पिके अडचणीत सापडणार आहेत. विशेषत: द्राक्ष, डाळिंब बागांचे खूप मोठे नुकसान होणार आहे. यासाठी राजकारण बाजूला ठेवून शेतकºयांच्या हितासाठी पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.सहकार्य करावे : सूर्यकांत नलवडेवाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पिके धोक्यात आली आहेत, ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकारने आतापर्यंत थकीत वीज बिल भरण्यासाठी सहकार्य केले होते. त्यानुसार दोनवेळा पाणी योजना सुरु झाल्या आहेत. सध्या म्हैसाळ योजनेचे ३४ कोटींपर्यंत वीज बिल थकित असून, महावितरण कंपनीने किमान १७ कोटी १० लाखांपर्यंतची रक्कम भरण्याची सूचना केली आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी म्हैसाळ योजनेचा निश्चित फायदा होणार आहे. म्हणूनच शेतकºयांनी पाणीपट्टी भरल्यास लगेच म्हैसाळ योजना सुरू करणे शक्य होणार आहे, असे आवाहन म्हैसाळ पाणी व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांनी यांनी केले आहे. तसेच यासाठीच म्हैसाळ योजनेकडील वसुलीसाठी दि. २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारी कालावधित विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन पाणीपट्टीची रक्कम भरुन सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.