शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

‘म्हैसाळ’साठी सतरा कोटींची अट सिंचन व्यवस्थापन विभागाचा निर्णय : २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत वसुली मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:20 IST

सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ७१ कोटींची पाणीपट्टी थकीत असून, ३४ कोटींचे वीज बिल थकीत आहे. योजना सुरू करण्यासाठी शेतकºयांनी १७ कोटी १० लाख रुपये भरले,

सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ७१ कोटींची पाणीपट्टी थकीत असून, ३४ कोटींचे वीज बिल थकीत आहे. योजना सुरू करण्यासाठी शेतकºयांनी १७ कोटी १० लाख रुपये भरले, तरच म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु होणार आहे. म्हणूनच म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाच्या अधिकाºयांनी दि. २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारी कालावधित वसुलीची विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनांच्या वीजबिलांचा प्रश्न गंभीर बनला होता. थकित बिलापोटी तिन्ही योजना आॅक्टोबर २०१७ पासून बंद राहिल्या. थकबाकी भरल्याशिवाय योजना सुरु होणार नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले. म्हैसाळ योजनेचा मिरज, कवठेमहांकाळ आणि जत या तीन तालुक्यांना लाभ होतो. योजनेत १७१ गावांचा समावेश असून, ८२ हजार ९२२ हेक्टर सिंचनाखाली येणार आहे. सध्या ३६ हजार ६३५ हेक्टरवरील शेती पाण्याखाली आली आहे. म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रात द्राक्ष आणि डाळिंबाची पिके मोठ्या प्रमाणात आहेत. योजनेची पाणीपट्टी ७१ कोटी, तर ३४ कोटी ४९ लाख रुपये वीजबिल थकित आहे. योजना तात्काळ चालू करण्यासाठी १७ कोटी १० लाख भरावे लागणार आहेत.

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने पिकांना पाण्याची गरज आहे. पाण्याअभावी पिके करपू लागल्याने शेतकºयांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पाणी चालू करण्याची मागणी जोर धरत असली तरी, पाणीपट्टी भरल्याशिवाय योजना सुरू केली जाणार नाही, अशी भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली आहे. टंचाईच्या निधीतील शिल्लक रक्कम साडेसहा कोटी रुपये जमा झाले आहेत. परंतु उर्वरित रक्कम शेतकºयांना भरावी लागणार असल्याचे अटळ आहे.

अधिकाºयांनी म्हैसाळ योजनेच्या कार्यक्षेत्रात दि. २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधित पाणीपट्टी वसुलीची विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधित वसुली झाली तरच, म्हैसाळ योजना चालू होणार आहे, अन्यथा आवर्तन चालू होण्याची अपेक्षा फारच कमी आहे. परिणामी मिरज पूर्व, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील पिके अडचणीत सापडणार आहेत. विशेषत: द्राक्ष, डाळिंब बागांचे खूप मोठे नुकसान होणार आहे. यासाठी राजकारण बाजूला ठेवून शेतकºयांच्या हितासाठी पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.सहकार्य करावे : सूर्यकांत नलवडेवाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पिके धोक्यात आली आहेत, ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकारने आतापर्यंत थकीत वीज बिल भरण्यासाठी सहकार्य केले होते. त्यानुसार दोनवेळा पाणी योजना सुरु झाल्या आहेत. सध्या म्हैसाळ योजनेचे ३४ कोटींपर्यंत वीज बिल थकित असून, महावितरण कंपनीने किमान १७ कोटी १० लाखांपर्यंतची रक्कम भरण्याची सूचना केली आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी म्हैसाळ योजनेचा निश्चित फायदा होणार आहे. म्हणूनच शेतकºयांनी पाणीपट्टी भरल्यास लगेच म्हैसाळ योजना सुरू करणे शक्य होणार आहे, असे आवाहन म्हैसाळ पाणी व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांनी यांनी केले आहे. तसेच यासाठीच म्हैसाळ योजनेकडील वसुलीसाठी दि. २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारी कालावधित विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन पाणीपट्टीची रक्कम भरुन सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.