शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सात-बारा उताऱ्याविना होते फसगत...

By admin | Updated: January 15, 2015 23:21 IST

यंत्रणेत दोष : मूळ मालकाचे नाव, पत्ता बनावट; सरकारदरबारी सावळागोंधळ

सचिन लाड -सांगली -प्लॉट खरेदी करुनही खरेदीदारांना तलाठी अथवा नगरभूमापन कार्यालयातून सात-बारा उतारा मिळत नाही. खरेदीची नोंद घालण्यास टाळाटाळ केली जात असल्याने याची संधी साधून लॅण्डमाफिया याच प्लॉटची दुसऱ्या व्यक्तीला विक्री करीत आहेत. प्लॉटचा सात-बारा उतारा मूळ मालकाच्या नावावर निघत असला तरी, या मालकाचे नाव व पत्ताही बनावट असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे प्लॉटचा मालक आहे तरी कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.प्लॉट खरेदी केल्यानंतर त्याची नोंद करण्यासाठी खरेदीदार नगरभूमापन व तलाठी कार्यालयात जातात. खरेदीचा दस्त दिला जातो. अधिकाऱ्याकडून चार-आठ दिवसात काम केले जाईल, असे सांगितले जाते. नोंदीसाठी पैशाचीही मागणी केली जाते. खरेदीदार पैसेही देतात. मात्र तीन-तीन महिने नोंद केली जात नाही. आज ना उद्या नोंद होईल, असा विचार करुन खरेदीदारही शांत बसतात. दरम्यानच्या काळात लॅण्डमाफिया त्या प्लॉटची अन्य ग्राहक शोधून विक्री करतात. यातून एका प्लॉटचे तीन मालक होतात. याची माहिती खरेदीदारांना नसतेच. मूळ जो कोणी मालक आहे, तो या व्यवहारात नसतो. त्याला याची माहितीही नसते. ज्यांना-ज्यांना एकाच प्लॉटची विक्री केली आहे, त्यांच्या नावावर आजपर्यंत कधीच सात-बारा उतारा निघाला नाही. सात-बारा उतारा का निघत नाही, याची खरेदीदार चौकशी करण्यास जातात, त्यावेळी अधिकाऱ्याकडून प्लॉटचा मूळ मालक कोण आहे, याची माहिती दिली जाते. खरेदीदार या मालकाचा शोध घेऊन त्याला गाठण्याचा प्रयत्न करतो. तथापि तो मालक सापडत नाही. कारण मालकाचे नाव व पत्ता बनावट असल्याची माहिती पुढे आली आहे. यामागेही लॅण्डमाफियांची टोळीच आहे. लॅण्डमाफिया मात्र नामानिराळे राहतात. त्यांच्याकडेही खरेदीदार चौकशी करतात. तथापि ते ‘आम्हाला काही माहीत नाही, प्लॉट तुम्हाला विकला आहे, कागदपत्रे सर्व दाखविली होती, आता आमची काहीच जबाबदारी नाही. पुन्हा आला तर याद राखा’, अशी दमदाटी करतात. शासकीय यंत्रणेतील दोषांमुळे सर्वसामान्यांना लाखोंचा गंडा बसत आहे.सात-बारा उताऱ्याविना होते फसगत...यंत्रणेत दोष : मूळ मालकाचे नाव, पत्ता बनावट; सरकारदरबारी सावळागोंधळसचिन लाड ल्ल सांगलीप्लॉट खरेदी करुनही खरेदीदारांना तलाठी अथवा नगरभूमापन कार्यालयातून सात-बारा उतारा मिळत नाही. खरेदीची नोंद घालण्यास टाळाटाळ केली जात असल्याने याची संधी साधून लॅण्डमाफिया याच प्लॉटची दुसऱ्या व्यक्तीला विक्री करीत आहेत. प्लॉटचा सात-बारा उतारा मूळ मालकाच्या नावावर निघत असला तरी, या मालकाचे नाव व पत्ताही बनावट असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे प्लॉटचा मालक आहे तरी कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.प्लॉट खरेदी केल्यानंतर त्याची नोंद करण्यासाठी खरेदीदार नगरभूमापन व तलाठी कार्यालयात जातात. खरेदीचा दस्त दिला जातो. अधिकाऱ्याकडून चार-आठ दिवसात काम केले जाईल, असे सांगितले जाते. नोंदीसाठी पैशाचीही मागणी केली जाते. खरेदीदार पैसेही देतात. मात्र तीन-तीन महिने नोंद केली जात नाही. आज ना उद्या नोंद होईल, असा विचार करुन खरेदीदारही शांत बसतात. दरम्यानच्या काळात लॅण्डमाफिया त्या प्लॉटची अन्य ग्राहक शोधून विक्री करतात. यातून एका प्लॉटचे तीन मालक होतात. याची माहिती खरेदीदारांना नसतेच. मूळ जो कोणी मालक आहे, तो या व्यवहारात नसतो. त्याला याची माहितीही नसते. ज्यांना-ज्यांना एकाच प्लॉटची विक्री केली आहे, त्यांच्या नावावर आजपर्यंत कधीच सात-बारा उतारा निघाला नाही. सात-बारा उतारा का निघत नाही, याची खरेदीदार चौकशी करण्यास जातात, त्यावेळी अधिकाऱ्याकडून प्लॉटचा मूळ मालक कोण आहे, याची माहिती दिली जाते. खरेदीदार या मालकाचा शोध घेऊन त्याला गाठण्याचा प्रयत्न करतो. तथापि तो मालक सापडत नाही. कारण मालकाचे नाव व पत्ता बनावट असल्याची माहिती पुढे आली आहे. यामागेही लॅण्डमाफियांची टोळीच आहे. लॅण्डमाफिया मात्र नामानिराळे राहतात. त्यांच्याकडेही खरेदीदार चौकशी करतात. तथापि ते ‘आम्हाला काही माहीत नाही, प्लॉट तुम्हाला विकला आहे, कागदपत्रे सर्व दाखविली होती, आता आमची काहीच जबाबदारी नाही. पुन्हा आला तर याद राखा’, अशी दमदाटी करतात. शासकीय यंत्रणेतील दोषांमुळे सर्वसामान्यांना लाखोंचा गंडा बसत आहे.प्लॉट विक्रीचा एखादा व्यवहार पूर्ण झाला, तर लॅण्डमाफियांची ५० ते ६० लाखांची कमाई होत आहे. पैसा, दहशत, शासकीय अधिकारी व पोलिसांशी असलेल्या संबंधामुळे त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई होत नाही. एखाद्याने तक्रार केली, तर त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा सापडत नाही. प्लॉटच्या मालकी हक्कावरुन खरेदीदारांमध्ये भांडण मात्र लागत आहे.