शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

वाळू माफियांच्या शोधासाठी सात पथके

By admin | Updated: November 23, 2014 23:53 IST

राजापूर हल्ला प्रकरण : तासगावात आज ग्रामस्थांचे धरणे

कवठेएकंद : राजापूर (ता. तासगाव) येथील येरळा नदीच्या पात्रात वाळू उपशाला विरोध करणाऱ्या येरळा बचाव कृती समितीच्या शेतकऱ्यांवर वाळू माफियांच्या शोधार्थ पोलिसांची सात पथके जिल्ह्यात विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. रविवारी रात्री उशिरापर्यंत कोणासही अटक करण्यात आली नाही. दरम्यान, हल्ल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी सकाळी ११ वा. तासगाव शहरातील शिवाजी पुतळा चौकात राजापूर ग्रामस्थांच्यावतीने काळ््या फिती लावून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्थांवर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर मोक्का कायदा लावून कारवाई करावी, या मागणीसाठी राजापूर येथे गावबंद करून आंदोलन करण्यात येणार आहे.शनिवारी मध्यरात्री येरळा नदीत वाळू माफियांनी येरळा बचाव समितीच्या शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यामध्ये वाळू माफियांनी लोखंडी गज, काठ्या, खोऱ्यांनी मारहाण केली. या हल्ल्यामध्ये सहा शेतकरी जखमी झाले. संजय पाटील, महादेव पाटील, पोपट हजारे, विजय पाटील, वसंत पवार व दाजी पवार हे शेतकरी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी दिनकर पाटील, जमीर शेख, अण्णासाहेब यलमार, दादासाहेब पाटील (सर्व रा. शिरगाव, ता. तासगाव) यांच्यासह ३० अज्ञातांवर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या भ्याड हल्ल्याचा राजापूर ग्रामस्थांच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी सकाळी ११ वा. तासगाव शहरातील शिवाजी पुतळा चौकात काळ््या फिती लावून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच राजापूर गावबंद करून आंदोलन करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. संबंधित वाळू माफियांवर मोक्का लावून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे दरम्यान, या प्रकरणी वाळू माफियांचा शोध घेण्यासाठी तासगाव, पलूस, भिलवडी, कुंडल या पोलीस ठाण्यांसह स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची सात पथके रवाना झाली आहेत. सावर्डे, कौलगे, बोरगाव, भिलवडी, पलूस, वायफळे, सावळज यासह जिल्ह्यातील इतर गावात त्यांचा शोध चालू आहे. माफियांच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी छापेही टाकले. रात्री उशिरापर्यंत कोणासही अटक करण्यात आली नव्हती. पुढील तपास निरीक्षक रमेश बनकर करीत आहेत. (वार्ताहर)मोक्काची मागणीराजापूर येथील येरळा नदीत वाळूची चोरी मोठ्या प्रमाणात होत होती. याबाबत ग्रामस्थांनी महसूल व पोलीस यंत्रणेकडे तक्रारीही केल्या. पण कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर ग्रामस्थांनीच वाळू चोरी रोखण्याचा निर्धार केला. पण काल वाळू माफियांनी ग्रामस्थांवरच हल्ला केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या वाळू माफियांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.