शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

वाळू माफियांच्या शोधासाठी सात पथके

By admin | Updated: November 23, 2014 23:53 IST

राजापूर हल्ला प्रकरण : तासगावात आज ग्रामस्थांचे धरणे

कवठेएकंद : राजापूर (ता. तासगाव) येथील येरळा नदीच्या पात्रात वाळू उपशाला विरोध करणाऱ्या येरळा बचाव कृती समितीच्या शेतकऱ्यांवर वाळू माफियांच्या शोधार्थ पोलिसांची सात पथके जिल्ह्यात विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. रविवारी रात्री उशिरापर्यंत कोणासही अटक करण्यात आली नाही. दरम्यान, हल्ल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी सकाळी ११ वा. तासगाव शहरातील शिवाजी पुतळा चौकात राजापूर ग्रामस्थांच्यावतीने काळ््या फिती लावून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्थांवर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर मोक्का कायदा लावून कारवाई करावी, या मागणीसाठी राजापूर येथे गावबंद करून आंदोलन करण्यात येणार आहे.शनिवारी मध्यरात्री येरळा नदीत वाळू माफियांनी येरळा बचाव समितीच्या शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यामध्ये वाळू माफियांनी लोखंडी गज, काठ्या, खोऱ्यांनी मारहाण केली. या हल्ल्यामध्ये सहा शेतकरी जखमी झाले. संजय पाटील, महादेव पाटील, पोपट हजारे, विजय पाटील, वसंत पवार व दाजी पवार हे शेतकरी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी दिनकर पाटील, जमीर शेख, अण्णासाहेब यलमार, दादासाहेब पाटील (सर्व रा. शिरगाव, ता. तासगाव) यांच्यासह ३० अज्ञातांवर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या भ्याड हल्ल्याचा राजापूर ग्रामस्थांच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी सकाळी ११ वा. तासगाव शहरातील शिवाजी पुतळा चौकात काळ््या फिती लावून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच राजापूर गावबंद करून आंदोलन करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. संबंधित वाळू माफियांवर मोक्का लावून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे दरम्यान, या प्रकरणी वाळू माफियांचा शोध घेण्यासाठी तासगाव, पलूस, भिलवडी, कुंडल या पोलीस ठाण्यांसह स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची सात पथके रवाना झाली आहेत. सावर्डे, कौलगे, बोरगाव, भिलवडी, पलूस, वायफळे, सावळज यासह जिल्ह्यातील इतर गावात त्यांचा शोध चालू आहे. माफियांच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी छापेही टाकले. रात्री उशिरापर्यंत कोणासही अटक करण्यात आली नव्हती. पुढील तपास निरीक्षक रमेश बनकर करीत आहेत. (वार्ताहर)मोक्काची मागणीराजापूर येथील येरळा नदीत वाळूची चोरी मोठ्या प्रमाणात होत होती. याबाबत ग्रामस्थांनी महसूल व पोलीस यंत्रणेकडे तक्रारीही केल्या. पण कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर ग्रामस्थांनीच वाळू चोरी रोखण्याचा निर्धार केला. पण काल वाळू माफियांनी ग्रामस्थांवरच हल्ला केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या वाळू माफियांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.