शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांच्या शोधासाठी सात पथके

By admin | Updated: November 23, 2014 23:53 IST

राजापूर हल्ला प्रकरण : तासगावात आज ग्रामस्थांचे धरणे

कवठेएकंद : राजापूर (ता. तासगाव) येथील येरळा नदीच्या पात्रात वाळू उपशाला विरोध करणाऱ्या येरळा बचाव कृती समितीच्या शेतकऱ्यांवर वाळू माफियांच्या शोधार्थ पोलिसांची सात पथके जिल्ह्यात विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. रविवारी रात्री उशिरापर्यंत कोणासही अटक करण्यात आली नाही. दरम्यान, हल्ल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी सकाळी ११ वा. तासगाव शहरातील शिवाजी पुतळा चौकात राजापूर ग्रामस्थांच्यावतीने काळ््या फिती लावून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्थांवर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर मोक्का कायदा लावून कारवाई करावी, या मागणीसाठी राजापूर येथे गावबंद करून आंदोलन करण्यात येणार आहे.शनिवारी मध्यरात्री येरळा नदीत वाळू माफियांनी येरळा बचाव समितीच्या शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यामध्ये वाळू माफियांनी लोखंडी गज, काठ्या, खोऱ्यांनी मारहाण केली. या हल्ल्यामध्ये सहा शेतकरी जखमी झाले. संजय पाटील, महादेव पाटील, पोपट हजारे, विजय पाटील, वसंत पवार व दाजी पवार हे शेतकरी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी दिनकर पाटील, जमीर शेख, अण्णासाहेब यलमार, दादासाहेब पाटील (सर्व रा. शिरगाव, ता. तासगाव) यांच्यासह ३० अज्ञातांवर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या भ्याड हल्ल्याचा राजापूर ग्रामस्थांच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी सकाळी ११ वा. तासगाव शहरातील शिवाजी पुतळा चौकात काळ््या फिती लावून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच राजापूर गावबंद करून आंदोलन करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. संबंधित वाळू माफियांवर मोक्का लावून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे दरम्यान, या प्रकरणी वाळू माफियांचा शोध घेण्यासाठी तासगाव, पलूस, भिलवडी, कुंडल या पोलीस ठाण्यांसह स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची सात पथके रवाना झाली आहेत. सावर्डे, कौलगे, बोरगाव, भिलवडी, पलूस, वायफळे, सावळज यासह जिल्ह्यातील इतर गावात त्यांचा शोध चालू आहे. माफियांच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी छापेही टाकले. रात्री उशिरापर्यंत कोणासही अटक करण्यात आली नव्हती. पुढील तपास निरीक्षक रमेश बनकर करीत आहेत. (वार्ताहर)मोक्काची मागणीराजापूर येथील येरळा नदीत वाळूची चोरी मोठ्या प्रमाणात होत होती. याबाबत ग्रामस्थांनी महसूल व पोलीस यंत्रणेकडे तक्रारीही केल्या. पण कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर ग्रामस्थांनीच वाळू चोरी रोखण्याचा निर्धार केला. पण काल वाळू माफियांनी ग्रामस्थांवरच हल्ला केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या वाळू माफियांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.