शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

नियोजन समितीला सात महिन्यांचा खंड

By admin | Updated: July 9, 2014 00:35 IST

निवडणुकीचे निमित्त : लोकप्रतिनिधींच्या मतांकडे दुर्लक्ष

अंजर अथणीकर ल्ल सांगलीजिल्ह्याच्या विकासाच्या चाव्या ज्या समितीच्या हाती असतात, त्या जिल्हा नियोजन समितीला गैरनियोजनाचा फटका बसत आहे. गेल्या सात महिन्यांपासून समितीची सभाच झालेली नाही. १७५ कोटींचा अर्थसंकल्प तयार करूनही त्यातील केवळ ४३ कोटी २४ लाख रुपयेच संबंधित कामासाठी वर्ग करण्यात आले आहेत. त्यातही लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता समितीचा कारभार सुरू असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. नियोजन समितीच्या रखडलेल्या कारभाराला लोकसभा व विधानपरिषद निवडणूक आचारसंहितेचे कारण जोडले जात आहे. जिल्हा वार्षिक योजना आराखड्यास आता जिल्हास्तरावरच प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी दिली जात आहे. शासनाने जिल्हा नियोजन समित्यांनाही व्यापक अधिकार दिल्याने या समित्याही सक्षम आणि बळकट बनल्या आहेत. सांगली जिल्ह्याचा विचार करता, गेल्या पाच वर्षात जिल्हा वार्षिक योजना आराखड्याच्या तरतुदीत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. २००९-१० मध्ये जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यांतर्गत सर्वसाधारण योजनेसाठी अवघ्या ९९ कोटी १३ लाखांची तरतूद होती. मात्र २०१४-२०१५ या वर्षासाठी ती १७५ कोटींची झाली आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधित जिल्हा वार्षिक योजना आराखड्याची तरतूद जवळपास दुप्पट झाली आहे. जिल्हास्तरावरील प्रशासकीय कामांच्या मंजुरीचे आणि निधी वाटपाचे अधिकारही जिल्हा नियोजन समित्यांना प्रदान केल्याने समित्या अधिक गतिमान झाल्या आहेत. जिल्ह्याची गरज आणि आवश्यकता विचारात घेऊन जिल्हा वार्षिक योजना आराखडा जिल्ह्यातच तयार करण्याबरोबरच योजनांना प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरीही जिल्ह्यातच दिली जात आहे. असे असताना गेल्या सात महिन्यांपासून समितीची सभा झालेली नाही. सभा तीन महिन्यांत एकदा घेणे बंधनकारक असताना, ही सभा टाळण्यात आली आहे. मार्चमध्ये लोकसभा निवडणूक व त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागली. २० जूनला या आचारसंहिता संपल्या असतानाही या सभा घेण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली नाही. १७५ कोटींचा अर्थसंकल्प समितीचा असताना यामध्ये लोकप्रतिनिधींना सामावून घेतले जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. समितीचा निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करणे आवश्यक आहे. खर्च करण्याचा कालावधी आता तीन महिन्यांचा केलेला आहे.