शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

‘वसंतदादा’च्या प्रशासनाकडून सत्तर लाखांचा गैरव्यवहार - संजय कोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 00:42 IST

सांगली : वसंतदादा साखर कारखान्याकडे २०१३-१४ या गळीत हंगामासाठी ऊस पाठविलेल्या शेतकऱ्यांची आठ कोटींची थकबाकी आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे ‘दत्त इंडिया’ने दिलेले पैसे कर्जाला भरले

सांगली : वसंतदादा साखर कारखान्याकडे २०१३-१४ या गळीत हंगामासाठी ऊस पाठविलेल्या शेतकऱ्यांची आठ कोटींची थकबाकी आहे. ती देण्यासाठी श्री दत्त इंडिया शुगरने कारखाना प्रशासनाकडे अडीच महिन्यापूर्वी अडीच कोटी रुपये दिले होते. त्यापैकी एक कोटी ८५ लाख रुपयांची शेतकऱ्यांची बिले दिली असून उर्वरित ७० लाख रुपये कारखान्याच्या कर्जासाठी भरले आहेत. हा गैरव्यवहार असल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या सहकार आघाडीचे राज्याध्यक्ष संजय कोले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.ते म्हणाले की, श्री दत्त इंडिया शुगरने पहिला हंगाम यशस्वीपणे चालविला आहे. दत्त इंडियाकडे २०१३-१४ वर्षातील आठ कोटींची ऊस उत्पादकांची बिले थकीत आहेत. ते देण्यासाठी शेतकरी संघटना आणि शेतकºयांनी रेटा लावल्यामुळे दत्त इंडियाने आठ कोटींपैकी दोन कोटी ५५ लाख रुपयांची रक्कम वसंतदादा कारखान्याकडे अडीच महिन्यांपूर्वी दिली होती. वसंतदादा कारखाना प्रशासनाने सहा गटातील शेतकºयांना केवळ एक कोटी ८५ लाख रुपयेच वाटप केले आहेत. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना देण्याऐवजी कारखाना प्रशासनाने बँक खाते एनपीएतून बाहेर काढण्यासाठी वापरली आहे. यामुळे या सहा गटातील शेतकरी थकीत बिलापासून वंचित राहिले आहेत.याबद्दल सहकारमंत्री आणि साखर आयुक्तांकडे तक्रार करण्यात येणार आहे, असेही संजय कोले यांनी सांगितले.‘वसंतदादा’कडून गैरव्यवहार नाही : मृत्युंजय शिंदेश्री दत्त इंडिया शुगरने वसंतदादा कारखान्याला २०१३-१४ च्या गळीत हंगामात ऊस घातलेल्या शेतकºयांची थकीत बिले देण्यासाठी दोन कोटी ५५ लाख ७८ हजार रुपयांची रक्कम दिली होती. त्यापैकी बहुतांशी पैसे शेतकºयांना वाटप झाले असून, काही शेतकºयांनीच बिले नेली नसल्यामुळे त्यांच्याकडे ती रक्कम शिल्लक दिसत आहे. परंतु, ती रक्कम कारखान्याच्या खात्यावरच शिल्लक आहे. ‘त्या’ रकमेचा कोणताही गैरव्यवहार वसंतदादा प्रशासनाने केलेला नाही. मिरज, सांगली गटातील शेतकºयांनी बिल नेले नसेल, तर अन्य गटातील शेतकºयांना ते पैसे वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी प्रतिक्रिया श्री दत्त इंडिया शुगरचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांनी दिली.संस्था पुनर्विकास निधीच्या नावाखाली लूटवसंतदादा साखर कारखान्याची २०१३-१४ हंगामामध्ये २१४० रुपये एफआरपी होती. या दराने बिल देण्याऐवजी संस्था पुनर्विकासच्या नावाखाली प्रतिटन १४० रुपये कपात करुन पावत्या दिल्या जात आहेत. शेतकºयांकडून पुन्हा ही रक्कम परत न करण्याच्या अटीवर देत असल्याचे लेखी लिहून घेतले जात आहे. वसंतदादा कारखान्याने संस्था पुनर्विकास निधीच्या नावाखाली शेतकºयांची लूट सुरू केली असून, तीही बेकायदेशीर आहे, असेही संजय कोले म्हणाले.