शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंतदादा’च्या प्रशासनाकडून सत्तर लाखांचा गैरव्यवहार - संजय कोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 00:42 IST

सांगली : वसंतदादा साखर कारखान्याकडे २०१३-१४ या गळीत हंगामासाठी ऊस पाठविलेल्या शेतकऱ्यांची आठ कोटींची थकबाकी आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे ‘दत्त इंडिया’ने दिलेले पैसे कर्जाला भरले

सांगली : वसंतदादा साखर कारखान्याकडे २०१३-१४ या गळीत हंगामासाठी ऊस पाठविलेल्या शेतकऱ्यांची आठ कोटींची थकबाकी आहे. ती देण्यासाठी श्री दत्त इंडिया शुगरने कारखाना प्रशासनाकडे अडीच महिन्यापूर्वी अडीच कोटी रुपये दिले होते. त्यापैकी एक कोटी ८५ लाख रुपयांची शेतकऱ्यांची बिले दिली असून उर्वरित ७० लाख रुपये कारखान्याच्या कर्जासाठी भरले आहेत. हा गैरव्यवहार असल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या सहकार आघाडीचे राज्याध्यक्ष संजय कोले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.ते म्हणाले की, श्री दत्त इंडिया शुगरने पहिला हंगाम यशस्वीपणे चालविला आहे. दत्त इंडियाकडे २०१३-१४ वर्षातील आठ कोटींची ऊस उत्पादकांची बिले थकीत आहेत. ते देण्यासाठी शेतकरी संघटना आणि शेतकºयांनी रेटा लावल्यामुळे दत्त इंडियाने आठ कोटींपैकी दोन कोटी ५५ लाख रुपयांची रक्कम वसंतदादा कारखान्याकडे अडीच महिन्यांपूर्वी दिली होती. वसंतदादा कारखाना प्रशासनाने सहा गटातील शेतकºयांना केवळ एक कोटी ८५ लाख रुपयेच वाटप केले आहेत. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना देण्याऐवजी कारखाना प्रशासनाने बँक खाते एनपीएतून बाहेर काढण्यासाठी वापरली आहे. यामुळे या सहा गटातील शेतकरी थकीत बिलापासून वंचित राहिले आहेत.याबद्दल सहकारमंत्री आणि साखर आयुक्तांकडे तक्रार करण्यात येणार आहे, असेही संजय कोले यांनी सांगितले.‘वसंतदादा’कडून गैरव्यवहार नाही : मृत्युंजय शिंदेश्री दत्त इंडिया शुगरने वसंतदादा कारखान्याला २०१३-१४ च्या गळीत हंगामात ऊस घातलेल्या शेतकºयांची थकीत बिले देण्यासाठी दोन कोटी ५५ लाख ७८ हजार रुपयांची रक्कम दिली होती. त्यापैकी बहुतांशी पैसे शेतकºयांना वाटप झाले असून, काही शेतकºयांनीच बिले नेली नसल्यामुळे त्यांच्याकडे ती रक्कम शिल्लक दिसत आहे. परंतु, ती रक्कम कारखान्याच्या खात्यावरच शिल्लक आहे. ‘त्या’ रकमेचा कोणताही गैरव्यवहार वसंतदादा प्रशासनाने केलेला नाही. मिरज, सांगली गटातील शेतकºयांनी बिल नेले नसेल, तर अन्य गटातील शेतकºयांना ते पैसे वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी प्रतिक्रिया श्री दत्त इंडिया शुगरचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांनी दिली.संस्था पुनर्विकास निधीच्या नावाखाली लूटवसंतदादा साखर कारखान्याची २०१३-१४ हंगामामध्ये २१४० रुपये एफआरपी होती. या दराने बिल देण्याऐवजी संस्था पुनर्विकासच्या नावाखाली प्रतिटन १४० रुपये कपात करुन पावत्या दिल्या जात आहेत. शेतकºयांकडून पुन्हा ही रक्कम परत न करण्याच्या अटीवर देत असल्याचे लेखी लिहून घेतले जात आहे. वसंतदादा कारखान्याने संस्था पुनर्विकास निधीच्या नावाखाली शेतकºयांची लूट सुरू केली असून, तीही बेकायदेशीर आहे, असेही संजय कोले म्हणाले.