शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

सात कारखान्यांची धुराडी बंद

By admin | Updated: February 22, 2017 23:23 IST

बेचाळीस लाख टन उसाचे गाळप : पन्नास लाख क्विंटल साखर उत्पादन

सांगली : जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी मागील तीन महिन्यात ४२ लाख टन उसाचे गाळप करून ५० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन साखर कारखान्यांकडून करण्यात आले आहे. उसाचा साखर उतारा सरासरी ११.८२ टक्के आहे. उसाच्या कमतरतेमुळे महांकाली साखर कारखाना, वसंतदादा साखर कारखान्यासह सहा साखर कारखान्यांना हंगाम अर्धवटच उरकता घ्यावा लागला असून त्यांनी धुराडी बंद केली आहेत. उर्वरित कारखान्यांचे हंगामही आठवडाभर चालतील, अशी परिस्थिती आहे.जिल्ह्यातील मागीलवर्षी उसाची पुरेशी लागवड झाली नाही. उसाची बिलेही वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी अन्य पिकांकडे वळला आहे. चार वर्षापूर्वी कर्नाटकातील ऊस महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात येत होता. परंतु, कर्नाटक सीमाभागातही साखर कारखाने उभे राहिल्यामुळे, त्यांनाच तेथे ऊस कमी पडू लागला आहे. यातच यावर्षी कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांनीही काट्यावर पैसे देऊन मोठ्याप्रमाणात जिल्ह्यातील ऊस पळविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना पुरेसा ऊसच उपलब्ध झाला नसल्यामुळे त्यांना निम्म्यातच कारखान्यांचे गळीत हंगाम उरकावे लागले.जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ४२ लाख टन उसाचे गाळप करून ५० लाख क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. गळीत हंगामामध्ये क्रांती कारखान्याने आघाडी घेतली असून त्यांनी आतापर्यंत पाच लाख ६९ हजार ८९० टन उसाचे गाळप केले आहे. त्यांनी सहा लाख ९३ हजार १७० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले असून, १२.३१ टक्के साखरेचा उतारा मिळाला आहे. राजारामबापू पाटील, साखराळे (ता. वाळवा) या कारखान्याने साडेचार टन उसाचे गाळप करून पाच लाख १५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. उतारा सर्वाधिक १२.७५ टक्के मिळविला आहे. यामुळे कारखानदारीबराबेर ऊस उत्पादक ही अडचणीत सापडला आहे. याचा परिणाम साखर उत्पादनाबरोबरच येथील ऊस उत्पादकांवर झाला आहे. यामुळे कारखानदारीवर असणारा शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र सर्वत्र आहे. (प्रतिनिधी)कारखान्यांचा बंद हंगामराजारामबापू साखर कारखान्याच्या ताब्यात असलेल्या जतच्या डफळे कारखान्यास तर दहा दिवसातच गळीत हंगाम बंद करावा लागला. त्यानंतर लगेचच खासदार संजयकाका पाटील यांच्या ताब्यातील नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत कारखान्याचा गळीत हंगामही सातच दिवसात बंद झाला. सांगलीतील वसंतदादा कारखाना महिन्यात, तर महांकाली (कवठेमहांकाळ), निनाईदेवी (दालमिया) कोकरूड, (ता. शिराळा), सद्गुरु श्री श्री शुगर राजेवाडी (ता. आटपाडी) या कारखान्यांना महिना ते दीड महिन्यात गळीत हंगाम उरकावा लागला. उर्वरित साखर कारखान्यांचा गळीत हंगाम फार दिवस चालेल अशी परिस्थिती नाही. येत्या पंधरा दिवसात गळीत हंगाम बंद होण्याची शक्यता आहे.