शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
3
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
4
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
5
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
6
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
7
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
8
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
9
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
10
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
11
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
14
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
15
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
16
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
17
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
18
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
19
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
20
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

सात कारखान्यांची धुराडी बंद

By admin | Updated: February 22, 2017 23:23 IST

बेचाळीस लाख टन उसाचे गाळप : पन्नास लाख क्विंटल साखर उत्पादन

सांगली : जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी मागील तीन महिन्यात ४२ लाख टन उसाचे गाळप करून ५० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन साखर कारखान्यांकडून करण्यात आले आहे. उसाचा साखर उतारा सरासरी ११.८२ टक्के आहे. उसाच्या कमतरतेमुळे महांकाली साखर कारखाना, वसंतदादा साखर कारखान्यासह सहा साखर कारखान्यांना हंगाम अर्धवटच उरकता घ्यावा लागला असून त्यांनी धुराडी बंद केली आहेत. उर्वरित कारखान्यांचे हंगामही आठवडाभर चालतील, अशी परिस्थिती आहे.जिल्ह्यातील मागीलवर्षी उसाची पुरेशी लागवड झाली नाही. उसाची बिलेही वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी अन्य पिकांकडे वळला आहे. चार वर्षापूर्वी कर्नाटकातील ऊस महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात येत होता. परंतु, कर्नाटक सीमाभागातही साखर कारखाने उभे राहिल्यामुळे, त्यांनाच तेथे ऊस कमी पडू लागला आहे. यातच यावर्षी कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांनीही काट्यावर पैसे देऊन मोठ्याप्रमाणात जिल्ह्यातील ऊस पळविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना पुरेसा ऊसच उपलब्ध झाला नसल्यामुळे त्यांना निम्म्यातच कारखान्यांचे गळीत हंगाम उरकावे लागले.जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ४२ लाख टन उसाचे गाळप करून ५० लाख क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. गळीत हंगामामध्ये क्रांती कारखान्याने आघाडी घेतली असून त्यांनी आतापर्यंत पाच लाख ६९ हजार ८९० टन उसाचे गाळप केले आहे. त्यांनी सहा लाख ९३ हजार १७० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले असून, १२.३१ टक्के साखरेचा उतारा मिळाला आहे. राजारामबापू पाटील, साखराळे (ता. वाळवा) या कारखान्याने साडेचार टन उसाचे गाळप करून पाच लाख १५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. उतारा सर्वाधिक १२.७५ टक्के मिळविला आहे. यामुळे कारखानदारीबराबेर ऊस उत्पादक ही अडचणीत सापडला आहे. याचा परिणाम साखर उत्पादनाबरोबरच येथील ऊस उत्पादकांवर झाला आहे. यामुळे कारखानदारीवर असणारा शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र सर्वत्र आहे. (प्रतिनिधी)कारखान्यांचा बंद हंगामराजारामबापू साखर कारखान्याच्या ताब्यात असलेल्या जतच्या डफळे कारखान्यास तर दहा दिवसातच गळीत हंगाम बंद करावा लागला. त्यानंतर लगेचच खासदार संजयकाका पाटील यांच्या ताब्यातील नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत कारखान्याचा गळीत हंगामही सातच दिवसात बंद झाला. सांगलीतील वसंतदादा कारखाना महिन्यात, तर महांकाली (कवठेमहांकाळ), निनाईदेवी (दालमिया) कोकरूड, (ता. शिराळा), सद्गुरु श्री श्री शुगर राजेवाडी (ता. आटपाडी) या कारखान्यांना महिना ते दीड महिन्यात गळीत हंगाम उरकावा लागला. उर्वरित साखर कारखान्यांचा गळीत हंगाम फार दिवस चालेल अशी परिस्थिती नाही. येत्या पंधरा दिवसात गळीत हंगाम बंद होण्याची शक्यता आहे.