शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

‘ताकारी-म्हैसाळ’साठी स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभाग

By admin | Updated: April 1, 2015 00:02 IST

शासनाचा अध्यादेश : बुधवारपासून कार्यवाही सुरू होणार

देवराष्ट्रे : ताकारी व म्हैसाळ योजनेच्या बांधकाम व प्रशासन विभागाकडे आतापर्यंत सिंचन व्यवस्थापन विभागाची अतिरिक्त जबाबदारी होती. यामुळे प्रशासनावर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण पडत होता. ओलिताखाली आलेल्या क्षेत्राचे योग्य सर्वेक्षण होत नव्हते. याचा फटका योजनांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास बसत होता. याबाबत व्यवस्थापनाने सिंचन व्यवस्थापन विभाग स्वतंत्र करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने सिंचन व्यवस्थापन विभाग स्वतंत्र करण्याचा अध्यादेश काढला आहे. ही कार्यवाही आजपासूनच (बुधवारी) सुरू होणार आहे, अशी माहिती ताकारी योजनेच्या अधिकाऱ्यांनी दिली.योजनांच्या लाभक्षेत्रातील ओलिताखालील क्षेत्रात वाढ होत चालली असल्याने सिंचन व्यवस्थापन विभागाची गरज भेडसावत होती. किंबहुना योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी या विभागाची योजनांना सक्त गरज निर्माण झाली होती. ताकारी योजनेचे लाभक्षेत्र २७ हजार हेक्टर आहे. त्यामुळे अपुरी कामे, नवीन कामे, पाणी सुरू-बंद करणे, मोजणी करणे, आकारणी करणे आणि वसुली यासारख्या सर्व कामांचा अतिरिक्त बोजा बांधकाम व प्रशासन विभागावर पडत होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करणे व शेतकऱ्यांना सोयी देणे कठीण बनले होते. याचा आर्थिक भुर्दंड योजनेला सहन करावा लागत होता. त्यामुळे ही योजना दिवसेंदिवस तोट्यातच चालली होती.सिंचन व्यवस्थापन विभाग स्वतंत्र व्हावा, यासाठी प्रशासनाची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. तसा याबाबत राज्य शासनाकडे प्रस्तावही सादर करण्यात आला होता. त्यानुसार राज्य शासनाने म्हैसाळ योजनेच्या विभाग क्र. १ चे ताकारी-म्हैसाळ सिंचन व्यवस्थापन विभाग असे नामांतर केले आहे. या मुख्य विभागांतर्गत ताकारी योजनेच्या दोन उपशाखा काम करणार आहेत. त्यापैकी एक शाखा वांगी (ता. कडेगाव) येथे, तर देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील दुसरी शाखा तासगाव येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. या दोन्ही शाखांना ताकारीच्या एकूण लाभक्षेत्रापैकी कमी-अधिक प्रमाणात क्षेत्राची विभागणी करून देण्यात येणार आहे. (वार्ताहर)‘ताकारी-म्हैसाळ’साठी स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभागशासनाचा अध्यादेश : बुधवारपासून कार्यवाही सुरू होणारदेवराष्ट्रे : ताकारी व म्हैसाळ योजनेच्या बांधकाम व प्रशासन विभागाकडे आतापर्यंत सिंचन व्यवस्थापन विभागाची अतिरिक्त जबाबदारी होती. यामुळे प्रशासनावर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण पडत होता. ओलिताखाली आलेल्या क्षेत्राचे योग्य सर्वेक्षण होत नव्हते. याचा फटका योजनांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास बसत होता. याबाबत व्यवस्थापनाने सिंचन व्यवस्थापन विभाग स्वतंत्र करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने सिंचन व्यवस्थापन विभाग स्वतंत्र करण्याचा अध्यादेश काढला आहे. ही कार्यवाही आजपासूनच (बुधवारी) सुरू होणार आहे, अशी माहिती ताकारी योजनेच्या अधिकाऱ्यांनी दिली.योजनांच्या लाभक्षेत्रातील ओलिताखालील क्षेत्रात वाढ होत चालली असल्याने सिंचन व्यवस्थापन विभागाची गरज भेडसावत होती. किंबहुना योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी या विभागाची योजनांना सक्त गरज निर्माण झाली होती. ताकारी योजनेचे लाभक्षेत्र २७ हजार हेक्टर आहे. त्यामुळे अपुरी कामे, नवीन कामे, पाणी सुरू-बंद करणे, मोजणी करणे, आकारणी करणे आणि वसुली यासारख्या सर्व कामांचा अतिरिक्त बोजा बांधकाम व प्रशासन विभागावर पडत होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करणे व शेतकऱ्यांना सोयी देणे कठीण बनले होते. याचा आर्थिक भुर्दंड योजनेला सहन करावा लागत होता. त्यामुळे ही योजना दिवसेंदिवस तोट्यातच चालली होती.सिंचन व्यवस्थापन विभाग स्वतंत्र व्हावा, यासाठी प्रशासनाची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. तसा याबाबत राज्य शासनाकडे प्रस्तावही सादर करण्यात आला होता. त्यानुसार राज्य शासनाने म्हैसाळ योजनेच्या विभाग क्र. १ चे ताकारी-म्हैसाळ सिंचन व्यवस्थापन विभाग असे नामांतर केले आहे. या मुख्य विभागांतर्गत ताकारी योजनेच्या दोन उपशाखा काम करणार आहेत. त्यापैकी एक शाखा वांगी (ता. कडेगाव) येथे, तर देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील दुसरी शाखा तासगाव येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. या दोन्ही शाखांना ताकारीच्या एकूण लाभक्षेत्रापैकी कमी-अधिक प्रमाणात क्षेत्राची विभागणी करून देण्यात येणार आहे. (वार्ताहर)प्रत्येक उपशाखेच्या अंतर्गत प्रत्येकी चार शाखा काम पाहणार आहेत. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना पाण्यासह ओलिताखालील क्षेत्राच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण झाला आहे. या विभागाच्या माध्यमातून योजनेचे आवर्तन सुरू करणे, शेतकऱ्यांचे मागणी अर्ज जमा करणे, मोजणी करणे, आकारणी करणे, वसुली करणे ही सर्व कामे करावयाची आहेत.