शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

दिवाळीतील पावसाने विक्रेत्यांचे दिवाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 12:26 IST

नोटाबंदी, जीएसटी यांच्या प्रतिकूल परिणामांची झळ विक्रेत्यांना बसत असतानाच, ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसानेही बाजारपेठांना झोडपल्याने दुकानदारांपासून रस्त्यांवरील छोट्या विक्रेत्यांपर्यंत सर्वांनाच दिवाळे अनुभवावे लागले. रांगोळी, मातीच्या पणत्या, पूजेचे साहित्य, किल्ल्यावरील मातीची खेळणी असे साहित्य भिजून विक्रेत्यांना घाट्याचा सौदाही पचवावा लागला.

ठळक मुद्देरांगोळी, मातीच्या पणत्या, पूजेचे साहित्य, किल्ल्यावरील मातीची खेळणी भिजलेमारुती रोड, कापड पेठ, हरभट रोड, बालाजी चौक परिसरात पाणी साचून पोती भरून साहित्य कोंडाळ्यात

सांगली , दि. १७  : नोटाबंदी, जीएसटी यांच्या प्रतिकूल परिणामांची झळ विक्रेत्यांना बसत असतानाच, ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसानेही बाजारपेठांना झोडपल्याने दुकानदारांपासून रस्त्यांवरील छोट्या विक्रेत्यांपर्यंत सर्वांनाच दिवाळे अनुभवावे लागले. रांगोळी, मातीच्या पणत्या, पूजेचे साहित्य, किल्ल्यावरील मातीची खेळणी असे साहित्य भिजून विक्रेत्यांना घाट्याचा सौदाही पचवावा लागला.

डोळ्यात अश्रू घेऊनच सध्या विक्रेते नाईलाजास्तव व्यापार करताना दिसत आहेत. बाजारातील गर्दीला कधीच आहोटी लागली होती, त्यात पुन्हा पावसाने उरलीसुरली गर्दीही धुऊन काढली. त्यामुळे विक्रीवर मोठा परिणाम झाला. तसेच मुसळधार पावसाने साहित्य भिजून मोठ्या नुकसानीचा धक्काही विक्रेत्यांना सहन करावा लागला.

बाजारात सध्या उत्साहाच्या वातावरणाची जागा निरुत्साहाने घेतल्याचे दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून दररोज सायंकाळी बाजारातील गर्दीच्या वेळेतच पाऊस हजेरी लावत आहे. शनिवारी आणि रविवारी पावसाने शहराला झोडपून काढले. सांगलीच्या मारुती रोड, कापड पेठ, हरभट रोड, बालाजी चौक परिसरात पावसाचे पाणी तब्बल तीन ते चार तास साचून होते. त्यामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली.

चिखलमय आणि जलमय झालेल्या बाजारपेठांना आता दिवाळीऐवजी दिवाळे अनुभवावे लागत आहे. गेल्या काही वर्षातील हा सर्वात वाईट अनुभव असल्याचे येथील विक्रेत्यांनी सांगितले. दिवाळीपूर्वी दोन दिवस बाजारपेठांमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नव्हती. पण यंदा मात्र बाजारपेठांमध्ये रस्ते, दुकाने आणि विके्रत्यांचे हातगाडे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.

पोती भरून साहित्य कोंडाळ्यातबाजारातील रांगोळी विक्रेत्या महिलांनी सांगितले की, रांगोळी आणि पणत्या भिजल्याने प्रत्येक विक्रेत्या महिलेचे सुमारे २ हजाराचे नुकसान झाले. केवळ मारुती रोडवरच जवळपास ४0 वर रांगोळी विक्रेते आहेत. मातीच्या पणत्याही भिजून त्यांचा लगदा तयार झाला होता. मातीची खेळणीही भिजल्याने नुकसानीत मोठी भर पडली.

नोटाबंदी, जीएसटीने अगोदरच व्यापारावर परिणाम दिसत होता. पन्नास टक्क्यांहून अधिक उलाढाल घटली होती. त्यात पावसाने तर कहरच केला आणि होत्या नव्हत्या त्या आशाही मावळल्या.- संजय मुळे,मातीच्या खेळण्यांचे विक्रेते, सांगलीपावसाने पोतेभर रांगोळी भिजली. पणत्याही भिजून मोठे नुकसान झाले. अगोदरच व्यापार कमी होता, त्यात आता निसर्गानेही आम्हाला सोडले नाही. पदरात नुकसानीशिवाय काहीही आले नाही. डोळ्याआड पाणी लपवून ग्राहकांसमोर हसत व्यवसाय करण्याशिवाय आमच्यासमोर काहीही उरलेले नाही.- रेखा वेदू,रांगोळी विक्रेत्या

 

टॅग्स :Divaliदिवाळीrangoliरांगोळी