शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

दिवाळीतील पावसाने विक्रेत्यांचे दिवाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 12:26 IST

नोटाबंदी, जीएसटी यांच्या प्रतिकूल परिणामांची झळ विक्रेत्यांना बसत असतानाच, ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसानेही बाजारपेठांना झोडपल्याने दुकानदारांपासून रस्त्यांवरील छोट्या विक्रेत्यांपर्यंत सर्वांनाच दिवाळे अनुभवावे लागले. रांगोळी, मातीच्या पणत्या, पूजेचे साहित्य, किल्ल्यावरील मातीची खेळणी असे साहित्य भिजून विक्रेत्यांना घाट्याचा सौदाही पचवावा लागला.

ठळक मुद्देरांगोळी, मातीच्या पणत्या, पूजेचे साहित्य, किल्ल्यावरील मातीची खेळणी भिजलेमारुती रोड, कापड पेठ, हरभट रोड, बालाजी चौक परिसरात पाणी साचून पोती भरून साहित्य कोंडाळ्यात

सांगली , दि. १७  : नोटाबंदी, जीएसटी यांच्या प्रतिकूल परिणामांची झळ विक्रेत्यांना बसत असतानाच, ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसानेही बाजारपेठांना झोडपल्याने दुकानदारांपासून रस्त्यांवरील छोट्या विक्रेत्यांपर्यंत सर्वांनाच दिवाळे अनुभवावे लागले. रांगोळी, मातीच्या पणत्या, पूजेचे साहित्य, किल्ल्यावरील मातीची खेळणी असे साहित्य भिजून विक्रेत्यांना घाट्याचा सौदाही पचवावा लागला.

डोळ्यात अश्रू घेऊनच सध्या विक्रेते नाईलाजास्तव व्यापार करताना दिसत आहेत. बाजारातील गर्दीला कधीच आहोटी लागली होती, त्यात पुन्हा पावसाने उरलीसुरली गर्दीही धुऊन काढली. त्यामुळे विक्रीवर मोठा परिणाम झाला. तसेच मुसळधार पावसाने साहित्य भिजून मोठ्या नुकसानीचा धक्काही विक्रेत्यांना सहन करावा लागला.

बाजारात सध्या उत्साहाच्या वातावरणाची जागा निरुत्साहाने घेतल्याचे दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून दररोज सायंकाळी बाजारातील गर्दीच्या वेळेतच पाऊस हजेरी लावत आहे. शनिवारी आणि रविवारी पावसाने शहराला झोडपून काढले. सांगलीच्या मारुती रोड, कापड पेठ, हरभट रोड, बालाजी चौक परिसरात पावसाचे पाणी तब्बल तीन ते चार तास साचून होते. त्यामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली.

चिखलमय आणि जलमय झालेल्या बाजारपेठांना आता दिवाळीऐवजी दिवाळे अनुभवावे लागत आहे. गेल्या काही वर्षातील हा सर्वात वाईट अनुभव असल्याचे येथील विक्रेत्यांनी सांगितले. दिवाळीपूर्वी दोन दिवस बाजारपेठांमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नव्हती. पण यंदा मात्र बाजारपेठांमध्ये रस्ते, दुकाने आणि विके्रत्यांचे हातगाडे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.

पोती भरून साहित्य कोंडाळ्यातबाजारातील रांगोळी विक्रेत्या महिलांनी सांगितले की, रांगोळी आणि पणत्या भिजल्याने प्रत्येक विक्रेत्या महिलेचे सुमारे २ हजाराचे नुकसान झाले. केवळ मारुती रोडवरच जवळपास ४0 वर रांगोळी विक्रेते आहेत. मातीच्या पणत्याही भिजून त्यांचा लगदा तयार झाला होता. मातीची खेळणीही भिजल्याने नुकसानीत मोठी भर पडली.

नोटाबंदी, जीएसटीने अगोदरच व्यापारावर परिणाम दिसत होता. पन्नास टक्क्यांहून अधिक उलाढाल घटली होती. त्यात पावसाने तर कहरच केला आणि होत्या नव्हत्या त्या आशाही मावळल्या.- संजय मुळे,मातीच्या खेळण्यांचे विक्रेते, सांगलीपावसाने पोतेभर रांगोळी भिजली. पणत्याही भिजून मोठे नुकसान झाले. अगोदरच व्यापार कमी होता, त्यात आता निसर्गानेही आम्हाला सोडले नाही. पदरात नुकसानीशिवाय काहीही आले नाही. डोळ्याआड पाणी लपवून ग्राहकांसमोर हसत व्यवसाय करण्याशिवाय आमच्यासमोर काहीही उरलेले नाही.- रेखा वेदू,रांगोळी विक्रेत्या

 

टॅग्स :Divaliदिवाळीrangoliरांगोळी