शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

दारू व तंबाखूमुक्त सांगलीचे स्वप्न पाहा...

By admin | Updated: February 28, 2017 23:45 IST

अभय बंग : जनसेवा पुरस्काराने सन्मान,

साखर कारखान्यातून निर्माण दारूचा महापूर रोखण्याची गरजसांगली : सांगली, कोल्हापूर, नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यातील दारूच्या महापुरामुळे मराठवाडा, विदर्भातील लाखो कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. सांगलीकडून येणारा हा दारूचा महापूर येथील नागरिकांनी थांबवावा. तसेच दारू व तंबाखूमुक्त सांगलीचे स्वप्न पाहा, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ‘शोधग्राम’चे संस्थापक डॉ. अभय बंग यांनी मंगळवारी केले. श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा ‘नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार’ अभय बंग यांना रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. बंग बोलत होते.ते म्हणाले की, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यात दारूबंदीची चळवळ हाती घेतली आहे. २००८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात गडचिरोलीत ५० टक्के लोक तंबाखूच्या आहारी गेले होते. गेल्यावर्षीच्या सर्व्हेत ५२ कोटींची दारू व दीडशे कोटींची तंबाखू खात असल्याचे आढळून आले. दारू व तंबाखू या दोन व्यसनांकडे दुर्लक्ष करण्यासारखी स्थिती राहिलेली नाही. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली असली तरी, त्याला राजकीय नेत्यांनीच विरोध केला होता. वास्तविक दारूची निर्मितीच थांबली तर, अनेक कुटुंबांची पडझड थांबू शकते. सांगली, कोल्हापूर, नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यातून दारूची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. हीच दारू मराठवाडा, विदर्भात विक्रीसाठी येते. त्यामुळे लाखो कुटुंबे उद््ध्वस्त होत आहेत. केवळ मराठवाडा, विदर्भच नव्हे, तर सांगली, कोल्हापूर जिल्हाही दारूमध्ये बुडाला आहे. त्यामुळे या परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी साखर कारखान्यांतून निर्माण होणारा दारूचा महापूर रोखला पाहिजे. सुरेश पाटील म्हणाले, २५ वर्षांपासून जनसेवा व विशेष सेवा पुरस्कार देण्यात येतात. गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी चळवळ, स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नावरील संशोधन, नवजात बालकांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास व उपाययोजना यासारखे सामाजिक कार्य त्यांनी केले आहे. यावेळी रुग्णांना मदत करणाऱ्या दानोळी (ता. शिरोळ) येथील सुकुमार पाटील यांना विशेष सेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. प्रारंभी राजमती पाटील गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गायिले. ट्रस्टचे जे. बी. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी डॉ. अनिल पाटील, सुकुमार पाटील यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास सुहास पाटील, अशोक पाटील, महावीर आडमुठे, शीतल पाटील, कमल दोडण्णावर, त्रिशला खोत, वर्धमान वीरगौडर, मोहन चौगुले, अशोक सकळे, शांतिनाथ कांते, राजगोंडा पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)