शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सुरक्षा रामभरोसे, हजार लोकांमागे केवळ एकच पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST

सांगली : गुन्ह्यांच्या प्रमाणात राज्यात आघाडीवर असलेल्या सांगली जिल्ह्यात सध्या पोलिसांची संख्या अत्यंत कमी आहे. हजार लोकसंख्येमागे केवळ एकच ...

सांगली : गुन्ह्यांच्या प्रमाणात राज्यात आघाडीवर असलेल्या सांगली जिल्ह्यात सध्या पोलिसांची संख्या अत्यंत कमी आहे. हजार लोकसंख्येमागे केवळ एकच पोलीस असल्याने जिल्हा सध्या सुरक्षेच्याबाबतीत रामभरोसे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलीस भरतीची गरज आहे.

राज्यातील २०१९ च्या एकूण आयपीसी गुन्ह्यांचा विचार केला, तर सांगली जिल्हा राज्यात १३ व्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी गुन्ह्यांचा तपास करणे, संचलन, नाकाबंदी व अन्य कामांसाठी पोलिसांचे बळ कमी पडत आहे. गुन्ह्यांचा तपास करण्यामध्ये सांगली जिल्ह्याची आकडेवारी चांगली असली, तरी गुन्हे नियंत्रणात आणताना पोलिसांची दमछाक होत आहे. जिल्ह्यात विविध प्रकारच्या तपास शाखा व पोलीस ठाणी असली, तरी त्यामधील संख्याबळ हे सध्या पुरेसे नाही. सध्या रिक्तपदे २०० च्या आसपास आहेत. पहिल्या टप्प्यात १२० पोलिसांची भरती होणे अपेक्षित असून, उर्वरित भरती दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. त्यामुळे पोलिसांना दिलासा मिळणार असला, तरी तोही फार पुरेसा ठरेल, अशी स्थिती नाही.

चाैकट

जिल्ह्याची लोकसंख्या २८,२२,१४३

एकूण पोलीस २,६००

चौकट

पोलिसांवर पडतोय अतिरिक्त ताण

जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या दहा पोलिसांशी केलेल्या चर्चेनुसार आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांवर अधिक ताण पडतो. त्यावेळी डबल ड्युटी करावी लागते. सुट्या, रजा मिळविण्यासाठी पूर्वीसारखी ओढाताण होत नसली, तरी कोरोना, महापूर व अन्य संकटावेळी पोलिसांच्या सुट्या, रजा रद्द होतात. मंत्र्यांचे दौरे व अन्य महत्त्वाच्या कार्यक्रमांवेळीही पोलिसांना १० ते १२ तास काम करावे लागते.

चौकट

संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमाणानुसार निम्मेच पोलीस

संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या प्रमाणानुसार लाखामागे २२२ पोलिसांची आवश्यकता असते. भारत या प्रमाणाच्याबाबतीत जगातील ७१ देशात शेवटून पाचवा आहे. सांगली जिल्ह्याच्या लोकसंख्येचा विचार केला, तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमाणानुसार याठिकाणी ६ हजार २०० च्या आसपास पोलिसांची गरज आहे. सध्याची संख्या ही निम्म्याहून कमी आहे.

कोट

पोलिसांच्या सध्या दोनशे जागा रिक्त आहेत. जादा बळ मिळाले, तर आणखी चांगले काम करता येऊ शकते. सध्या असलेला ताणही कमी होईल. त्यामुळे नव्या भरतीनंतर निश्चितपणे चांगला फरक दिसून येईल.

- दीक्षित गेडाम, जिल्हा पोलीसप्रमुख, सांगली