शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

जिल्ह्यातील सुरक्षा रामभरोसे, हजार लोकांमागे केवळ एकच पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST

सांगली : गुन्ह्यांच्या प्रमाणात राज्यात आघाडीवर असलेल्या सांगली जिल्ह्यात सध्या पोलिसांची संख्या अत्यंत कमी आहे. हजार लोकसंख्येमागे केवळ एकच ...

सांगली : गुन्ह्यांच्या प्रमाणात राज्यात आघाडीवर असलेल्या सांगली जिल्ह्यात सध्या पोलिसांची संख्या अत्यंत कमी आहे. हजार लोकसंख्येमागे केवळ एकच पोलीस असल्याने जिल्हा सध्या सुरक्षेच्याबाबतीत रामभरोसे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलीस भरतीची गरज आहे.

राज्यातील २०१९ च्या एकूण आयपीसी गुन्ह्यांचा विचार केला, तर सांगली जिल्हा राज्यात १३ व्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी गुन्ह्यांचा तपास करणे, संचलन, नाकाबंदी व अन्य कामांसाठी पोलिसांचे बळ कमी पडत आहे. गुन्ह्यांचा तपास करण्यामध्ये सांगली जिल्ह्याची आकडेवारी चांगली असली, तरी गुन्हे नियंत्रणात आणताना पोलिसांची दमछाक होत आहे. जिल्ह्यात विविध प्रकारच्या तपास शाखा व पोलीस ठाणी असली, तरी त्यामधील संख्याबळ हे सध्या पुरेसे नाही. सध्या रिक्तपदे २०० च्या आसपास आहेत. पहिल्या टप्प्यात १२० पोलिसांची भरती होणे अपेक्षित असून, उर्वरित भरती दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. त्यामुळे पोलिसांना दिलासा मिळणार असला, तरी तोही फार पुरेसा ठरेल, अशी स्थिती नाही.

चाैकट

जिल्ह्याची लोकसंख्या २८,२२,१४३

एकूण पोलीस २,६००

चौकट

पोलिसांवर पडतोय अतिरिक्त ताण

जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या दहा पोलिसांशी केलेल्या चर्चेनुसार आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांवर अधिक ताण पडतो. त्यावेळी डबल ड्युटी करावी लागते. सुट्या, रजा मिळविण्यासाठी पूर्वीसारखी ओढाताण होत नसली, तरी कोरोना, महापूर व अन्य संकटावेळी पोलिसांच्या सुट्या, रजा रद्द होतात. मंत्र्यांचे दौरे व अन्य महत्त्वाच्या कार्यक्रमांवेळीही पोलिसांना १० ते १२ तास काम करावे लागते.

चौकट

संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमाणानुसार निम्मेच पोलीस

संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या प्रमाणानुसार लाखामागे २२२ पोलिसांची आवश्यकता असते. भारत या प्रमाणाच्याबाबतीत जगातील ७१ देशात शेवटून पाचवा आहे. सांगली जिल्ह्याच्या लोकसंख्येचा विचार केला, तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमाणानुसार याठिकाणी ६ हजार २०० च्या आसपास पोलिसांची गरज आहे. सध्याची संख्या ही निम्म्याहून कमी आहे.

कोट

पोलिसांच्या सध्या दोनशे जागा रिक्त आहेत. जादा बळ मिळाले, तर आणखी चांगले काम करता येऊ शकते. सध्या असलेला ताणही कमी होईल. त्यामुळे नव्या भरतीनंतर निश्चितपणे चांगला फरक दिसून येईल.

- दीक्षित गेडाम, जिल्हा पोलीसप्रमुख, सांगली