शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
4
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
5
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
6
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
7
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
8
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
9
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
10
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
11
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
12
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
13
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
14
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
15
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
16
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
17
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
18
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
19
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
20
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान

देशाच्या अखंडतेसाठी धर्मनिरपेक्षता आवश्यकच

By admin | Updated: June 5, 2016 00:54 IST

अब्दुल कादर मुकादम : सांगलीत सेक्युलर मुव्हमेंटच्या राज्यस्तरीय अधिवेशनास सुरुवात

सांगली : भारत-पाकिस्तानच्या निर्मितीवेळी पाकिस्तानने धर्माधिष्ठित विचारप्रणालीचा स्वीकार केला, तर भारताने धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व अंगिकारले. कारण हिंदू राष्ट्रापेक्षा देशात धर्मनिरपेक्षता असणे गरजेचे आहे. आता काहींकडून असा प्रयत्न चालवला जात असून, देश संपून जाण्याची भीती नाकारता येत नाही. देशाच्या अखंडतेसाठी धर्मनिरपेक्षता तत्त्व आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अब्दुल कादर मुकादम यांनी शनिवारी केले. येथील शांतिनिकेतन परिसरात शनिवारपासून ‘सेक्युलर मुव्हमेंट’च्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनास प्रारंभ झाला. अधिवेशनाच्या उद्घाटनावेळी मुकादम बोलत होते. यावेळी सेक्युलर मुव्हमेंटचे मुख्य संघटक प्रा. गौतमीपुत्र कांबळे, स्वागताध्यक्ष प्रा. मिलिंद वडमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुकादम म्हणाले की, देशातील सध्याचे प्रवाह सर्वच घटकांना विचार करायला लावणारे आहेत. सध्या काहीजणांकडून भारताला हिंदूराष्ट्र करण्याबाबत चर्चा करण्यात येत असली, तरी देशाच्या अखंडतेसाठी हा विचार घातक आहे. कारण या देशातील विविध जाती-धर्मांचा समाज लक्षात घेता धर्मनिरपेक्षता असणे गरजेचे आहे. अखंड भारतातून भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची निर्मिती झाली, त्यावेळी पाकिस्तानची मुस्लिम राष्ट्र म्हणून निर्मिती झाल्यानंतरच हिंदू राष्ट्र म्हणून निर्मिती होऊ शकली असती, पण ते झाले नाही. कारण हा देश धर्मनिरपेक्ष असणेच आवश्यक आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र म्हणून निर्मितीचा प्रयत्न झाला तर देशच संपून जाण्याची भीती आहे. मुकादम म्हणाले की, संघाला आंबेडकर हवे आहेत, मात्र याच आंबेडकरांनी तयार केलेली घटना त्यांना नको आहे. फक्त स्वत:च्या स्वार्थासाठीच त्यांच्या नावाचा वापर करण्यात येत आहे. देशात समान नागरी कायदा यायला पाहिजे ही आमचीही मागणी आहे. पण कोणत्याही राजकीय पक्षाला समान नागरी कायदा नको आहे. हा कायदा झाला, तर एकप्रकारे धर्मनिरपेक्ष तत्त्वाच्या मुद्द्याला बळच मिळणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे म्हणाले की, उजव्या आणि डाव्या या दोन्ही विचारसरणीचे विचार देशाला घातकच आहेत. उजव्या विचारसरणीचा स्वीकार करणाऱ्यांना घटना मान्य नाही, तर डाव्यांमध्येही जातीयवाद आहे. इतरवेळी पुढे असणारे डावे मनुस्मृती दहनावेळी मागे का असतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी स्वागताध्यक्ष प्रा. मिलिंद वडमारे, सुरेश कुडाळे, आगरी कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील, गणेश पवार, संग्राम सावंत, तुका कोचे, मुव्हमेंटच्या राज्य संघटक अवंतिका कवाळे, महेंद्र कांबळे, दिलीप सासणे, कैलास काळे, सिध्दार्थ कांबळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)