शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या परवानगीनंतरही माध्यमिक शाळा कुलूपबंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:33 IST

सांगली : आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली तरी जिल्ह्यात मंगळवारी शाळा सुरू झाल्या नाहीत. प्रशासन ...

सांगली : आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली तरी जिल्ह्यात मंगळवारी शाळा सुरू झाल्या नाहीत. प्रशासन व शाळा व्यवस्थापनाने कोरोनाचा अंदाज घेऊनच वर्ग भरवण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्या गावात कोरोनाबाधित नसतील, तेथे वर्ग सुरू करता येतील, असे शासनाने आदेशात म्हटले आहे तशी स्थिती जिल्ह्यात कुठेच नाही. महापालिका क्षेत्रासह सर्व नगरपरिषदांच्या क्षेत्रात रुग्णसंख्या जास्त आहे. विटा, इस्लामपूर, कवठेमहांकाळ, जत, तासगाव, पलसू, मिरज, सांगली आदी सर्वच शहरांत कोरोनाबाधितांची संख्या कायम आहे. त्यामुळे तेथे वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव आपोआपच निकाली निघाला आहे. ग्रामीण भागातील मोठ्या गावांतही सरासरी पन्नासपर्यंत सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे तेथील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये मंगळवारी बंदच राहिली. हजार-दोन हजार लोकवस्तीच्या छोट्या गावांत रुग्णसंख्या कमी आहे, मात्र, तेथे दहावी-बारावीचे वर्ग नाहीत. त्यामुळे जिल्हाभरात शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत.

वर्ग सुरू करण्यासंदर्भातील निर्णय कोरोना दक्षता समित्यांनी घ्यायचा आहे तसा ठराव करायचा आहे. तथापि, जिल्ह्यात कुठेच १०० टक्के सुरक्षित स्थिती नाही. संसर्ग थांबला असला तरी सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आलेली नाही, त्यामुळे शासनाची परवानगी निरर्थक ठरली. येत्या तीन-चार दिवसांत टप्प्या-टप्प्यांने काही गावांत शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.

कोट

कोरोनास्थितीचा अंदाज घेऊन वर्ग सुरू करायचे आहेत. ग्रामदक्षता समित्यांनीही निर्णय घ्यायचा आहे. मंगळवारी सर्वत्र शाळा सुरू झाल्याचा अहवाल संध्याकाळपर्यंत मिळालेला नव्हता. शहरी भागातही शाळा बंद राहिल्या.

- विष्णू कांबळे, शिक्षणाधिकारी, सांगली