शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

ऊसक्षेत्र घटल्याने तोडणी मजुरांना यंदाचा हंगाम कडवटच!

By admin | Updated: December 25, 2016 23:50 IST

मजुरांच्या पालीतील व्यथा : ऊस उत्पादन घटल्याने ६0 टक्के उत्पन्न बुडाले; तीन महिन्यात गावी परतावे लागणार

अविनाश कोळी ल्ल सांगलीकारखान्यांच्या धुराड्यांना यंदा घटलेल्या ऊसक्षेत्रानं लवकरच थंड करण्याचे गणित आखले असतानाच, हंगामाचा हा कडवटपणा आता ऊसतोडणी मजुरांच्या आयुष्यालाही चिकटला आहे. ६० टक्के उत्पन्नावर पाणी सोडून दरवर्षी सहा महिने मुक्कामाला येणाऱ्या मजुरांना आता तीन महिन्यांतच परतावे लागणार आहे.सांगलीत वसंतदादा कारखान्याच्या पिछाडीस जवळपास पावणेतीनशे कुटुंबांनी पाली उभारल्या आहेत. उसाचे क्षेत्र घटल्याने मजुरांचे कामही कमी झाले आहे. पाच ते सहा महिन्यांत ज्यांच्या हाती लाख, सव्वालाख लागायचे, त्यांच्या हाती आता पन्नास हजार रुपये पडणेही मुश्किल झाले आहे. हंगामही लवकरच संपण्याची चिन्हे असल्याने यंदा जानेवारीच्या अखेरीस पाली उठून तांडे चालायला लागतील, अशी स्थिती आहे. मजुरांच्या पालींमध्ये यावर्षी घटलेल्या उत्पन्नामुळे चिंतेचा धूर पसरला आहे. हंगाम चांगला झाला नसल्याने वर्षभराचे त्यांचे अर्थचक्रही विस्कळीत होणार आहे. अनेक मजुरांनी गावाकडे पतसंस्था, बॅँका आणि सावकारांकडून कर्ज काढलेले असते. कर्जाची परतफेडही या हंगामावरच बरीचशी अवलंबून असल्याने त्यांना आता चिंता वाटू लागली आहे. दुष्काळी गावातून आलेल्या या मजुरांना नेहमीच उसाचा हंगाम साथ देत असतो. यावेळी हंगामाने फार कमी साथ दिली. हंगाम उशिरा चालू होऊन लवकर संपणार आहे. तोडणी कमी झाल्याने वैरण घटली आणि वैरण घटल्याने रोजचे चलनही थांबले आहे. आर्थिक दुष्टचक्रात अडकलेला, हजारो मजुरांना चांगला वाटणारा हंगाम त्रासदायक वाटू लागला आहे. यापूर्वी दराच्या आंदोलनाचा भडका झाल्यानंतरही मजुरांना काही वाटले नव्हते. दराचा तोडगा निघाल्यानंतर तरी परिस्थिती पूर्वपदावर येत होती. आता उत्पादनच नसल्याने परिस्थिती सुधारण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. धुराडे बंद पडताना चिंतेची काजळी आता त्यांच्या पालींवर पडणार आहे. जीवनाचं चक्र...एकवेळच्या स्वयंपाकात तीनवेळचा पोटोबा करून भल्या पहाटे फडात कष्टाचे गाणे गाणाऱ्या बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी मजुरांच्या सांगलीतील पाचमाही मुक्कामातच त्यांच्या वर्षभराच्या जगण्याचे अर्थकारण दडले आहे. त्यांच्या जीवनाची चाकं साखरपट्ट्याशी बांधली गेली असली, तरी सव्वातीनशे किलोमीटरमधील त्यांची जगण्याची कसरत पिढ्यान् पिढ्या तशीच आहे.