शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऊसक्षेत्र घटल्याने तोडणी मजुरांना यंदाचा हंगाम कडवटच!

By admin | Updated: December 25, 2016 23:50 IST

मजुरांच्या पालीतील व्यथा : ऊस उत्पादन घटल्याने ६0 टक्के उत्पन्न बुडाले; तीन महिन्यात गावी परतावे लागणार

अविनाश कोळी ल्ल सांगलीकारखान्यांच्या धुराड्यांना यंदा घटलेल्या ऊसक्षेत्रानं लवकरच थंड करण्याचे गणित आखले असतानाच, हंगामाचा हा कडवटपणा आता ऊसतोडणी मजुरांच्या आयुष्यालाही चिकटला आहे. ६० टक्के उत्पन्नावर पाणी सोडून दरवर्षी सहा महिने मुक्कामाला येणाऱ्या मजुरांना आता तीन महिन्यांतच परतावे लागणार आहे.सांगलीत वसंतदादा कारखान्याच्या पिछाडीस जवळपास पावणेतीनशे कुटुंबांनी पाली उभारल्या आहेत. उसाचे क्षेत्र घटल्याने मजुरांचे कामही कमी झाले आहे. पाच ते सहा महिन्यांत ज्यांच्या हाती लाख, सव्वालाख लागायचे, त्यांच्या हाती आता पन्नास हजार रुपये पडणेही मुश्किल झाले आहे. हंगामही लवकरच संपण्याची चिन्हे असल्याने यंदा जानेवारीच्या अखेरीस पाली उठून तांडे चालायला लागतील, अशी स्थिती आहे. मजुरांच्या पालींमध्ये यावर्षी घटलेल्या उत्पन्नामुळे चिंतेचा धूर पसरला आहे. हंगाम चांगला झाला नसल्याने वर्षभराचे त्यांचे अर्थचक्रही विस्कळीत होणार आहे. अनेक मजुरांनी गावाकडे पतसंस्था, बॅँका आणि सावकारांकडून कर्ज काढलेले असते. कर्जाची परतफेडही या हंगामावरच बरीचशी अवलंबून असल्याने त्यांना आता चिंता वाटू लागली आहे. दुष्काळी गावातून आलेल्या या मजुरांना नेहमीच उसाचा हंगाम साथ देत असतो. यावेळी हंगामाने फार कमी साथ दिली. हंगाम उशिरा चालू होऊन लवकर संपणार आहे. तोडणी कमी झाल्याने वैरण घटली आणि वैरण घटल्याने रोजचे चलनही थांबले आहे. आर्थिक दुष्टचक्रात अडकलेला, हजारो मजुरांना चांगला वाटणारा हंगाम त्रासदायक वाटू लागला आहे. यापूर्वी दराच्या आंदोलनाचा भडका झाल्यानंतरही मजुरांना काही वाटले नव्हते. दराचा तोडगा निघाल्यानंतर तरी परिस्थिती पूर्वपदावर येत होती. आता उत्पादनच नसल्याने परिस्थिती सुधारण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. धुराडे बंद पडताना चिंतेची काजळी आता त्यांच्या पालींवर पडणार आहे. जीवनाचं चक्र...एकवेळच्या स्वयंपाकात तीनवेळचा पोटोबा करून भल्या पहाटे फडात कष्टाचे गाणे गाणाऱ्या बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी मजुरांच्या सांगलीतील पाचमाही मुक्कामातच त्यांच्या वर्षभराच्या जगण्याचे अर्थकारण दडले आहे. त्यांच्या जीवनाची चाकं साखरपट्ट्याशी बांधली गेली असली, तरी सव्वातीनशे किलोमीटरमधील त्यांची जगण्याची कसरत पिढ्यान् पिढ्या तशीच आहे.