कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे जमिनीच्या वादातून दोघा सख्ख्या भावांवर खुनीहल्ला केलेले मारेकरी फरारी असून, त्यांना कधी अटक होणार, अशी विचारणा होत आहे. दरम्यान, कासेगाव पोलीस त्या संशयितांना पकडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कासेगाव येथे जमिनीच्या वादातून दोन दिवसांपूर्वी अभिजित आप्पासाहेब माळी (वय ४४), रणजित आप्पासाहेब माळी (३०) यांना हणमंत बंडगर, महेश तानाजी रासकर व दत्ता आडके यांनी धारधार हत्यारे, लोखंडी रॉड, काठीने जबर मारहाण केली होती. त्यानंतर या संशियतांनी तेथून पलायन केले होते. या तिघांवर कासेगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. जखमी माळी बंधूंवर कऱ्हाड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खुनीहल्ला प्रकरणातील संशयितांचा शाेध सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:10 IST