शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

जिल्हा परिषदेच्या दोन मतदार संघांना कात्री

By admin | Updated: August 24, 2016 00:31 IST

मतदारसंघ निश्चित : वाळवा, मिरज तालुक्यांना दिलासा; सर्वात कमी सदस्यसंख्या खानापूर तालुक्यात

सांगली : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांची मतदारसंघ संख्या निश्चित केली आहे. नवीन रचनेनुसार जिल्हा परिषदेचे ६२ ऐवजी ६० गट आणि पंचायत समित्यांचे १२४ ऐवजी १२० गण झाले आहेत. वाळवा, मिरज तालुक्यांमध्ये एक गट आणि दोन गणांची संख्या वाढली आहे. कवठेमहांकाळ, शिराळा, खानापूर, पलूस येथे नगरपरिषद, नगरपंचायती झाल्यामुळे धक्का बसला असून, प्रत्येकी एक गट आणि दोन गण कमी झाले आहेत. सर्वात कमी सदस्यसंख्या खानापूर तालुक्यात राहील.निवडणूक आयोगाने मतदारसंघ निश्चित करण्यासाठी २०११ च्या लोकसंख्येचा विचार केला आहे. लोकसंख्येनुसार काही तालुक्यात मतदारसंघांची संख्या वाढली, तर काही तालुक्यात कमी झाली आहे. जिल्ह्यात कडेगाव, पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ आणि खानापूर येथे नव्याने नगरपरिषद, नगरपंचायती झाल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषद गट आणि दहा पंचायत समित्यांमध्ये मतदारसंघांची संख्या नव्याने निश्चित केली आहे. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे मतदारसंघच गायब झाले आहेत. खानापूर तालुक्यामध्ये पूर्वी जिल्हा परिषदेची चार आणि पंचायत समितीची आठ सदस्यसंख्या होती. नवीन रचनेमध्ये खानापूर जिल्हा परिषद गटासह दोन पंचायत समित्यांचे गण रद्द झाले आहेत. खानापूर गाव वगळून अन्य गावे जवळच्या मतदारसंघात समाविष्ट होणार आहेत. खानापूर तालुक्यात जि. प. गट तीन आणि पंचायत समित्यांचे गण सहा राहणार आहेत. सर्वात कमी सदस्यसंख्या असणारा हा तालुका आहे. पलूस तालुक्यामधील पलूस जिल्हा परिषद गटासह चार पंचायत समितीचे गण कमी झाले असून येथे आता चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गण असतील. कवठेमहांकाळ, शिराळा तालुक्यातीलही प्रत्येकी जिल्हा परिषदेचा एक गट आणि दोन पंचायत समिती गणांची संख्या कमी झाली आहे.मिरज आणि वाळवा तालुक्यांची लोकसंख्या जास्त असल्यामुळे येथे जिल्हा परिषद एक गट आणि दोन गणांची संख्या वाढली आहे. यामुळे येथील इच्छुकांना जादा मतदारसंघांची संधी उपलब्ध होणार आहे. कडेगाव, जत, आटपाडी, तासगाव तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची संख्या पूर्वीप्रमाणेच जैसे थे राहणार आहे. नविन मतदारसंघ संख्या निश्चितीमध्ये अनेकांचे गट आणि गण रद्द झाल्यामुळे त्यांची पंचायत झाली आहे. (प्रतिनिधी)आरक्षणाचा बदल खानापूर, कडेगाव, तासगाव या पंचायत समित्यांमध्ये मागील निवडणुकीप्रमाणे यावेळी अनुसूचित जाती या प्रवर्गाकरिता प्रत्येकी एक जागा आरक्षित होत आहे. मागील निवडणुकीत या जागा अनुसूचित जाती (महिला) या प्रवर्गासाठी आरक्षित होत्या. त्यामुळे आता या जागा अनुसूचित जाती (महिला) या प्रवर्गासाठी आरक्षित होणार आहेत.आटपाडी, कवठेमहांकाळ, पलूस, शिराळा येथील चार पंचायत समित्यांमध्ये मागील निवडणुकीप्रमाणे यावेळीही अनुसूचित जाती या प्रवर्गाकरिता प्रत्येकी एक जागा आरक्षित होत असून, मागील निवडणुकीमध्ये ही जागा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षित होती. त्यामुळे आता ही जागा अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होणार आहे.आरक्षित सदस्यजिल्हा परिषदेची एकूण सदस्यसंख्या ६० असून त्यापैकी ३० मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित आहेत. सर्वसाधारण गटासाठी ३७ सदस्य असून यापैकी महिलांसाठी १८ मतदारसंघ आरक्षित राहणार आहेत. अनुसूचित जातीसाठी सात मतदारसंघ आरक्षित असणार असून चार महिलांसाठी, तर मागास प्रवर्गसाठी १६ मतदार संघ आरक्षित असून आठ महिलांसाठी आरक्षित आहेत.