शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

शाळा बंद असल्याने विद्यार्थी वळले मजुरीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST

जत : आधीच दुष्काळी तालुका, त्यात कोरोना महामारीमुळे शाळा बंद. ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्ट फोन नाही. यासाठी शालेय विद्यार्थी आता ...

जत : आधीच दुष्काळी तालुका, त्यात कोरोना महामारीमुळे शाळा बंद. ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्ट फोन नाही. यासाठी शालेय विद्यार्थी आता घरातील आई-वडिलांच्या मदतीसाठी कामाला जात असल्याचे चित्र जत तालुक्यात दिसत आहे. यामुळे जत तालुक्यात बालमजुरीचे प्रमाण वाढले आहे.

शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी लागू केल्याने महामारीपासून तालुक्यासह परिसरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. पण महामारीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ही सुट्टी तब्बल दोन वर्षावर गेली. सतत शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद झाले व पालकांच्या हाताला काम नसल्याने शालेय विद्यार्थी आता मजुरीकडे वळले आहेत.

जत तालुक्यात जवळ-जवळ ३५० च्यावर प्राथमिक शाळा आहेत. तर ५ किलोमीटर अंतराने माध्यमिक शाळा उपलब्ध झाल्या आहेत. या शाळेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करीत असतात. परंतु, गतवर्षीपासून काही दिवसांचा अपवाद वगळता शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर आज शिक्षणापासून दूर जाण्याची वेळ आली आहे. एक वर्षापासून शाळेचे कुलूप उघडले नाही. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांना आपल्या आई-वडिलांना कामात मदत करण्यासाठी कामावर जावे लागत आहे. बाल मजुरांची संख्या वाढली आहे.

शिक्षण घेण्याच्या वयात काम करावे लागत असल्याने या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्यासह परिसरातील अनेक शाळेतून शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या कुटुंबातील आहेत. ज्याचे पालक ऊसतोडणी मजूर, विटकामगार, कामगार, शेतगडी, हमाल तर काही मजूर वर्ग असल्याने यांची बालके आपल्या मुलाला शिक्षण द्यावे, या उद्देशाने शाळेमध्ये प्रवेश करीत असतात. परंतु कोरोनामुळे गतवर्षीपासून शाळा बंद असल्याने सर्व विद्यार्थी घरीच आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी आई- वडिलांच्या कामात मदत करीत असल्याचे दिसून येत आहे. तर काही विद्यार्थी खेळाकडे वळले असल्याचे दिसून येत आहे. तर ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते विद्यार्थी इंटरनेट खेळाकडे वळली आहेत.