शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

टंचाईची झळ अन् पडळकरांची कळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:53 IST

दत्ता पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क तासगाव : आगामी निवडणुकीच्या तोंडावर सावळज पूर्व भागातील पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. पंधरा ...

दत्ता पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : आगामी निवडणुकीच्या तोंडावर सावळज पूर्व भागातील पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. पंधरा वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या राष्टÑवादीच्या कारभाºयांनी गुरुवारी पाण्यासाठी लाक्षणिक उपोषण केले.तासगाव तालुक्यातील भाजप आणि राष्टÑवादीसाठी हा अनुभव नवखा नाही. मात्र टंचाईची झळ लागत असतानाचा भाजपशी फारकत घेतलेले आटपाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पहिल्यांदाच सावळजमध्ये येऊन खासदारांची काढलेली कळ मात्र चर्चेचा विषय ठरली आहे.तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात पाण्याचा प्रश्न सातत्याने चर्चेत असतो. दुष्काळाचे खापर फोडण्यापासून ते झालेल्या कामाचे श्रेय घेण्यापर्यंत सर्वच मुद्द्यांवर राजकारण फिरलेले असते. पाच वर्षांपूर्वी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विसापूर, पुणदी योजनेच्या माध्यमातून काही गावांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे आकस्मिक निधन आणि राज्यासह देशातील सत्तांतर यामुळे राजकीय समीकरणे बदलली. त्यानंतर खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे तालुक्यातील जनतेच्या नजरा लागल्या.सावळजसह परिसरातील गावांतील शेतकºयांकडून सातत्याने टेंभू योजनेत समावेशाची मागणी केली जात होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतदेखील सर्वच नेत्यांनी पाणीप्रश्न अस्मितेचा विषय केला होता. मात्र या भागात अद्याप पाणी आले नाही. किंबहुना काही गावांचा समावेश झाला, तर काही गावांचा समावेश झाला नाही. निवडणुकीच्या काळात आश्वासन देणाºया नेत्यांना प्रत्यक्षात पाणीप्रश्न मार्गी लावण्यात अपयश आले.आता लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच, गुरुवारी राष्टÑवादीच्या कारभाºयांनी लाक्षणिक उपोषण करून पाणीप्रश्नाच्या मुद्द्यावरुन बिगुल वाजवले. तालुक्यात गेल्या साडेचार वर्षात राष्टÑवादीने अनेक आंदोलने केली. मात्र सावळजचे आंदोलन भलतेच चर्चेत आले आहे.भाजपचे एकेकाळचे स्टार प्रचारक आणि साडेचार वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीवेळी आर. आर. पाटील यांना ‘टार्गेट’ करणाºया गोपीचंद पडळकर यांनी सावळजच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. विशेषत: खासदार पाटील यांच्यावर निशाणा साधत, आमदार सुमनतार्इंच्या पाठीशी भाऊ म्हणून उभे राहण्याचे आश्वासन दिले.गेल्या काही महिन्यांपासून खासदार आणि पडळकर यांच्यात संधी मिळेल तिथे एकमेकांवर तोंडसुख घेणे सुरू असतानाच, आता पडळकर यांनी थेट खासदारांच्या तालुक्यात येऊन, राष्टÑवादीच्या आमदारांना पाठबळ देत, खासदारांना आव्हान दिल्यामुळे, नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.