शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

गायरान जमीन व्यवहारासाठी नियमांच्या चिंधड्या

By admin | Updated: July 2, 2015 23:37 IST

बॅँका अडचणीत : निनाईदेवी, यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कर्जप्रकरणाचा गुंता वाढला

सांगली : गायरान जमिनी शासनाच्या मालकीच्या असूनही, त्या तारण घेऊन कर्जपुरवठा करणे, कर्जाच्या वसुलीसाठी त्याचा लिलाव करून विक्री करणे, अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून जिल्हा व राज्य बॅँकांनी नियमांच्या चिंधड्या केल्या आहेत. त्यामुळे जागांचा आणि कर्जप्रकरणांचा गुंता वाढला आहे. सुरक्षित कर्जपुरवठा करण्याचे धोरण सहकारात आहे. जमीन तारणविषयक कायदेशीर सल्लागार, अधिकारी दिमतीला असूनही जिल्हा बॅँक व राज्य बॅँकेने नियम डावलून कारखान्यांच्या गायरान जमिनी तारण घेऊन त्यावर कर्जपुरवठा केला. कर्जवसुलीचा प्रश्न आल्यानंतर पुन्हा त्याच गायरान जमिनीचा लिलाव, विक्रीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. प्रकरण न्यायप्रविष्ट बनल्यानंतर केलेल्या चुका आता अंगलट येण्याची भीती निर्णयप्रक्रियेतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांना वाटू लागली आहे. सांगली जिल्ह्यात दोन प्रकरणांमध्ये गायरान जमिनीचा मुद्दा कळीचा बनला आहे. नियमांच्या चिंधड्या झाल्याचे स्पष्टपणे दिसतही आहे. करुंगली-आरळा येथील निनाईदेवी सहकारी साखर कारखान्याच्या गायरान जमिनीचा मुद्दा आता जटिल बनला आहे. या कारखान्यास जिल्हा बँकेने २००१ मध्ये ८ कोटी ७० लाखांचे कर्ज दिले होते. मध्यम मुदत कर्जाचे २८ कोटी आणि सहभाग योजनेतून दिलेले ९ कोटी ३७ लाख रुपये अशी एकूण थकबाकी ३७ कोटींच्या घरात आहे. कर्जापोटी जिल्हा बँकेकडे कारखान्याने १४.६५ हेक्टर गायरान जमीन तारण दिली होती. याच कारखान्याला राज्य बँकेनेही सहभाग योजनेतून १४ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. याच कर्जाच्या वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने हा कारखाना परस्पर दालमिया कंपनीला विकला. यामध्ये जिल्हा बँकेकडे तारण असलेल्या गायरान जमिनीचाही समावेश होता. जिल्हा बँकेने याप्रकरणी दालमिया कंपनी आणि राज्य सहकारी बँकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गायरान जमिनीवर जिल्हा व राज्य बॅँकेने केलेला व्यवहारच आता कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय केलेला गायरान जमिनीचा व्यवहार रद्द ठरविण्याच्या उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे नागेवाडीच्या यशवंत साखर कारखान्याचा विक्री व्यवहार अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या कारखान्याच्या एकूण जमिनीपैकी १०३ एकर जमीन गायरान असून, जिल्हा बँकेने शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कारखाना लिलावाची प्रक्रिया पार पाडली आहे. (प्रतिनिधी)न्यायालयाचेच अंजनसातारा जिल्ह्यातील कुमठे येथील गायरान जमीन जरंडेश्वर साखर कारखान्याला देण्याचा व्यवहार उच्च न्यायालयाने रद्द करताना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय अशी गायरान जमीन विकता येणार नाही, असे म्हटले आहे. जिल्हा व राज्य बँकांच्या डोळ्यात न्यायालयानेच अंजन घातले आहे. अधिकाऱ्यांमध्ये चिंताजिल्ह्यातील दोन्ही कारखान्यांच्या गायरान जमिनींचा व एकूणच विक्री व्यवहाराचा प्रश्न न्यायप्रविष्ट असला तरीही, या दोन्ही कारखान्यांच्या गायरान जमिनींच्या विक्री प्रक्रियेत व निर्णयप्रक्रियेत असलेल्या अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. यशवंत कारखान्याची विक्री करताना शासनाची परवानगीसुद्धा घेतली नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे भविष्यातील लेखापरीक्षणात या गोष्टीही अधिकाऱ्यांच्या अंगलट येऊ शकतात.