शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

मानधन कर्मचारी भरतीत घोटाळा

By admin | Updated: February 25, 2015 00:03 IST

पगार थांबविले : आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, मुकादमांची चौकशी

सांगली : महापालिकेतील मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या भरतीची मर्यादा चारशेची असताना, ५३ अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती करून त्यांना गेल्या वर्षभरापासून मानधन देण्यात आलेले आहे. यात महापालिकेचे जवळपास ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याने, याप्रकरणी जबाबदार असलेले आरोग्य अधिकारी सुनील आंबोळे, कामगार अधिकारी के. सी. हळिंगळे, स्वच्छता निरीक्षक आणि २७ मुकादमांचे पगार थांबविण्याचे आदेश आयुक्त अजिज कारचे यांनी दिले. याबाबतची माहिती महापौर विवेक कांबळे यांनी आज, मंगळवारी पत्रकारांना दिली. कांबळे म्हणाले की, मंजूर कोट्यानुसार मिरजेसाठी १0५, कुपवाडसाठी १0५ आणि सांगलीतील दोन प्रभाग समित्यांसाठी प्रत्येकी ९५ असे एकूण चारशे मानधनावरील कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक होते. पण प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांची पाहणी केल्यानंतर ४५३ कर्मचारी कार्यरत असल्याचे लक्षात आले. अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा ठराव स्थायी समिती किंवा महासभेत झालेला नाही. त्याशिवाय या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी कोणत्याही प्रशासकीय मान्यतेचीही प्रक्रिया पार पाडलेली नाही. परस्पर हे कर्मचारी भरण्यात आले असून त्यांच्या पगारावर आजअखेर ३५ लाख रुपये खर्च झाले आहेत. हा नियुक्तीचा मोठा घोटाळा आहे. याबाबतचा अहवाल उपायुक्तांनी नुकताच आयुक्तांना सादर केला आहे. याप्रकरणी जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी आणि प्रसंगी त्यांना बडतर्फही करावे, अशी मागणी आपण आयुक्तांकडे केली आहे. तूर्त आयुक्तांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार थांबविण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये सर्व मुकादम, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य अधिकारी आणि कामगार अधिकारी यांचा समावेश आहे. दोषी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगारातून झालेल्या नुकसानीची रक्कम वसूल केली जावी, अशीही मागणी आयुक्तांकडे करण्यात आल्याचे कांबळे यांनी सांगितले. यापुर्वी मिरजेमध्ये बोगस भरतीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)मुकादम हप्ता घेतात मानधनावरील कर्मचाऱ्यांना पूर्वी तीन हजार रुपये मानधन होते. आता ते पाच हजार रुपये झाले आहे. अशावेळी महापालिकेचे मुकादम या गोरगरीब कामगारांकडून हप्ते घेत असल्याच्या तक्रारी आहेत. या कामगारांचा छळही केला जातो. त्यामुळे हे सर्व प्रकार यापुढील काळात आम्ही बंद करू, असे कांबळे म्हणाले.