शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टरवर पेरणीच नाही!

By admin | Updated: July 24, 2014 23:13 IST

जिल्ह्यात केवळ ४४ टक्केच पेरण्या : उत्पन्नात २५ टक्के घटीची कृषी अधिकाऱ्यांची शक्यता; शेतकऱ्यांची रब्बीची तयारी

सांगली : जिल्ह्यात वेळेवर मान्सून दाखल न झाल्यामुळे आणि सध्याही दुष्काळी भागात पावसाचा जोर नसल्यामुळे दोन लाख १९ हजार ५८४ हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्याच झालेल्या नाहीत़ त्यामुळे जिल्ह्याच्या सरासरी उत्पन्नात ६० टक्के, तर खरीप पिकांच्या उत्पन्नात २० ते २५ टक्के घट येण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे़ खरीप पेरणीसाठी १५ जून ते १५ जुलै हा कालावधी योग्य आहे़ पण, पूर्ण जून महिन्यात पाऊसच झाला नाही़ जुलैत पावसाने हजेरी लावली़ परंतु, रिमझिम पाऊस झाल्यामुळे खरीप पिके जगवण्यापुरताच त्याचा उपयोग झाला आहे़ जिल्ह्यात खरीप पेरणीचे तीन लाख ९२ हजार ५१० हेक्टर क्षेत्र आहे़ यापैकी एक लाख ७२ हजार ९२६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे़ त्याची टक्केवारी केवळ ४४ टक्के आहे़ या पेरण्याही उशिरा झाल्यामुळे येथील उत्पन्नात २० ते २५ टक्केपर्यंत घट येण्याची शक्यता आहे़ पेरणी न झालेले क्षेत्र सर्वाधिक म्हणजे ५६ टक्के आहे़ सध्या पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात जास्तीत-जास्त ८० टक्के खरीप पेरण्या होण्याची शक्यता आहे़ उर्वरित एक लाख हेक्टर क्षेत्र नापेरच राहण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे़ जिल्ह्याच्या सरासरी उत्पन्नावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे़ काही शेतकऱ्यांनी तर खरीप पेरण्यांऐवजी रब्बी पेरणीसाठीच प्रयत्न सुरू केले आहेत़ एक हंगाम वाया जाणार असल्याने शेतकऱ्यांनी रब्बीचा निर्णय घेतला आहे़ (प्रतिनिधी)कृषी दुकानदारही अडचणीतकृषी सेवा केंद्रचालकांनी बियाणांचा मुबलक साठा करून ठेवला होता़ बाजरी, ज्वारी, मटकी, मूग आदी बियाणांचाही दुकानदारांनी साठा करून ठेवला होता़ परंतु, पाऊस नसल्यामुळे खरीप पेरण्याच झाल्या नसल्याने दुकानात बियाणे तसेच पडून राहिले आहे़ दुकानदार शिवाजी पाटील यांनी सांगितले की, आमचे छोटे दुकान असल्यामुळे पन्नास हजारांचा तोटा झाला आहे़ मोठ्या दुकानदारांचे भांडवल अडकून पडल्यामुळे त्यांचा सर्वाधिक तोटा झाला आहे़कृषी दुकानदारही अडचणीतकृषी सेवा केंद्रचालकांनी बियाणांचा मुबलक साठा करून ठेवला होता़ बाजरी, ज्वारी, मटकी, मूग आदी बियाणांचाही दुकानदारांनी साठा करून ठेवला होता़ परंतु, पाऊस नसल्यामुळे खरीप पेरण्याच झाल्या नसल्याने दुकानात बियाणे तसेच पडून राहिले आहे़ दुकानदार शिवाजी पाटील यांनी सांगितले की, आमचे छोटे दुकान असल्यामुळे पन्नास हजारांचा तोटा झाला आहे़ मोठ्या दुकानदारांचे भांडवल अडकून पडल्यामुळे त्यांचा सर्वाधिक तोटा झाला आहे़तालुकापेरणी क्षेत्र पेरणीमिरज५९०१८८८१४जत४५७८०३५८९८खानापूर४९०५४२२३९३वाळवा५७१६०२५३२४तासगाव४५०३७१४७७४शिराळा३५५८५२१३६५आटपाडी१७५४४७९०१क़ महांकाळ२५८४२१३१५९पलूस२३९०९२२२५कडेगाव३३५८१२१०७३एकूण३९२५१०१७२९२६