शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टरवर पेरणीच नाही!

By admin | Updated: July 24, 2014 23:13 IST

जिल्ह्यात केवळ ४४ टक्केच पेरण्या : उत्पन्नात २५ टक्के घटीची कृषी अधिकाऱ्यांची शक्यता; शेतकऱ्यांची रब्बीची तयारी

सांगली : जिल्ह्यात वेळेवर मान्सून दाखल न झाल्यामुळे आणि सध्याही दुष्काळी भागात पावसाचा जोर नसल्यामुळे दोन लाख १९ हजार ५८४ हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्याच झालेल्या नाहीत़ त्यामुळे जिल्ह्याच्या सरासरी उत्पन्नात ६० टक्के, तर खरीप पिकांच्या उत्पन्नात २० ते २५ टक्के घट येण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे़ खरीप पेरणीसाठी १५ जून ते १५ जुलै हा कालावधी योग्य आहे़ पण, पूर्ण जून महिन्यात पाऊसच झाला नाही़ जुलैत पावसाने हजेरी लावली़ परंतु, रिमझिम पाऊस झाल्यामुळे खरीप पिके जगवण्यापुरताच त्याचा उपयोग झाला आहे़ जिल्ह्यात खरीप पेरणीचे तीन लाख ९२ हजार ५१० हेक्टर क्षेत्र आहे़ यापैकी एक लाख ७२ हजार ९२६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे़ त्याची टक्केवारी केवळ ४४ टक्के आहे़ या पेरण्याही उशिरा झाल्यामुळे येथील उत्पन्नात २० ते २५ टक्केपर्यंत घट येण्याची शक्यता आहे़ पेरणी न झालेले क्षेत्र सर्वाधिक म्हणजे ५६ टक्के आहे़ सध्या पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात जास्तीत-जास्त ८० टक्के खरीप पेरण्या होण्याची शक्यता आहे़ उर्वरित एक लाख हेक्टर क्षेत्र नापेरच राहण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे़ जिल्ह्याच्या सरासरी उत्पन्नावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे़ काही शेतकऱ्यांनी तर खरीप पेरण्यांऐवजी रब्बी पेरणीसाठीच प्रयत्न सुरू केले आहेत़ एक हंगाम वाया जाणार असल्याने शेतकऱ्यांनी रब्बीचा निर्णय घेतला आहे़ (प्रतिनिधी)कृषी दुकानदारही अडचणीतकृषी सेवा केंद्रचालकांनी बियाणांचा मुबलक साठा करून ठेवला होता़ बाजरी, ज्वारी, मटकी, मूग आदी बियाणांचाही दुकानदारांनी साठा करून ठेवला होता़ परंतु, पाऊस नसल्यामुळे खरीप पेरण्याच झाल्या नसल्याने दुकानात बियाणे तसेच पडून राहिले आहे़ दुकानदार शिवाजी पाटील यांनी सांगितले की, आमचे छोटे दुकान असल्यामुळे पन्नास हजारांचा तोटा झाला आहे़ मोठ्या दुकानदारांचे भांडवल अडकून पडल्यामुळे त्यांचा सर्वाधिक तोटा झाला आहे़कृषी दुकानदारही अडचणीतकृषी सेवा केंद्रचालकांनी बियाणांचा मुबलक साठा करून ठेवला होता़ बाजरी, ज्वारी, मटकी, मूग आदी बियाणांचाही दुकानदारांनी साठा करून ठेवला होता़ परंतु, पाऊस नसल्यामुळे खरीप पेरण्याच झाल्या नसल्याने दुकानात बियाणे तसेच पडून राहिले आहे़ दुकानदार शिवाजी पाटील यांनी सांगितले की, आमचे छोटे दुकान असल्यामुळे पन्नास हजारांचा तोटा झाला आहे़ मोठ्या दुकानदारांचे भांडवल अडकून पडल्यामुळे त्यांचा सर्वाधिक तोटा झाला आहे़तालुकापेरणी क्षेत्र पेरणीमिरज५९०१८८८१४जत४५७८०३५८९८खानापूर४९०५४२२३९३वाळवा५७१६०२५३२४तासगाव४५०३७१४७७४शिराळा३५५८५२१३६५आटपाडी१७५४४७९०१क़ महांकाळ२५८४२१३१५९पलूस२३९०९२२२५कडेगाव३३५८१२१०७३एकूण३९२५१०१७२९२६