शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

चहापावडर विकून सावरला संसार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : घरची परिस्थिती तशी बेताचीच...पतीचा चहापावडर विक्रीचा व्यवसाय...संसाराच्या वेलीवर तीन कळ्या उमललेल्या...सारं काही आनंदात सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : घरची परिस्थिती तशी बेताचीच...पतीचा चहापावडर विक्रीचा व्यवसाय...संसाराच्या वेलीवर तीन कळ्या उमललेल्या...सारं काही आनंदात सुरू होते. पण २६ जानेवारी २००६ या दिवशी नयन नितीन पवार यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पतीने आकस्मिक निधन झाले. पदरात तीन मुली, आर्थिक स्थिती म्हणावी तितकी चांगली नाही. अशा परिस्थितीत त्यांनी पतीचा व्यवसाय स्वत:च करण्याचा निर्णय घेतला. संकटांशी दोन हात करत त्यांनी मुलींना उच्चशिक्षित करण्याचा निर्धार केला. चिकाटी, जिद्द आणि अपार कष्ट करण्याची तयारी या जोरावर त्यांनी चहापावडर विकून स्वत:चा संसार तर सावरलाच, शिवाय मुलींनाही उच्च शिक्षणाची दारे खुली करून दिली.

शहरातील रमामातानगरमधील माने प्लाॅटमध्ये नयन पवार या तीन मुली व आईसोबत राहतात. घराचे नावही ‘समाधान’; पण कष्टाशिवाय समाधान मिळत नाही, असे म्हटले जाते, त्याची प्रचिती पवार यांच्या कहाणीतून समोर येते. वयाच्या १९ व्यावर्षी त्यांचे लग्न झाले. त्यांचे पती नितीन पवार हे चहापावडर विकून घराचा गाडा चालवित होते. त्या स्वत: चहाच्या दुकानात काम करीत होत्या. संसाराच्या वेलीवर तीन कळ्या उमललेल्या. कष्टाचे दिवस असूनही सुखाला तोटा नव्हता. पण २६ जानेवारी २००६ रोजी नितीन यांचे अचानक निधन झाले आणि हसत्या-खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यातून कसेबसे सावरत नयन पवार यांनी कुटुंबाची सूत्रे हाती घेतली.

नयन पवार यांना पुढे शिकण्याची इच्छा होती. पण १२ वीनंतर त्यांना शिक्षण सोडावे लागले. आपल्या तीनही मुलींना उच्चशिक्षित बनविण्याची खूणगाठ बांधून त्या कामाला लागल्या. पतीचा चहापावडर विकण्याचा व्यवसाय पुन्हा सुरू केला. आधीच्या उधारीच्या वसुलीसाठी त्या दारोदार जात होत्या. काहींनी घरात आणून चहापावडरची उधारी दिली; तर काहींनी टोलवाटोलवी केली. त्या परिस्थितीशी जुळवून घेत त्यांनी घराघरात जाऊन चहापावडरची विक्री सुरू केली. सुरुवातीला पायीच त्या फिरत होत्या. थोड्या दिवसात त्यांनी सायकल शिकून घेतली. पतीच्या निधनानंतर नातेवाईकांनी, मुलींना फार न शिकविता लग्नं करू द्या, असा सल्ला दिला होता. पण त्यांनी मात्र मुलींना शिकवून मोठे करण्याचा निर्धार केला होता. मुली जसजशा पुढच्या इयत्तेत जात होत्या, तसे आर्थिक गणित जुळवताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यातून त्यांनी शिकवणीचे वर्ग सुरू केले. तीनही मुली शाळेत हुशार होत्या. दहावी, बारावीत चांगले गुण होते. त्यांनी कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात प्रावीण्य मिळविले होते. मोठी मुलगी गायत्रीने काॅम्प्युटर सायन्स करुन पुढे एमएसडब्ल्यू केले, तर दुसरी मुलगी रक्षंदा इलेक्ट्राॅनिक्स इंजिनिअर झाली आहे. धाकटी नंदिता तर दहावीला जिल्ह्यात पहिली आली होती. तिचे सीए बनण्याचे स्वप्न आहे. अजूनही नयन पवार या चहापावडर विक्रीचा व्यवसाय करतात. आता मुलींकडून त्यांना संसाराचा गाडा हाकण्यासाठी मदत होत आहे.