शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय संघर्षात सातारारोडची ससेहोलपट!

By admin | Updated: June 28, 2015 23:38 IST

डोकेदुखी वाढली : राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; पोलीस दूरक्षेत्र मजबुतीकरणाची गरज

कोरेगाव : ब्रिटीशकाळापासून औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या सातारारोडची वाटचाल संवेदनशीलतकडे सुरु आहे. सातत्याने भांडणे आणि तणाव यामुळे सातारारोड पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी बनत असून, नागरिकांचे जीवनमानही बदलत चालले आहे. राजकीय इच्छाशक्ती नसल्याने या गावाचे रुपडे पालटू शकलेले नाही. अनेक वर्षांपासून असलेल्या पोलीस दूरक्षेत्राच्या मजबुतीकरणाबरोबरच तेथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्यावाढविण्याची गरज आहे. मुंबई इलाख्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सर धनजीशा कूपर यांनी रेल्वेमार्गाचे नेटवर्क पाहून सातारारोड येथे नांगर कारखाना उभा केला. कालांतराने त्यामध्ये भरभराट होत गेली आणि सातारारोड ही औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री प्रबोधनकार ठाकरे यांनीही सातारारोडला काही काळ वास्तव्य केले होते. १९७० च्या दशकामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सातारारोड येथील रेल्वेस्थानक बंद करत रेल्वेमार्ग बदलला आणि तो साताऱ्यासाठी क्षेत्रमाहुली येथे नेला. त्यानंतर सातारारोडची अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली. कूपर यांची एकमेव फौंड्री तेथे राहिली. कूपर यांच्याकडून ती शेठ वालचंद हिराचंद यांच्या समूहाने विकत घेतली आणि त्याचे नामकरण वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड असे झाले. या कारखान्यातील कामगार युनियनसह अन्य संस्थांमुळे सातारारोडची राजकीय हालचाल वाढू लागली आणि तेथून युनियनवाद आणि राजकीय चढाओढ यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. राष्ट्रवादी विरुध्द काँग्रेस असा संघर्ष गेले काही वर्षे या गावात पाहावयास मिळत आहे. युनियन वादातून आणि वाळूच्या कारणावरुन गेल्या दोन ते तीन वर्षात सातारारोडमध्ये तणावपूर्ण परिस्थिती अनेकवेळा राहिली आहे. राजकीय इच्छाशक्ती प्रबळ नसल्याने प्रशासन या गावाकडे अपेक्षेएवढे लक्ष देत नसल्याने गावकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (प्रतिनिधी)स्वतंत्र उपनिरीक्षक हवा...सातारारोड येथे गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस दूरक्षेत्र आहे. त्यासाठी स्वतंत्र इमारत व मोठा परिसर आहे. या दूरक्षेत्रासाठी आवश्यक ते अधिकारी आणि कर्मचारी पोलीस दलाकडून देण्यात येत नसल्याने हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कर्मचारी तेथे काम पाहत आहेत. सातारारोडसह पंचक्रोशीतील वीसहून अधिक गावांचा कारभार या दूरक्षेत्रातून चालत असल्याने कर्मचाऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पोलीस दलाच्या नियमाप्रमाणे तेथे स्वतंत्रपणे पोलीस उपनिरीक्षकाची नियुक्ती होणे अपेक्षित आहे; मात्र तत्कालीन उपनिरीक्षक एस. जी. वायदंडे यांची बदली झाल्यानंतर हे पदच रिक्त राहिले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तातडीने तेथे स्वतंत्र उपनिरीक्षकाची नियुक्ती करणे आवश्यक आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.