शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

राजकीय संघर्षात सातारारोडची ससेहोलपट!

By admin | Updated: June 28, 2015 23:38 IST

डोकेदुखी वाढली : राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; पोलीस दूरक्षेत्र मजबुतीकरणाची गरज

कोरेगाव : ब्रिटीशकाळापासून औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या सातारारोडची वाटचाल संवेदनशीलतकडे सुरु आहे. सातत्याने भांडणे आणि तणाव यामुळे सातारारोड पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी बनत असून, नागरिकांचे जीवनमानही बदलत चालले आहे. राजकीय इच्छाशक्ती नसल्याने या गावाचे रुपडे पालटू शकलेले नाही. अनेक वर्षांपासून असलेल्या पोलीस दूरक्षेत्राच्या मजबुतीकरणाबरोबरच तेथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्यावाढविण्याची गरज आहे. मुंबई इलाख्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सर धनजीशा कूपर यांनी रेल्वेमार्गाचे नेटवर्क पाहून सातारारोड येथे नांगर कारखाना उभा केला. कालांतराने त्यामध्ये भरभराट होत गेली आणि सातारारोड ही औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री प्रबोधनकार ठाकरे यांनीही सातारारोडला काही काळ वास्तव्य केले होते. १९७० च्या दशकामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सातारारोड येथील रेल्वेस्थानक बंद करत रेल्वेमार्ग बदलला आणि तो साताऱ्यासाठी क्षेत्रमाहुली येथे नेला. त्यानंतर सातारारोडची अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली. कूपर यांची एकमेव फौंड्री तेथे राहिली. कूपर यांच्याकडून ती शेठ वालचंद हिराचंद यांच्या समूहाने विकत घेतली आणि त्याचे नामकरण वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड असे झाले. या कारखान्यातील कामगार युनियनसह अन्य संस्थांमुळे सातारारोडची राजकीय हालचाल वाढू लागली आणि तेथून युनियनवाद आणि राजकीय चढाओढ यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. राष्ट्रवादी विरुध्द काँग्रेस असा संघर्ष गेले काही वर्षे या गावात पाहावयास मिळत आहे. युनियन वादातून आणि वाळूच्या कारणावरुन गेल्या दोन ते तीन वर्षात सातारारोडमध्ये तणावपूर्ण परिस्थिती अनेकवेळा राहिली आहे. राजकीय इच्छाशक्ती प्रबळ नसल्याने प्रशासन या गावाकडे अपेक्षेएवढे लक्ष देत नसल्याने गावकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (प्रतिनिधी)स्वतंत्र उपनिरीक्षक हवा...सातारारोड येथे गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस दूरक्षेत्र आहे. त्यासाठी स्वतंत्र इमारत व मोठा परिसर आहे. या दूरक्षेत्रासाठी आवश्यक ते अधिकारी आणि कर्मचारी पोलीस दलाकडून देण्यात येत नसल्याने हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कर्मचारी तेथे काम पाहत आहेत. सातारारोडसह पंचक्रोशीतील वीसहून अधिक गावांचा कारभार या दूरक्षेत्रातून चालत असल्याने कर्मचाऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पोलीस दलाच्या नियमाप्रमाणे तेथे स्वतंत्रपणे पोलीस उपनिरीक्षकाची नियुक्ती होणे अपेक्षित आहे; मात्र तत्कालीन उपनिरीक्षक एस. जी. वायदंडे यांची बदली झाल्यानंतर हे पदच रिक्त राहिले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तातडीने तेथे स्वतंत्र उपनिरीक्षकाची नियुक्ती करणे आवश्यक आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.