शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
3
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
4
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
5
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
6
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
7
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
8
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
9
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
10
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
11
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
12
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
13
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
14
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
15
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
16
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
17
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
18
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू
19
'हाऊसफुल' फेम अभिनेत्रीने ३७व्या वर्षी गुपचूप केलं लग्न, बिजनेसमॅन आहे पती, विवाहसोहळ्याचे फोटो समोर

गाव वाचविण्यासाठी सरपंचांनी कठोर निर्णय घ्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:25 IST

सांगली : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुुरू झाली आहे. रुग्ण संख्याही वाढत असून, हे संकट मोठे आहे. आपण सर्वजण ...

सांगली : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुुरू झाली आहे. रुग्ण संख्याही वाढत असून, हे संकट मोठे आहे. आपण सर्वजण मिळून यावर मात करू. पण, आपत्ती नियंत्रणात सरपंच, दक्षता समित्यांनी जबाबदारी लक्षात घ्यावी, कायदेशीर अधिकार वापरावेत. गाव वाचविण्यासाठी प्रसंगी कठोर कारवाई करा, प्रशासन तुमच्यासोबत आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यातील सरपंच, ग्रामदक्षता समित्यांचे प्रतिनिधी, ग्रामसेवक, तालुक्‍यांचे गटविकास अधिकारी यांच्याशी डॉ. चौधरी यांनी सोमवारी दुपारी संवाद साधला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, गटविकास अधिकारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवादात सहभाग घेतला. जिल्ह्यातून ६५० पदाधिकारी, अधिकारी या संवादात सहभागी होते. यावेळी काही सरपंचांना शंका विचारून त्याचे निरसन करून घेतले.

डॉ. चौधरी म्हणाले, गावातील प्रत्येक घटकाला वाचविण्याची आपली जबाबदारी आहे. यासाठी दुकानाबाहेर रिंगण आखा. मास्क, सॅनिटायझरचा वापर वाढविण्यासाठी जनजागृती झाली पाहिजे. रुग्ण संख्या ज्या भागात अधिक आहे, तेथे औषध फवारणी करा. होम आयसोलेशन रुग्ण व नातेवाईक बाहेर फिरणार नाहीत, याची खबरदारी घ्या. घरावर तसा बोर्ड लावा. संबंधित रुग्णांच्या हातावर शिक्केही मारा.

जितेंद्र डुडी म्हणाले, गावासाठी वेळ द्या. सामाजिक कार्यकर्ते एकत्र करा. या मोहिमेत शिक्षकांचा सहभाग आपणास मिळेल, तशा सूचना दिल्या आहेत.

चौकट

लक्षणे असतील, तर तपासणी करा

काही सरपंचांनी जिल्ह्याबाहेरुन आलेल्या लोकांना क्वारंटाईन करावे का, अशी शंका विचारली. त्यावर जिल्हाधिकारी म्हणाले, तशी काही गरज नाही. कोरोनाची लक्षणे दिसत असतील, तर त्यांची तपासणी करून घ्या. चाचणी पॉझिटिव्ह आली, तरच त्यांना क्वारंटाईन करून उपचार करण्याची गरज आहे.

चौकट

गावांनी शंभर टक्के लसीकरण करावे

जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख १० हजार रुग्णांना लस दिली गेली आहे. लसीकरण वाढवा. आरोग्य केंद्र, उपकेंद्रात मंडप घाला, खुर्च्या आणा, पिण्याच्या पाण्याची सोय करा. ४५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती लस घेईल, याकडे सरपंचांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे आवाहनही डॉ. चौधरी यांनी केले.