शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

तासगावात संजयकाकांची ‘पायाभरणी’

By admin | Updated: September 13, 2015 00:18 IST

विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका : ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे ‘लक्ष्य’

दत्ता पाटील ल्ल तासगाव खासदार संजयकाका पाटील यांनी तासगाव तालुक्यात, वेगवेगळ्या निधीतून मंजूर झालेल्या विकास कामांचे उद्घाटन करण्याचा धडाका लावला आहे. तालुक्यात आॅक्टोबर महिन्यात ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा रणसंग्राम होणार आहे. या पार्श्वभूमीवर विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राजकारणाची भक्कम पायाभरणी करण्यासाठी तालुका पिंंजून काढण्यास सुरुवात केली आहे. संजयकाकांचा विकासकामांचा दौरा चर्चेचा ठरला असून, तालुक्यातील सत्तास्थाने काबीज करण्यासाठी स्थानिक संस्थांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. तासगाव तालुक्यात बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघाले. तालुक्यातील आबा गट आणि काका गट या निवडणुकीच्या निमित्ताने आमने-सामने आले. मात्र बाजार समितीच्या निवडणुकीत महत्वपुर्ण घटक असणाऱ्या तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती आणि विकास सोसायट्यांवर आबा गटाचे वर्चस्व असल्यामुळे बाजार समितीचा गड खासदार पाटील यांना काबीज करण्यात अपयश आले. सहकारी संस्थांबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांत वर्चस्व मिळवायचे असेल तर राजकारणाचा पाया ठरणाऱ्या सोसायट्या आणि ग्रामपंचायतीवर वर्चस्व असणे महत्वपुर्ण आहे. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हा पाया भक्कम ठेवल्यामुळेच त्यांची राजकीय वाट सुकर झाली. त्यांच्या पश्चात राष्ट्रवादीचा पाया डळमळीत करुन भाजप भक्कम करण्यासाठी खासदार पाटील यांनी रणनीती आखली आहे. त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरु आहे. खासदार फंडासह जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावांत विकासकामे मंजूर केलेली आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी विकासकामांच्या बाबतीत खासदारांनी हात सैल सोडला आहे. त्यामुळे खासदार समर्थक कार्यर्त्यांतदेखील फील गुडचे वातावरण आहे. शुकवारी खासदार संजयकाकांनी मांजर्डे जिल्हा परिषद गटातील काही गावांत विविध विकास कामांचे उद्घाटन केले. आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत मांजर्डे जिल्हा परिषद गटातील वाड्यांसह बहुतांश गावांचा माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाच पाठिंबा राहिला आहे. आबा-काका विरोधात झालेल्या प्रत्येक लढतीत आबांच्या पारड्यातच झुकते माप पडले होते. खासदार पाटील यांनी पहिल्याच टप्प्यात मांजर्डे गटावर लक्ष्य केंद्रीत करुन विकासकामांच्या निमित्ताने राजकारणाची भक्कम पायाभरणी करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. तीन दिवसांच्या दौऱ्यात ४५ गावांतील विकास कामांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये निवडणुका होणार असलेल्या ३९ गावांचा समावेश आहे.