शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

तासगाव कारखान्यासाठी संजयकाकांनी पुढाकार घ्यावा

By admin | Updated: January 30, 2016 00:14 IST

आर. डी. पाटील : विक्री व्यवहाराची याचिका मागे घ्यावी

भिलवडी : तासगाव तालुका सहकारी साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा, यासाठी आम्ही लढा उभारला आहे. गणपती संघाला तो खरोखरच चालवायचा असेल, तर त्यांनी विक्री व्यवहार कायम होऊन मिळावा यासाठी दाखल केलेली याचिका पाठीमागे घेऊन, राज्य बॅँकेकडून दीर्घ मुदतीसाठीची निविदा प्रसिध्द करण्यासाठी खासदार संजय काका पाटील यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन कारखान्याचे माजी संचालक आर. डी. पाटील यांनी केले. खासदार संजयकाका पाटील यांनी केलेल्या टीकेला कारखाना बचाव समितीच्यावतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे उत्तर दिले. तासगाव कारखान्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सहकारी बॅँकेचा असून, सरकारला याबाबतीत निर्णय घेण्याच्या मर्यादा यापूर्वीच स्पष्ट झाल्या आहेत. कारखान्याची मालमत्ता राज्य बॅँकेने सिक्युरिटायझेशन कायद्यांतर्गत ताब्यात घेतली आहे. राज्य बॅँकेच्या तत्कालीन लोकनियुक्त संचालक मंडळाने अवघ्या १४ कोटी ५१ लाखाला खासगी पध्दतीने विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सभासदांच्या रेट्यामुळे व कायदेशीर प्रक्रियेमुळे विक्री व्यव्हार पूर्ण होऊ शकला नाही. राज्य बॅँकेच्या प्रशासन मंडळाने विक्री व्यवहार रद्द केला आहे. तसे प्रतिज्ञापत्रही उच्च न्यायालय व डी.आर.ए.टी. न्यायालयात दाखल केले आहे. लवकरच या प्रकरणाची सुनावणी होऊन अंतिम निर्णय होणार आहे. नंतर या मालमत्तेचे काय करायचे, याबाबतचे निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार हे राज्य बॅँकेला आहेत. ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामध्ये मुंबईत बैठक झाली. विक्री व्यवहारातील बेकायदेशीर व बोगसगिरी डॉ. पाटील यांनी सहकारमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. यावेळी हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी राज्य बॅँकेच्या प्रशासक मंडळाच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्याचे मान्य केले आहे. येत्या काही महिन्यात बॅँकेची निवडणूक होत आहे. लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर हा कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेवून तो दीर्घ मुदतीने भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासंदर्भात मार्ग काढण्याचे आश्वासन खा. शरद पवार व आमदार सुमनताई पाटील यांनी दिले आहे. आम्ही सर्वजण तासगाव कारखाना सभासदांच्या मालकीचा राहून तो चालू करण्यासाठी व्यापक लढा उभारला आहे. खा. संजयकाका जर पुढाकार घेणार असतील, तर त्यांना आम्ही सहकार्य करूच, पण त्यांनी विक्री व्यवहारासंदर्भात दाखल केलेली याचिका मागे घेतल्यावरच तिढा सुटेल, असेही पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)