शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

संजयकाका-अनिलभाऊंचे गुफ्तगू...

By admin | Updated: May 21, 2015 00:02 IST

फोरमचे नेते एकत्र : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

सांगली : नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या न्यायालयीन लढाईत आमने-सामने असणारे खासदार संजय पाटील आणि आ. अनिल बाबर यांच्यात बुधवारी दुपारी सांगलीच्या विश्रामगृहात अर्धा तास गुफ्तगू सुरू होते. जिल्हा बँक निवडीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चे सूर आळवले. थकित कर्जामुळे जिल्हा बँकेने नागेवाडी येथील यशवंत सहकारी साखर कारखाना लिलावात काढला होता. खासदार संजय पाटील यांच्या गणपती संघाने तो लिलावात खरेदी केला होता. मात्र सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने चुकीची लिलाव प्रक्रिया राबविली असून, कारखान्याचा लिलाव बेकायदेशीर असल्याने कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा, यासाठी सभासदांच्यावतीने शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी याचिका दाखल केली आहे. यशवंत कारखान्याच्यानिमित्ताने बाबर आणि संजयकाका एकमेकांसमोर उभे आहेत. दोन्ही नेत्यांमधील कारखान्याची लढाई आता राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. अशा परिस्थितीत हे दोन्ही नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्यानिमित्ताने बुधवारी एकत्र आले. निवडीची प्रक्रिया संपल्यानंतर सांगलीच्या काँग्रेस भवनसमोरील विश्रामगृहात ते एकत्र आले. दुष्काळी फोरमचे नेते भाजपचे आमदार विलासराव जगताप, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख तेथे उपस्थित होते. संजयकाकांची पत्रकार परिषद सुरू असताना बाबर त्यांच्या बाजूलाच बसले होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर दोन्ही नेते विश्रामगृहाच्या ‘अँटी चेंबर’मध्ये गेले. बंद खोलीत त्यांनी अर्धा तास चर्चा केली. त्यांच्यातील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी, ही ‘यशवंत’ची चर्चा नसल्याचे स्पष्ट केले. विश्रामगृहात संजयकाकांचे काही समर्थकही उपस्थित होते. त्यामुळे त्यांनाही या दोन्ही नेत्यांच्या अचानक एकत्रित येण्यामुळे व चर्चेमुळे आश्चर्य वाटले. (प्रतिनिधी)बँकेतही एकत्र हे दोन्ही नेते ‘यशवंत’च्या लढाईत आमने-सामने असले तरी, जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून एकाच पॅनेलमधून निवडून आलेले आहेत. पदाधिकारी निवडीवेळीही ते एकत्रच होते.आम्ही एकत्रच !दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याबाबत पत्रकारांनी आश्चर्य व्यक्त केल्यानंतर दुष्काळी फोरमचे नेते पृथ्वीराज देशमुख आणि आ. विलासराव जगताप म्हणाले की, आम्ही बऱ्याचदा एकत्रित असतो. दुष्काळी फोरमच्या माध्यमातून एकत्र आलो असलो तरी, सध्या सरकारमध्येसुद्धा एकत्र आहोत. कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एकमेकांशी संवाद साधतो. त्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.