शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
2
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
3
IPL 2025 : शाहरुख खान काटावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
4
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
5
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
6
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप
7
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
8
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
10
Vaishnavi Hagawane case: अखेर निलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल; बाळाला घ्यायला गेल्यानंतर दिली होती धमकी 
11
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
12
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
13
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
14
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
15
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
16
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
17
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
18
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
19
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
20
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न

संजयकाका-अनिलभाऊंचे गुफ्तगू...

By admin | Updated: May 21, 2015 00:02 IST

फोरमचे नेते एकत्र : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

सांगली : नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या न्यायालयीन लढाईत आमने-सामने असणारे खासदार संजय पाटील आणि आ. अनिल बाबर यांच्यात बुधवारी दुपारी सांगलीच्या विश्रामगृहात अर्धा तास गुफ्तगू सुरू होते. जिल्हा बँक निवडीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चे सूर आळवले. थकित कर्जामुळे जिल्हा बँकेने नागेवाडी येथील यशवंत सहकारी साखर कारखाना लिलावात काढला होता. खासदार संजय पाटील यांच्या गणपती संघाने तो लिलावात खरेदी केला होता. मात्र सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने चुकीची लिलाव प्रक्रिया राबविली असून, कारखान्याचा लिलाव बेकायदेशीर असल्याने कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा, यासाठी सभासदांच्यावतीने शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी याचिका दाखल केली आहे. यशवंत कारखान्याच्यानिमित्ताने बाबर आणि संजयकाका एकमेकांसमोर उभे आहेत. दोन्ही नेत्यांमधील कारखान्याची लढाई आता राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. अशा परिस्थितीत हे दोन्ही नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्यानिमित्ताने बुधवारी एकत्र आले. निवडीची प्रक्रिया संपल्यानंतर सांगलीच्या काँग्रेस भवनसमोरील विश्रामगृहात ते एकत्र आले. दुष्काळी फोरमचे नेते भाजपचे आमदार विलासराव जगताप, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख तेथे उपस्थित होते. संजयकाकांची पत्रकार परिषद सुरू असताना बाबर त्यांच्या बाजूलाच बसले होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर दोन्ही नेते विश्रामगृहाच्या ‘अँटी चेंबर’मध्ये गेले. बंद खोलीत त्यांनी अर्धा तास चर्चा केली. त्यांच्यातील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी, ही ‘यशवंत’ची चर्चा नसल्याचे स्पष्ट केले. विश्रामगृहात संजयकाकांचे काही समर्थकही उपस्थित होते. त्यामुळे त्यांनाही या दोन्ही नेत्यांच्या अचानक एकत्रित येण्यामुळे व चर्चेमुळे आश्चर्य वाटले. (प्रतिनिधी)बँकेतही एकत्र हे दोन्ही नेते ‘यशवंत’च्या लढाईत आमने-सामने असले तरी, जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून एकाच पॅनेलमधून निवडून आलेले आहेत. पदाधिकारी निवडीवेळीही ते एकत्रच होते.आम्ही एकत्रच !दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याबाबत पत्रकारांनी आश्चर्य व्यक्त केल्यानंतर दुष्काळी फोरमचे नेते पृथ्वीराज देशमुख आणि आ. विलासराव जगताप म्हणाले की, आम्ही बऱ्याचदा एकत्रित असतो. दुष्काळी फोरमच्या माध्यमातून एकत्र आलो असलो तरी, सध्या सरकारमध्येसुद्धा एकत्र आहोत. कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एकमेकांशी संवाद साधतो. त्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.