शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

संजयकाका-अनिलभाऊंचे गुफ्तगू...

By admin | Updated: May 21, 2015 00:02 IST

फोरमचे नेते एकत्र : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

सांगली : नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या न्यायालयीन लढाईत आमने-सामने असणारे खासदार संजय पाटील आणि आ. अनिल बाबर यांच्यात बुधवारी दुपारी सांगलीच्या विश्रामगृहात अर्धा तास गुफ्तगू सुरू होते. जिल्हा बँक निवडीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चे सूर आळवले. थकित कर्जामुळे जिल्हा बँकेने नागेवाडी येथील यशवंत सहकारी साखर कारखाना लिलावात काढला होता. खासदार संजय पाटील यांच्या गणपती संघाने तो लिलावात खरेदी केला होता. मात्र सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने चुकीची लिलाव प्रक्रिया राबविली असून, कारखान्याचा लिलाव बेकायदेशीर असल्याने कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा, यासाठी सभासदांच्यावतीने शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी याचिका दाखल केली आहे. यशवंत कारखान्याच्यानिमित्ताने बाबर आणि संजयकाका एकमेकांसमोर उभे आहेत. दोन्ही नेत्यांमधील कारखान्याची लढाई आता राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. अशा परिस्थितीत हे दोन्ही नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्यानिमित्ताने बुधवारी एकत्र आले. निवडीची प्रक्रिया संपल्यानंतर सांगलीच्या काँग्रेस भवनसमोरील विश्रामगृहात ते एकत्र आले. दुष्काळी फोरमचे नेते भाजपचे आमदार विलासराव जगताप, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख तेथे उपस्थित होते. संजयकाकांची पत्रकार परिषद सुरू असताना बाबर त्यांच्या बाजूलाच बसले होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर दोन्ही नेते विश्रामगृहाच्या ‘अँटी चेंबर’मध्ये गेले. बंद खोलीत त्यांनी अर्धा तास चर्चा केली. त्यांच्यातील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी, ही ‘यशवंत’ची चर्चा नसल्याचे स्पष्ट केले. विश्रामगृहात संजयकाकांचे काही समर्थकही उपस्थित होते. त्यामुळे त्यांनाही या दोन्ही नेत्यांच्या अचानक एकत्रित येण्यामुळे व चर्चेमुळे आश्चर्य वाटले. (प्रतिनिधी)बँकेतही एकत्र हे दोन्ही नेते ‘यशवंत’च्या लढाईत आमने-सामने असले तरी, जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून एकाच पॅनेलमधून निवडून आलेले आहेत. पदाधिकारी निवडीवेळीही ते एकत्रच होते.आम्ही एकत्रच !दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याबाबत पत्रकारांनी आश्चर्य व्यक्त केल्यानंतर दुष्काळी फोरमचे नेते पृथ्वीराज देशमुख आणि आ. विलासराव जगताप म्हणाले की, आम्ही बऱ्याचदा एकत्रित असतो. दुष्काळी फोरमच्या माध्यमातून एकत्र आलो असलो तरी, सध्या सरकारमध्येसुद्धा एकत्र आहोत. कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एकमेकांशी संवाद साधतो. त्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.