शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

सांगलीच्या पाण्यात सांडपाण्याची मात्रा!

By admin | Updated: November 4, 2015 23:57 IST

महापालिकेसमोर प्रदूषण विभागही हतबल : ‘कृष्णे’त रोज ५७ दशलक्ष लिटर मैलामिश्रित पाणी

अशोक डोंबाळे - सांगली--महापालिका क्षेत्रासह वाळवा, पलूस, मिरज तालुक्यांतील दीडशेवर गावांच्या सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने दररोज ५७ दशलक्ष लिटर दूषित पाणी कृष्णा नदीत मिसळत आहे. परिणामी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्राला दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत साथीचे विकार बळावले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला वर्षभरात सात कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. पण, महापालिकेकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही.सांगलीच्या शेरीनाल्याच्या प्रश्नावरून विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका गाजल्या आहेत. पण नागरिकांच्या आरोग्याशी निगडित दूषित पाण्याचा प्रश्न मात्र गेल्या तीस वर्षात सुटलेला नाही. गेल्या आठवड्यात कृष्णा नदीतील मासे मृत झाल्यामुळे दूषित पाण्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. त्यानंतर मंगळवारीही शेरीनाल्याद्वारे शहरातून येणारे सांडपाणी वसंतदादा स्मारकाच्या ठिकाणी कृष्णा नदीत मिसळत असल्याचे दिसून आले. या पाण्याला प्रचंड दुर्गंधी येत असून, कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट नदीत मिसळत आहे. त्यामुळे उपसा होणाऱ्या पाण्याबरोबरच सांडपाण्याची मात्राही लागू झाली आहे. ‘जीवन प्राधिकरण’चा भोंगळ कारभारशेरीनाला शुद्धीकरण प्रकल्पाचा मूळ खर्च २५ कोटी २४ लाख ८८ हजार रुपये होता. तो ३४ कोटी ९५ लाखांपर्यंत पोहोचला आहे. योजनेचे काम पूर्ण झाले असले तरी, अजूनही एक कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. योजना कार्यान्वित होईपर्यंत ३६ कोटींवर खर्च जाईल. केंद्र शासनाच्या मदतीतून हाती घेतलेली शुद्धीकरणाची योजना शेवटच्या टप्प्यात येऊन रखडली आहे. झालेली कामेही दर्जेदार नसल्यामुळे योजना नियमित कार्यान्वित ठेवली जात नाही. याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा कारभारच जबाबदार असल्याचा आरोप महापालिकेकडून होत आहे.नोटिसा, कारवाईनंतरही महापालिका प्रशासनाचे उपाययोजनांकडे दुर्लक्षवसंतदादा स्मारक, सांगलीवाडी येथील सिध्दार्थनगर परिसर, हरिपूर नाला आणि मिरज येथे कृष्णा नदीत शहरातील २७ दशलक्ष लिटर सांडपाणी मिसळत आहे. शिवाय, वाळवा, मिरज आणि पलूस तालुक्यातील १६० गावांचे दररोज ३०.४५ दशलक्ष लिटर सांडपाणीही कृष्णा नदीत मिसळत आहे. ते पाहून कोणीही हे पाणी पिण्याचे धाडस करणार नाही. नदीतून पाणी उचलल्यानंतर महापालिकेकडून त्याचे शुध्दीकरणही नीट होत नाही. महापालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दहा लाखाची बँक गॅरंटी ठेवली होती. तथापि दूषित पाण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे दहा लाख रुपयेही मंडळाने जप्त केले आहेत. याप्रकरणी दि. ३ मार्चरोजी आयुक्तांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तरीही महापालिकेने उपाययोजना केल्या नाहीत. आता कोल्हापूरच्या विभागीय प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे कारवाईसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.सध्या महापालिकेचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. गेल्या आठ दिवसांपासून शेरीनाल्याचे पाणी नदीत मिसळत असल्यामुळे नदीतील मासेही मृत झाले आहेत. मात्र महापालिकेने शेरीनाल्याचे पाणी थांबविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. प्रदूषण नियंत्रण विभागाने महापालिकेला पुन्हा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वर्षभरात अशा सात कारणे दाखवा नोटिसा बजाविल्या आहेत.