शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

सांगलीच्या पाण्यात सांडपाण्याची मात्रा!

By admin | Updated: November 4, 2015 23:57 IST

महापालिकेसमोर प्रदूषण विभागही हतबल : ‘कृष्णे’त रोज ५७ दशलक्ष लिटर मैलामिश्रित पाणी

अशोक डोंबाळे - सांगली--महापालिका क्षेत्रासह वाळवा, पलूस, मिरज तालुक्यांतील दीडशेवर गावांच्या सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने दररोज ५७ दशलक्ष लिटर दूषित पाणी कृष्णा नदीत मिसळत आहे. परिणामी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्राला दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत साथीचे विकार बळावले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला वर्षभरात सात कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. पण, महापालिकेकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही.सांगलीच्या शेरीनाल्याच्या प्रश्नावरून विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका गाजल्या आहेत. पण नागरिकांच्या आरोग्याशी निगडित दूषित पाण्याचा प्रश्न मात्र गेल्या तीस वर्षात सुटलेला नाही. गेल्या आठवड्यात कृष्णा नदीतील मासे मृत झाल्यामुळे दूषित पाण्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. त्यानंतर मंगळवारीही शेरीनाल्याद्वारे शहरातून येणारे सांडपाणी वसंतदादा स्मारकाच्या ठिकाणी कृष्णा नदीत मिसळत असल्याचे दिसून आले. या पाण्याला प्रचंड दुर्गंधी येत असून, कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट नदीत मिसळत आहे. त्यामुळे उपसा होणाऱ्या पाण्याबरोबरच सांडपाण्याची मात्राही लागू झाली आहे. ‘जीवन प्राधिकरण’चा भोंगळ कारभारशेरीनाला शुद्धीकरण प्रकल्पाचा मूळ खर्च २५ कोटी २४ लाख ८८ हजार रुपये होता. तो ३४ कोटी ९५ लाखांपर्यंत पोहोचला आहे. योजनेचे काम पूर्ण झाले असले तरी, अजूनही एक कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. योजना कार्यान्वित होईपर्यंत ३६ कोटींवर खर्च जाईल. केंद्र शासनाच्या मदतीतून हाती घेतलेली शुद्धीकरणाची योजना शेवटच्या टप्प्यात येऊन रखडली आहे. झालेली कामेही दर्जेदार नसल्यामुळे योजना नियमित कार्यान्वित ठेवली जात नाही. याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा कारभारच जबाबदार असल्याचा आरोप महापालिकेकडून होत आहे.नोटिसा, कारवाईनंतरही महापालिका प्रशासनाचे उपाययोजनांकडे दुर्लक्षवसंतदादा स्मारक, सांगलीवाडी येथील सिध्दार्थनगर परिसर, हरिपूर नाला आणि मिरज येथे कृष्णा नदीत शहरातील २७ दशलक्ष लिटर सांडपाणी मिसळत आहे. शिवाय, वाळवा, मिरज आणि पलूस तालुक्यातील १६० गावांचे दररोज ३०.४५ दशलक्ष लिटर सांडपाणीही कृष्णा नदीत मिसळत आहे. ते पाहून कोणीही हे पाणी पिण्याचे धाडस करणार नाही. नदीतून पाणी उचलल्यानंतर महापालिकेकडून त्याचे शुध्दीकरणही नीट होत नाही. महापालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दहा लाखाची बँक गॅरंटी ठेवली होती. तथापि दूषित पाण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे दहा लाख रुपयेही मंडळाने जप्त केले आहेत. याप्रकरणी दि. ३ मार्चरोजी आयुक्तांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तरीही महापालिकेने उपाययोजना केल्या नाहीत. आता कोल्हापूरच्या विभागीय प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे कारवाईसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.सध्या महापालिकेचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. गेल्या आठ दिवसांपासून शेरीनाल्याचे पाणी नदीत मिसळत असल्यामुळे नदीतील मासेही मृत झाले आहेत. मात्र महापालिकेने शेरीनाल्याचे पाणी थांबविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. प्रदूषण नियंत्रण विभागाने महापालिकेला पुन्हा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वर्षभरात अशा सात कारणे दाखवा नोटिसा बजाविल्या आहेत.