शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

सांगलीचा यश पारीक जाणार हवाई सफरीवर

By admin | Updated: July 6, 2016 00:16 IST

भाग्यवान विजेता : ‘लोकमत’ बाल मंचच्या सोडतीत संधी

सांगली : ‘लोकमत’ बाल विकास मंचतर्फे २०१५-१६ या वर्षाकरिता सभासद झालेल्या मुलांना सोडतीद्वारे बक्षिसे जाहीर करण्यात आली. या राज्यस्तरीय सोडतीत राज्यातील ५१ मुलांना हवाई सफरीची संधी मिळाली असून, सांगली जिल्ह्यातून श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूलच्या यश अनिल पारीक या दहावीतील विद्यार्थ्याचाही यात समावेश आहे. बक्षिसाची माहिती मिळताच मालू हायस्कूलसह त्याच्या कुटुंबियांनी आनंद साजरा केला. ‘लोकमत’च्या मागीलवर्षी झालेल्या सभासद योजनेत अनेक आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. यामध्ये हवाई सफरीच्या बक्षिसाचे आकर्षण सर्वांनाच होते. मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असा हा हवाई प्रवास असून, दिल्लीतील सर्व मुख्य ठिकाणांना भेट देतानाच त्यांची माहिती करून देण्याचे काम ‘लोकमत’च्यावतीने करण्यात येणार आहे. कमी वयात देशाच्या राजधानीची माहिती जवळून घेण्याची तसेच यानिमित्ताने हवाई सफरीचा आनंद लुटण्याची ही संधी मिळण्याची प्रत्येकालाच प्रतीक्षा होती. सोडतीद्वारे ५१ भाग्यवान मुलांना ही संधी देण्यात आली. त्यामध्ये मालू हायस्कूलच्या यशचे नाव आल्याने शाळेमध्ये आनंद साजरा करण्यात आला. शाळेत त्याचा सत्कारही करण्यात आला. बाल विकास मंचतर्फे दरवर्षी बक्षीस योजनांसह अनेक मनोरंजनाचे, शैक्षणिक विकासाचे कार्यक्रम, स्पर्धा आयोजित केल्या जातात. जिल्हास्तरावरही सोडतीद्वारे बक्षिसे देण्यात येतात. त्यामुळे शालेय स्तरावरील हजारो विद्यार्थी दरवर्षी योजनेतून सभासद होत आहेत. गतवर्षी सभासद झालेल्या मुलांपैकी यश याला संधी मिळाली आहे. यशचे वडील बांधकाम व्यावसायिक आहेत. आई गृहिणी असून, तो एकुलता एक मुलगा आहे. विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालयाजवळ ते राहतात. ‘लोकमत’च्या बक्षीस योजनेत त्याला हवाई सफरीची संधी मिळाल्याचे कळाल्यानंतर घरात आनंद साजरा करण्यात आला. सांगलीतील मालू हायस्कूलमध्ये मंगळवारी यशचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी ‘लोकमत’चे शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस व मुख्याध्यापिका सुचेता पाठारे यांच्याहस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक दिलीप पवार, पर्यवेक्षक बाळकृष्ण पाटणकर, यशची आई योगिता व अन्य नातेवाईक उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘संस्कारांचे मोती’मुळे हवाई सफरीसह पंतप्रधानांची भेट‘लोकमत’च्या ‘संस्कारांचे मोती’ या शालेय सामान्यज्ञान स्पर्धेच्या माध्यमातून २०१३ ते २०१६ या कालावधित जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांना मुंबई ते दिल्ली या हवाई सफरीबरोबरच राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री, केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.