शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

सांगलीचा यश पारीक जाणार हवाई सफरीवर

By admin | Updated: July 6, 2016 00:16 IST

भाग्यवान विजेता : ‘लोकमत’ बाल मंचच्या सोडतीत संधी

सांगली : ‘लोकमत’ बाल विकास मंचतर्फे २०१५-१६ या वर्षाकरिता सभासद झालेल्या मुलांना सोडतीद्वारे बक्षिसे जाहीर करण्यात आली. या राज्यस्तरीय सोडतीत राज्यातील ५१ मुलांना हवाई सफरीची संधी मिळाली असून, सांगली जिल्ह्यातून श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूलच्या यश अनिल पारीक या दहावीतील विद्यार्थ्याचाही यात समावेश आहे. बक्षिसाची माहिती मिळताच मालू हायस्कूलसह त्याच्या कुटुंबियांनी आनंद साजरा केला. ‘लोकमत’च्या मागीलवर्षी झालेल्या सभासद योजनेत अनेक आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. यामध्ये हवाई सफरीच्या बक्षिसाचे आकर्षण सर्वांनाच होते. मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असा हा हवाई प्रवास असून, दिल्लीतील सर्व मुख्य ठिकाणांना भेट देतानाच त्यांची माहिती करून देण्याचे काम ‘लोकमत’च्यावतीने करण्यात येणार आहे. कमी वयात देशाच्या राजधानीची माहिती जवळून घेण्याची तसेच यानिमित्ताने हवाई सफरीचा आनंद लुटण्याची ही संधी मिळण्याची प्रत्येकालाच प्रतीक्षा होती. सोडतीद्वारे ५१ भाग्यवान मुलांना ही संधी देण्यात आली. त्यामध्ये मालू हायस्कूलच्या यशचे नाव आल्याने शाळेमध्ये आनंद साजरा करण्यात आला. शाळेत त्याचा सत्कारही करण्यात आला. बाल विकास मंचतर्फे दरवर्षी बक्षीस योजनांसह अनेक मनोरंजनाचे, शैक्षणिक विकासाचे कार्यक्रम, स्पर्धा आयोजित केल्या जातात. जिल्हास्तरावरही सोडतीद्वारे बक्षिसे देण्यात येतात. त्यामुळे शालेय स्तरावरील हजारो विद्यार्थी दरवर्षी योजनेतून सभासद होत आहेत. गतवर्षी सभासद झालेल्या मुलांपैकी यश याला संधी मिळाली आहे. यशचे वडील बांधकाम व्यावसायिक आहेत. आई गृहिणी असून, तो एकुलता एक मुलगा आहे. विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालयाजवळ ते राहतात. ‘लोकमत’च्या बक्षीस योजनेत त्याला हवाई सफरीची संधी मिळाल्याचे कळाल्यानंतर घरात आनंद साजरा करण्यात आला. सांगलीतील मालू हायस्कूलमध्ये मंगळवारी यशचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी ‘लोकमत’चे शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस व मुख्याध्यापिका सुचेता पाठारे यांच्याहस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक दिलीप पवार, पर्यवेक्षक बाळकृष्ण पाटणकर, यशची आई योगिता व अन्य नातेवाईक उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘संस्कारांचे मोती’मुळे हवाई सफरीसह पंतप्रधानांची भेट‘लोकमत’च्या ‘संस्कारांचे मोती’ या शालेय सामान्यज्ञान स्पर्धेच्या माध्यमातून २०१३ ते २०१६ या कालावधित जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांना मुंबई ते दिल्ली या हवाई सफरीबरोबरच राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री, केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.