शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

सांगलीच्या जिल्हा कारागृहाची सुरक्षितता धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:26 IST

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारती. वाढलेली लोकवस्ती व गर्दीमुळे कारागृहाची सुरक्षा धोक्यात आली आहे. कारागृह स्थलांतराचा प्रश्न अजूनही शासनदरबारी प्रलंबित आहे. सुरक्षेचा भार पेलताना अधिकारी व कर्मचाऱ्यांची दररोज तारेवरची कसरत सुरु आहे. त्याला एक पर्याय म्हणून कारागृहाच्या संरक्षक भिंतीवर तारेचे कुंपण ...

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारती. वाढलेली लोकवस्ती व गर्दीमुळे कारागृहाची सुरक्षा धोक्यात आली आहे. कारागृह स्थलांतराचा प्रश्न अजूनही शासनदरबारी प्रलंबित आहे. सुरक्षेचा भार पेलताना अधिकारी व कर्मचाऱ्यांची दररोज तारेवरची कसरत सुरु आहे. त्याला एक पर्याय म्हणून कारागृहाच्या संरक्षक भिंतीवर तारेचे कुंपण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करुन तो अंतिम मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.राजवाडा चौकातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ कारागृह आहे. येथे न्यायालयीन कोठडीतील कच्चे कैदी ठेवले जातात. तसेच एक-दोन वर्षे शिक्षा झालेल्या कैद्यांना ठेवण्याचा निर्णय घेतला जातो. २३५ कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात सध्या ३८० कैदी आहेत. कारागृह परिसरात लोकवस्ती नसावी, असा नियम आहे. पण हा नियम कागदावरच राहिला. त्यामुळे कारागृहाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. त्याचा परिणाम सुरक्षेवर झाला आहे. इमारतींमधील घरांतून कारागृहात काय सुरु आहे, हे स्पष्टपणे दिसते. पटवर्धन हायस्कूलच्या छतावरुनही कारागृहात डोकावून पाहता येते. शिवाजी मंडईतून कारागृहाची संरक्षक भिंत दिसते. सुरक्षा रक्षकासाठी उभा केलेला ‘टॉवर’ही दिसतो. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन मध्यंतरी कारागृहाच्या तत्कालीन महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी कारागृहास भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला होता. त्यावेळी बोरवणकर यांनी हे कारागृह स्थलांतर करण्याची गरज असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. पण त्याबाबत शासनदरबारी हालचाली झाल्या नाहीत. त्यांच्यावर २४ तास डोळ्यात तेल घालून नजर ठेवावी लागत आहे. याला पर्याय म्हणून संपूर्ण कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. हा उपायही तोकडा पडत असल्याने संरक्षक भिंतीवर तारेचे कुंपण मारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भात प्रस्ताव तयार करुन तो जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे.कवलापूरचा प्रस्ताव धूळ खातजिल्हा कारागृह हलविण्याबाबत चर्चा झाली. कवलापूर (ता. मिरज) येथील माळावरील जागा निश्चित करण्यात आली. मीरा बोरवणकर यांनीही कवलापूरच्या जागेला पसंती दिली. स्थलांतराचा हा प्रस्ताव तयार करुन शासनाकडे पाठविला आहे. पण शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. परिणामी हा प्रस्ताव धूळ खात पडून आहे.कर्मचाºयांची कसरतसुरक्षेचा भार पेलताना अधिकारी, कर्मचाºयांना कसरत करावी लागत आहे. तसेच कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे कामाचा ताणही वाढला आहे. सुरक्षा व कैद्यांच्या संख्येमुळे ते कारागृह अन्यत्र स्थलांतर केल्याशिवाय पर्याय नाही, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे.