शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहणार; नेत्यांकडून आश्वासन - पृथ्वीराज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 00:34 IST

सांगली : पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डातील नेत्यांशी चर्चा केली असून, ही जागा काँग्रेसलाच सोडण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली ...

ठळक मुद्देपक्षांतर्गत गट-तट बाजूला ठेवून आम्ही ताकदीने लढविणारस्वाभिमानी शेतकरी संघटनेला राज्यातील अन्य जागा देण्याबाबत चर्चा

सांगली : पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डातील नेत्यांशी चर्चा केली असून, ही जागा काँग्रेसलाच सोडण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे ही जागा आम्ही ताकदीने लढविणार आहोत, असे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले की, माझ्यासह विशाल पाटील, प्रतीक पाटील यांचीही नावे प्रदेश व केंद्रीय कार्यकारिणीसमोर इच्छुक म्हणून आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी पक्षाकडून कोण इच्छुक नसल्याची चर्चा चुकीची आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सामील करून घेतले आहे. खा. राजू शेट्टी यांनी हातकणंगलेसह वर्धा जागेची मागणी केली आहे. राष्ट्रवादीने हातकणंगलेची जागा दिली आहे. मात्र वर्ध्याची जागा देण्यासाठी काँग्रेसचे नेते सहमत नाहीत. त्यामुळे सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागितली आहे. काँग्रेस कार्यकर्ते याच गोष्टीवरून नाराज झाले असून, जिल्हा काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ही जागा देण्यास लेखी विरोध पक्षाकडे केला आहे.

खा. शेट्टी यांच्याशी प्रकाश आवाडे व आ. विश्वजित कदम यांनी चर्चा केली होती. सध्या अकोला अथवा शिर्डी येथील जागा देण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे. मात्र अद्याप यावर चर्चा झालेली नाही.सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळावी, यासाठी दिल्ली व मुंबईत जाऊन नेत्यांकडे प्रयत्न केले जात आहेत. दोन दिवसात सकारात्मक निर्णय होईल. मी स्वत: इच्छुक आहे. विशाल पाटील लोकसभा लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांनी प्रदेश व केंद्रीय पातळीवर तशी मागणी केली आहे. पक्षाने मला उमेदवारी दिल्यास मी निवडणूक लढविण्यास तयार आहे. मतदारसंघात प्रचार दौरे केले आहेत. मोदी लाट ओसरली आहे. काँग्रेस पक्षाच्या बाजूने वातावरण आहे. भाजपविरोधात वातावरण आहे. त्यामुळे उमेदवारी मिळाल्यास ही जागा पुन्हा ताब्यात घेऊ, असा विश्वास पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला.

एकसंधपणाने निवडणुकीचे नियोजनउमेदवारीसाठी रस्सीखेच होणे हे लोकशाहीचे लक्षण आहे. त्यामुळे आता उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ असली तरी पक्षाने एकदा उमेदवार जाहीर केला की काँग्रेसमधील सर्व नेते, कार्यकर्ते एकसंधपणे काम करतील. त्याबाबतचा विश्वासही आम्ही केंद्रीय व राज्यातील नेत्यांसमोर व्यक्त केला आहे. यापूर्वी महापालिकेच्या निवडणुकीतही आम्ही एकत्रितपणे नियोजन केले होते, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक