शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहणार; नेत्यांकडून आश्वासन - पृथ्वीराज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 00:34 IST

सांगली : पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डातील नेत्यांशी चर्चा केली असून, ही जागा काँग्रेसलाच सोडण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली ...

ठळक मुद्देपक्षांतर्गत गट-तट बाजूला ठेवून आम्ही ताकदीने लढविणारस्वाभिमानी शेतकरी संघटनेला राज्यातील अन्य जागा देण्याबाबत चर्चा

सांगली : पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डातील नेत्यांशी चर्चा केली असून, ही जागा काँग्रेसलाच सोडण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे ही जागा आम्ही ताकदीने लढविणार आहोत, असे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले की, माझ्यासह विशाल पाटील, प्रतीक पाटील यांचीही नावे प्रदेश व केंद्रीय कार्यकारिणीसमोर इच्छुक म्हणून आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी पक्षाकडून कोण इच्छुक नसल्याची चर्चा चुकीची आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सामील करून घेतले आहे. खा. राजू शेट्टी यांनी हातकणंगलेसह वर्धा जागेची मागणी केली आहे. राष्ट्रवादीने हातकणंगलेची जागा दिली आहे. मात्र वर्ध्याची जागा देण्यासाठी काँग्रेसचे नेते सहमत नाहीत. त्यामुळे सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागितली आहे. काँग्रेस कार्यकर्ते याच गोष्टीवरून नाराज झाले असून, जिल्हा काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ही जागा देण्यास लेखी विरोध पक्षाकडे केला आहे.

खा. शेट्टी यांच्याशी प्रकाश आवाडे व आ. विश्वजित कदम यांनी चर्चा केली होती. सध्या अकोला अथवा शिर्डी येथील जागा देण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे. मात्र अद्याप यावर चर्चा झालेली नाही.सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळावी, यासाठी दिल्ली व मुंबईत जाऊन नेत्यांकडे प्रयत्न केले जात आहेत. दोन दिवसात सकारात्मक निर्णय होईल. मी स्वत: इच्छुक आहे. विशाल पाटील लोकसभा लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांनी प्रदेश व केंद्रीय पातळीवर तशी मागणी केली आहे. पक्षाने मला उमेदवारी दिल्यास मी निवडणूक लढविण्यास तयार आहे. मतदारसंघात प्रचार दौरे केले आहेत. मोदी लाट ओसरली आहे. काँग्रेस पक्षाच्या बाजूने वातावरण आहे. भाजपविरोधात वातावरण आहे. त्यामुळे उमेदवारी मिळाल्यास ही जागा पुन्हा ताब्यात घेऊ, असा विश्वास पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला.

एकसंधपणाने निवडणुकीचे नियोजनउमेदवारीसाठी रस्सीखेच होणे हे लोकशाहीचे लक्षण आहे. त्यामुळे आता उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ असली तरी पक्षाने एकदा उमेदवार जाहीर केला की काँग्रेसमधील सर्व नेते, कार्यकर्ते एकसंधपणे काम करतील. त्याबाबतचा विश्वासही आम्ही केंद्रीय व राज्यातील नेत्यांसमोर व्यक्त केला आहे. यापूर्वी महापालिकेच्या निवडणुकीतही आम्ही एकत्रितपणे नियोजन केले होते, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक