शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

सांगलीतील अनुभवामुळेच कारकीर्द यशस्वी : चंद्रकांत दळवी-सांगलीत गौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:23 IST

सांगली : ग्रामीण भागात शिक्षण होऊनही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासनात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर माझ्या प्रशासकीय सेवेची सुरुवात सांगली जिल्ह्यातून

ठळक मुद्देआर. आर. पाटील यांच्या आठवणींना दिला उजाळा

सांगली : ग्रामीण भागात शिक्षण होऊनही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासनात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर माझ्या प्रशासकीय सेवेची सुरुवात सांगली जिल्ह्यातून झाली. ज्याप्रमाणे आपल्या पहिल्या शाळेतील संस्कार आयुष्यभर सोबत असतात, अगदी तसेच सेवेची सुरुवात सांगलीतून करताना आलेले अनुभव मला प्रशासकीय सेवा यशस्वी करण्यात उपयोगी ठरल्याचे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त चद्रकांत दळवी यांनी सोमवारी येथे केले.दळवी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित कृतज्ञता गौरव सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना दळवी बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. संजयकाका पाटील होते.दळवी पुढे म्हणाले की, जिथून सेवेची सुरुवात झाली त्याठिकाणचा सत्कार माझ्यासाठी विशेष आहे. सांगलीत सुरुवातीची सेवा करताना आलेल्या अनुभवाच्या जोरावरच ३५ वर्षांची प्रशासकीय वाटचाल झाली. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, विठ्ठलदाजी पाटील यांच्याकडून खूप काही शिकलो. लोकप्रतिनिधींबरोबरच सांगलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी रत्नाकर वाघ, लीना मेहेंदळे, शिवाजीराव पाटील यांच्याकडून प्रशासनातील बारकावे शिकलो आणि आयुष्यभर याचा उपयोग झाला त्यामुळे सांगली माझ्यासाठी कर्मभूमीच आहे.या पहिल्या पिढीबरोबरच माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याइतका संवेदनशील नेता मी पाहिला नाही. राजकारणातील समाजकारणी म्हणूनच त्यांच्याकडे पहावे लागेल. ३५ वर्षांपूर्वीची सांगली व आता या मोठा बदल झाला असून, जिल्ह्यात समृध्दता आली आहे. सेवानिवृत्तीनंतर आता ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यावर भर देणार आहे.खा. संजयकाका पाटील म्हणाले की, समाजातील दुर्बल, कष्टकरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी दळवी यांनी काम केले. अनेक अधिकारी कागद पाहून आपले काम करतात; परंतु दळवी यांनी माणसे पारखून काम केल्यामुळे ते यशस्वी झाले. त्यांनी संपूर्ण कारकीर्दीत नौटंकीपणा न करता काम केल्यानेच त्यांचा असा सन्मान होतो आहे.अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी स्वागत केले, तर निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी आ. शिवाजीराव नाईक, आ. अनिल बाबर, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, अश्विनी जिरंगे, धर्मेंद्र पवार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.आठवणीत रमले दळवीआपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगली जिल्ह्यातील अनेक गावांचा उल्लेख करत तेथील आठवणी सांगितल्या. माजी आ. विठ्ठलदाजी पाटील हे सलगरेहून सकाळी सात वाजताच मिरजेच्या प्रांत कार्यालयात यायचे. कालांतराने त्याची इतकी सवय झाली की, ते आमच्या घरातीलच ज्येष्ठ सदस्य असल्याची भावना निर्माण झाली. आर. आर. आबांसमवेत नाईट कॉलेजला घेतलेला प्रवेश, महात्मा गांधी वसतिगृहात त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, पद्मा टॉकीजचा अनुभव, पुष्पराज चौकात आबांसमवेत रंगलेल्या गप्पांचा फड अशा अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला.अन् दळवींच्या डोळ्यात आले पाणीदळवी यांनी आपल्या मनोगताच्या सुरुवातीला आपल्या गावातील शाळेचा अनुभव सांगत त्यावेळी सांगली जिल्ह्यातील लवटे सर, साळुंखे सर अध्यापनास होते, असे सांगितले. त्यातील लवटे सर येथे उपस्थित असून, मी त्यांचा सत्कार करणे अपेक्षित असताना आज त्यांनी मला अंगठी देऊन माझा सत्कार केल्याचे सांगताना दळवी यांना अश्रू अनावर झाले.सांगलीत सोमवारी माजी विभागीय आयुक्त चद्रकांत दळवी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सतार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डावीकडून धर्मेंद्र पवार, अभिजित राऊत, सुहेल शर्मा, विजयकुमार काळम-पाटील, खा. संजयकाका पाटील, आ. शिवाजीराव नाईक, आ. अनिल बाबर, त्रिगुण कुलकर्णी उपस्थित होते.