शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

आॅनलाईन खरेदीबद्दल वाढताहेत सांगलीकरांच्या तक्रारी

By admin | Updated: March 15, 2016 00:24 IST

ग्राहकांची जागरुकता वाढतेय : जिल्ह्यात तक्रारींच्या निवारणाचे प्रमाण समाधानकारक; ग्राहक संरक्षण समितीही सतर्क--जागतिक ग्राहक दिन

शरद जाधव -- सांगली ‘ग्राहक देवो भवं...’ ही आपल्या संस्कृतीने ग्राहकाला दिलेली एक सार्थ अशी उपमा... अर्थकारणातील आणि देशाच्या प्रगतीतील सर्वाधिक महत्त्वाचा, पण तितकाच दुर्लक्षित घटक म्हणजे ग्राहक. उत्पादकांची मनमानी आणि त्याचा ग्राहकांना त्रास भोगावा लागतो. मात्र, ग्राहकांतील जागरुकता वाढत चालल्याने, होणारी फसवणूक टळत असल्याचे आनंददायी चित्र आहे. तक्रारींच्या आकडेवारीत सध्या आॅनलाईन खरेदीबद्दलच्या तक्रारी वाढत असल्याचे दिसत आहे. जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने सांगली शहरातील ग्राहक चळवळ आणि त्यासाठी प्रशासनाकडून होत असलेले प्रयत्न यावर प्रकाशझोत टाकला असता, सांगलीतील ग्राहक झालेला अन्याय सहन न करता, त्याविरोधात दाद मागण्यात आघाडीवर असल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले. सांगलीतील ग्राहकांच्या जागरुकतेवर प्रकाश टाकला, तर त्यातून त्या ग्राहकाबरोबरच इतर ग्राहकांचाही फायदा झाल्याचे दिसून येते. सध्याचा जमाना हा आॅनलाईन खरेदीचा जमाना म्हणून ओळखला जातो. मात्र, या प्रक्रियेत फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याचे ग्राहक चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्यांनी सांगितले. यातही आॅनलाईन मोबाईल खरेदीतील फसवणुकीच्या तक्रारींचे प्रमाण जास्त आहे. आॅनलाईन पध्दतीने मागितलेल्या इतर वस्तूंच्या दर्जाबाबतही तक्रारी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ग्राहक संरक्षण समितीसुध्दा ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी प्रयत्नशील असते. या समितीकडे गेल्या वर्षभरात १२१ ग्राहकांनी दाद मागितली आहे, तर यावर्षी आतापर्यंत १८ जणांच्या तक्रारी दाखल आहेत. दर्जेदार वस्तूंबरोबरच वाजवी दर मिळणे हा ग्राहकांचा हक्क आहे. ग्राहकांची कोणत्याही कारणाने अडवणूक झाल्यास त्यांनी तातडीने तक्रार दाखल केली पाहिजे. उत्पादकांनी त्याची लूट न करता त्याचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे. फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी सजग राहिले पाहिजे.-डॉ. ज्ञानचंद्र पाटील, ग्राहक पंचायत, सांगली.ग्राहकांच्या तक्रारींचे स्वरूप...जिल्हा ग्राहक संरक्षण समितीकडे प्रामुख्याने किराणा दुकानात छापील किं मत नसलेल्या वस्तू विकल्या जातात, ग्राहकांना सौजन्यपूर्ण वागणूक मिळत नाही, विद्यालयातील फी ची पावती दिली जात नाही, फीबाबत शाळेबाहेर फलक लावला जात नाही, शहरातील वाहतूक व्यवस्था, रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नाहीत, चुकीच्या पध्दतीने पाणीपट्टीची वसुली, विद्यार्थ्यांना पास मिळत नाहीत, गॅस वितरक गॅस कनेक्शनसोबत इतर साहित्य घेण्यास भाग पाडतात, अशा तक्रारी दाखल केल्या गेल्या आहेत.