शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

आॅनलाईन खरेदीबद्दल वाढताहेत सांगलीकरांच्या तक्रारी

By admin | Updated: March 15, 2016 00:24 IST

ग्राहकांची जागरुकता वाढतेय : जिल्ह्यात तक्रारींच्या निवारणाचे प्रमाण समाधानकारक; ग्राहक संरक्षण समितीही सतर्क--जागतिक ग्राहक दिन

शरद जाधव -- सांगली ‘ग्राहक देवो भवं...’ ही आपल्या संस्कृतीने ग्राहकाला दिलेली एक सार्थ अशी उपमा... अर्थकारणातील आणि देशाच्या प्रगतीतील सर्वाधिक महत्त्वाचा, पण तितकाच दुर्लक्षित घटक म्हणजे ग्राहक. उत्पादकांची मनमानी आणि त्याचा ग्राहकांना त्रास भोगावा लागतो. मात्र, ग्राहकांतील जागरुकता वाढत चालल्याने, होणारी फसवणूक टळत असल्याचे आनंददायी चित्र आहे. तक्रारींच्या आकडेवारीत सध्या आॅनलाईन खरेदीबद्दलच्या तक्रारी वाढत असल्याचे दिसत आहे. जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने सांगली शहरातील ग्राहक चळवळ आणि त्यासाठी प्रशासनाकडून होत असलेले प्रयत्न यावर प्रकाशझोत टाकला असता, सांगलीतील ग्राहक झालेला अन्याय सहन न करता, त्याविरोधात दाद मागण्यात आघाडीवर असल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले. सांगलीतील ग्राहकांच्या जागरुकतेवर प्रकाश टाकला, तर त्यातून त्या ग्राहकाबरोबरच इतर ग्राहकांचाही फायदा झाल्याचे दिसून येते. सध्याचा जमाना हा आॅनलाईन खरेदीचा जमाना म्हणून ओळखला जातो. मात्र, या प्रक्रियेत फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याचे ग्राहक चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्यांनी सांगितले. यातही आॅनलाईन मोबाईल खरेदीतील फसवणुकीच्या तक्रारींचे प्रमाण जास्त आहे. आॅनलाईन पध्दतीने मागितलेल्या इतर वस्तूंच्या दर्जाबाबतही तक्रारी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ग्राहक संरक्षण समितीसुध्दा ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी प्रयत्नशील असते. या समितीकडे गेल्या वर्षभरात १२१ ग्राहकांनी दाद मागितली आहे, तर यावर्षी आतापर्यंत १८ जणांच्या तक्रारी दाखल आहेत. दर्जेदार वस्तूंबरोबरच वाजवी दर मिळणे हा ग्राहकांचा हक्क आहे. ग्राहकांची कोणत्याही कारणाने अडवणूक झाल्यास त्यांनी तातडीने तक्रार दाखल केली पाहिजे. उत्पादकांनी त्याची लूट न करता त्याचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे. फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी सजग राहिले पाहिजे.-डॉ. ज्ञानचंद्र पाटील, ग्राहक पंचायत, सांगली.ग्राहकांच्या तक्रारींचे स्वरूप...जिल्हा ग्राहक संरक्षण समितीकडे प्रामुख्याने किराणा दुकानात छापील किं मत नसलेल्या वस्तू विकल्या जातात, ग्राहकांना सौजन्यपूर्ण वागणूक मिळत नाही, विद्यालयातील फी ची पावती दिली जात नाही, फीबाबत शाळेबाहेर फलक लावला जात नाही, शहरातील वाहतूक व्यवस्था, रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नाहीत, चुकीच्या पध्दतीने पाणीपट्टीची वसुली, विद्यार्थ्यांना पास मिळत नाहीत, गॅस वितरक गॅस कनेक्शनसोबत इतर साहित्य घेण्यास भाग पाडतात, अशा तक्रारी दाखल केल्या गेल्या आहेत.